शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

हळद लागण्यापूर्वीच जळगावातून पुण्याच्या नववधूचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:37 IST

अंगणात लग्नाचा मंडप टाकलेला...वधू-वरांनी हातावर मेहंदी रंगवलेली...मुलगा लग्नाची आतुरतेने वाट पाहतो... हळदीला अवघे काही तास बाकी असतानाच मेहंदी लागलेल्या नववधूने नवरा मुलाच्या घरातून पलायन केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता घडली. घोडा, बॅँड, जेवणावळी, मंडप यासह लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असताना असा प्रकार घडल्याने वधू-वरांच्या मातापित्यांवर व वरावर मोठे संकट कोसळले. एकमेकाला दोष देत दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.

ठळक मुद्देएमआयडीसीतील प्रकार  घरासमोर टाकला होता लग्नाचा मंडपरस घ्यायला गेली अन् गायब झाली

 

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : अंगणात लग्नाचा मंडप टाकलेला...वधू-वरांनी हातावर मेहंदी रंगवलेली...मुलगा लग्नाची आतुरतेने वाट पाहतो... हळदीला अवघे काही तास बाकी असतानाच मेहंदी लागलेल्या नववधूने नवरा मुलाच्या घरातून पलायन केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता घडली. घोडा, बॅँड, जेवणावळी, मंडप यासह लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असताना असा प्रकार घडल्याने वधू-वरांच्या मातापित्यांवर व वरावर मोठे संकट कोसळले. एकमेकाला दोष देत दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.याबाबत सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका नगरातील मुलाचे पुणे येथील मुलीसोबत लग्न निश्चित झाले होते. मुलगा व मुलगी या दोघांच्या शेजारच्या लोकांच्या मध्यस्थीने हे स्थळ जुळले होते. त्यानुसार १० नोव्हेंबर रोजी मुलगा पुणे येथे मुलगी पाहण्यासाठी गेला होता. मुलगी पसंत झाल्याने २५ नोव्हेंबर रोजी जळगावात दोघांचा साखरपुडा झाला. तेव्हाच १३ डिसेंबर ही लग्नाची तारीख काढण्यात आली होती.दोन दिवसापूर्वी मुलीचे कुटुंब दाखल१३ तारखेचे लग्न असल्याने मुलगी, तिची आई, वडील व लहान भाऊ असे चौघे जण दोन दिवसापूर्वीच जळगावात दाखल झाले. दोघांच्या संमतीने ११ डिसेंबर रोजी बस्ता झाला. त्यानंतर रात्रीतूनच नवरी मुलीचे कपडे शिवण्यात आले. तत्पूर्वी दोघांच्या हाताला मेहंदी लावण्यापासून तर लग्नाच्या गाण्यांचाही कार्यक्रम झाला. १२ रोजी सायंकाळी हळद असल्याने सकाळपासूनच अंगणात मंडप टाकण्यात आला होता. सकाळची जेवणावळीही झालेली होती.रस घ्यायला गेली अन् गायब झालीनववधूचा भाऊ आजारी असल्याने त्याच्यासाठी उसाचा रस घेऊन येते असे सांगून दुपारी साडे बारा वाजता ही नववधू एकटीच घराबाहेर गेली ती नंतर परत आलीच नाही. बराच वेळ झाल्यानंतरही वधू येत नसल्याने त्याची दोन्ही कुटुंबात चर्चा झाली. शोधाशोध केल्यानंतर वधू गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलगा, त्याची आई व मुलीच्या आईला मोठा धक्का बसला.५० हजारात मुलीचा सौदावधू गायब झाल्यानंतर दोन्हीकडील मंडळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आली. त्यात एकमेकावर आरोप करायला लागले. मुलाला मुलगी मिळत नसल्याने ५० हजार रुपये देऊन मुलीचे लग्न निश्चित केले. त्यातही सर्व खर्च मुलाकडील मंडळींनीच उचलण्याचे ठरले होते. ५० पैकी ३० हजार रुपये मुलीच्या पालकांना देण्यात आले होते. हळद लागल्यानंतर २० हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान,याबाबत मुलीच्या आईला विचारले असता फक्त लग्नाचा खर्च मुलाने करायचे इतकेच ठरले होते, आम्ही एक रुपयाही घेतलेला नाही. मध्यस्थी व मुलाकडील मंडळी खोटे बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलगी अल्पवयीन मुलगी अल्पवयीन असून जानेवारी महिन्यात तीला अठरा वर्ष पुर्ण होणार आहे. मुली मिळत नसल्याने मुलाकडील लोकांनी लग्नाची घाई केली. मुलगी पळून गेली याचे आम्हाला दु:ख आहे असे मुलीची आई वारंवार सांगत असताना काही समाजसेवक महिला मुलीला व लग्न जमविणा-या महिलेवर आरोप करीत होत्या. मुलगी पळून गेली म्हणून गुन्हा दाखल करावा असा आग्रह त्यांच्याकडून होत होता. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने आपणच अडचणीत येवू शकतो याची कोणीतरी जाणीव करुन दिल्याने दोन्ही गट माघारी फिरले.