शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जळगाव जिल्ह्यात दररोज 20 टन वांग्याचे भरीत फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 15:26 IST

थंडी वाढल्याने मागणी वाढली : खान्देशी वांग्यांची विदेश वारी

ठळक मुद्देतजेलदार वांग्यांना मागणीभरीत केंद्रांवर अधिक मागणीवांग्यांची आवक वाढली

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27 - गुलाबी थंडी जाणवू लागताच भरीताच्या वांग्यांनाही मागणी वाढू लागली असून तयार भरीताची विक्री वाढली आहे. जळगावातून दररोज सुमारे 20 टन भरीताच्या वांग्यांची विक्री होत असून जिल्ह्यासह राज्यभरात येथून वांगे तसेच तयार भरीत पाठविले जात आहे. इतकेच नव्हे येथील प्रसिद्ध वांगे अमेरिकासह इतर देशातही नातेवाईकांकडे पाठविण्यात येत आहेत. जळगाव जिल्ह्यातील केळीसह भरीताचे वांगेही मोठे प्रसिद्ध आहेत.  त्यात हिवाळ्य़ामध्ये जास्त मागणी असते ती भरीताच्या वांग्यांना. जळगाव जिल्ह्यातील वातावरण व येथील जमीन या वांग्यांसाठी पोषक असल्याने त्यांची जी विशिष्ट चव आहे, ती इतरत्र कोठेही मिळत नाही. त्यामुळे या वांग्यांना जास्त मागणी असते व ते येथेच मोठय़ा प्रमाणात पिकविले जातात. गेल्या काही  वर्षापासून  पावसाळ्य़ामध्येच भरीताचे वांगे बाजारात येऊ लागले आहेत. मात्र त्यांची खास चव लागते ती हिवाळ्य़ामध्ये. त्यामुळे थंडी वाढू लागली की या वांग्यांचीही मागणी वाढते.  

वांग्यांची आवक वाढलीजळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातील बामणोद, भालोद, पाडळसे, जळगाव तालुक्यातील असोदा, भादली तसेच  वरणगाव, बोदवड तसेच रावेर तालुक्यांमध्ये भरीताच्या वांग्यांचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सध्या जळगाव बाजार समितीमध्ये या वांग्यांची आवक वाढली असून दररोज 20 टन वांग्यांची विक्री होत आहे. 

भरीत केंद्रांवर अधिक मागणीघरगुती भरीत करण्यासाठी तसेच हॉटेल चालकांकडून या वाग्यांची खरेदी होते. त्यात आता काही वर्षांपासून खास भरीत सेंटरही सुरू झाल्याने तेथे मोठय़ा प्रमाणात वांग्यांना मागणी असते. जळगाव शहरात 15च्यावर भरीत सेंटर असून त्यातील तीन ते चार सेंटरवर नेहमी वर्दळ असते. त्यामुळे या भरीत सेंटरवरच जास्त वांग्यांना मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या घरी भरीत करण्यासह तयार भरीताला पसंती दिली जात असल्याने त्याची विक्री वाढली आहे. 

भरीत पाटर्य़ाचे आयोजनजळगाव जिल्ह्यात हिवाळ्यात भरीत पाटर्य़ा मोठय़ा प्रमाणात केल्या जातात. त्यास आता हळूहळू सुरुवात होणार असून सुटय़ांमुळे सध्या घरी आलेल्या पाहुणे मंडळींना भरीताचा पाहुणचार केला जात आहे. या सोबतच लग्न असो अथवा कोणताही समारंभ तेथे जेवणामध्ये इतर पदार्थांसह भरीताचा मेनू हमखास असतोच. तजेलदार वांग्यांना मागणीवांगे भाजल्यानंतर त्यामधून जास्त तेल सुटेल अशा वांग्यांना अधिक मागणी असते. यासाठी जळगाव जिल्ह्यातील बामणोद, असोदा, भादली या भागातील वांगे अधिक प्रसिद्ध आहे. असोदा येथे तर पिढय़ां-पिढय़ांपासून भरीताच्या वांग्यांची शेती केली जात आहे.

विदेशवारीजळगाव जिल्ह्यातील अनेक मंडळी अमेरिका तसेच इतर देशांमध्ये वास्तव्यास आहे. ही मंडळी हिवाळ्य़ामध्ये येथे आली अथवा येथील नातेवाईक त्यांच्याकडे गेले तर सोबत हमखास वांगे अथवा भरीत घेऊन जात असतात. या सोबतच दररोज जळगावातून पुणे, मुंबईला स्थायिक झालेल्या नातेवाईकांकडे ट्रॅव्हल्सद्वारे वांगे  पाठविले जातात. 

भौगोलिक मानांकनभरीताचे वांगे दोन रुपये प्रति किलोर्पयत घसरतात. त्यामुळे उत्पादकांना मोठा फटका बसतो. यासाठी या वांग्यांना रास्त भाव मिळावा म्हणून जळगाव तालुक्यातील असोदा येथील नवनिर्मिती शेतकरी मंडळाच्या वतीने यासाठी प्रयत्न केले जात असून या मंडळाने या वांग्यांना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळविले आहे. यामुळे 150 देशांमध्ये वांग्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होणार असून त्यास भाव मिळण्यासही मदत होऊ शकेल. 

अवकाळी पावसामुळे भाव तेजीतयंदा गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने त्यामुळे उत्पादनावर काहीसा परिणाम झाला आहे. त्यामुळे भाव वाढून होलसेलचे भाव 20 रुपये प्रति किलो आहे. एरव्ही हे भाव 10 ते 15 रुपये असतात. 

सध्या भरीताच्या वांग्यांची मागणी वाढली असून दररोज 20 टन भरीताच्या वांग्यांची विक्री होत आहे. अवकाळी पावसामुळे यंदा भाव वाढले आहे. - निर्मला चौधरी, फळ, भाजीपाला विक्रेत्या.

जळगाव जिल्ह्यातील पूरक वातावरणामुळे येथील वांग्यांना विशिष्ट चव असते. सध्या त्यांची आवक वाढली आहे. - किशोर चौधरी, वांगे उत्पादक, असोदा