शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जळगावात अधिकाऱ्यांचा संगनमताने मनपा निवडणुकीत इव्हीएम घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:36 IST

मनपा निवडणुकीत शासकीय कर्मचाºयांच्या संगनमताने मतदान यंत्रात फेरफार करून शासनाने आपल्या पसंतीचे उमेदवार निवडून आणले असल्याचा धक्कादायक आरोप अमरावती येथील रहिवासी मदन शेळके यांनी केला आहे.

ठळक मुद्देमदन शेळके यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार१० कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशाराभाजपाने ५७ जागांवर मिळविला विजय

जळगाव : मनपा निवडणुकीत शासकीय कर्मचाºयांच्या संगनमताने मतदान यंत्रात फेरफार करून शासनाने आपल्या पसंतीचे उमेदवार निवडून आणले असल्याचा धक्कादायक आरोप अमरावती येथील रहिवासी मदन शेळके यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी शेळके यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.मनपा निवडणुकीत भाजपाने ५७ जागा मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. मात्र, निवडणूक निकाल जाहीर होण्याचा तिसºयाच दिवशी निवडणुकीच्या निकालाबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. शेळके यांनी केलेल्या तक्रारीत थेट शासन कर्मचाºयांवर गंभीर आरोप केले आहेत. शेळके यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, १९ प्रभागातील ७५ जागांसाठी घेण्यात आलेली निवडणूक ही आयोगाच्या नियमाला डावलून आपल्या पसंतीच्या उमेदवार निवडून यावा यासाठी बनावट दस्त तयार केले आहेत. तसेच हे बनावट दस्त प्रसिध्द करण्यात आले असून, प्रभाग निहाय जे अधिकारी नेमलेले होते तेही तेवढेच जबाबदार व दोषी असल्याचे या तक्रारीत शेळके यांनी म्हटले आहे. तसेच याबाबत उच्च न्यायालयात सर्व दस्त दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.राष्टÑवादी, शिवसेनेचे पदाधिकारी भेट घेणारमदन शेळके यांनी केलेल्या दाव्यानंतर मंगळवारी शहरातील राष्टÑवादी कॉँग्रेस व शिवसेनेचे काही पदाधिकारी शेळके यांची अमरावतीला भेट घेणार असल्याची माहिती शेळके यांनी दिली आहे. याभेटीमध्ये सर्व पदाधिकाºयांना ‘इव्हीएम’ घोटाळ्यातील महत्वाची माहिती देणार असल्याचेही शेळके यांनी सांगितली आहे. शेळके यांनी निवडून आलेल्या ५० उमेदवारांसोबत त्या प्रभागात इव्हीएम मध्ये घोळ झाला नसता तर कोण निवडून येणार होते याचीही माहिती या तक्रारीत दिली आहे.आयुक्तांकडून निवडणुकीचा खर्च वसुल करावामतदान यंत्रात फेरफार करुन ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली असून, या प्रकरणी विजयी झालेले उमेदवार व मुख्य निवडणूक निर्णय अधिकाºयांवर पोलीस कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आयुक्तांची बडतर्फीकरून निवडणुकीचा झालेला खर्च आयुक्तांकडून वसुल करण्याची मागणीही शेळके यांनी केली आहे. लोकशाहीची विटंबना केल्याप्रकरणी आयुक्तांवर देशद्रोह व राजद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा शेळके यांनी दिला असून निवडून आलेले उमेदवार व शासनाविरुध्द दहा कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशारा देखील शेळके यांनी दिला आहे. तसेच शासकीय अधिकाºयांनी आपल्या पसंतीचे ५० उमेदवार निवडून आणले असल्याचा गंभीर आरोप शेळके यांनी केला आहे.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकMuncipal Corporationनगर पालिका