शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

पूर ओसरेलही, अश्रूंना बांध कसे घालायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:34 IST

चाळीसगाव : ‘नेमेचि येतो मग पावसाळा..’ असं म्हणत प्रशासनासह सर्वच गाफील राहिल्यास काय दाणादाण उडते. हे बुधवारी पहाटे चाळीसगावच्या ...

चाळीसगाव : ‘नेमेचि येतो मग पावसाळा..’ असं म्हणत प्रशासनासह सर्वच गाफील राहिल्यास काय दाणादाण उडते. हे बुधवारी पहाटे चाळीसगावच्या डोंगरी व तितूर नदीला आलेल्या पुराने सहप्रमाण सिद्ध केले आहे. यशाचे श्रेय घेण्यासाठी नेहमीच चढाओढ असते; मात्र अपयशाला खांदा द्यायला कुणीही तयार नसतो. त्यामुळे आपत्तीचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी अगामी काळात स्पर्धाही सुरु होईल.

संकटे ही नैसर्गिक असली तरी मानवी हस्तक्षेपांमुळे ती जीवघेणीही ठरत आहेत. चाळीसगावी डोंगरी व तितूर नदीला आलेल्या पुराला मानवी हस्तक्षेपाचाही लोंढा आहेच. हे नाकारता येत नाही. पूर ओसरेलही पण ज्यांचे सर्वस्व पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यांच्या अश्रूंना बांध कसा घालायचा ? हा प्रश्न मन सुन्न करुन टाकतो. या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनासह आमदार मंगेश चव्हाण हे रस्त्यावर उतरुन नागरिकांना धीर देताना दिसून आले.

शहरात दत्तवाडी भागात डोंगरी व तितूर नदीचा संगम होऊन पुढे तितूर नदी वाहत जाते. या परिसरात शिवाजी घाट, भाजी मंडईसह मोठी नागरी रहिवास आहे.

गेल्या काही वर्षांत नदीची पावसाळ्यापूर्वी होणारी मशागत येथे झालेली नाही. नदी खोलीकरण, गाळ उपसा, स्वच्छता याबाबत आनंदीआनंद आहे. पालिका प्रशासन तर ही आमची जबाबदारीच नाही अशा भूमिकेत दिसते. सूर्यनारायण मंदिरालगत नदी सुशोभीकरणासाठी मध्यंतरी दगडांचे मोठे भराव टाकून एक लोखंडी पूल उभारण्यात आला; मात्र या पुलाला दोन्ही बाजूने प्रवेशासाठी जागाच नसल्याने हेच का ते सुशोभीकरण? असे म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे.

दगडांचा भराव केल्याने पाण्याचा जोर वाढल्याने पुराचे पाणी थेट पूर्णपात्रे हाॅस्पिटलसह तहसील कार्यालयजवळील वीर सावरकर चौकांपर्यंत पोहोचले होते. स्टेशन रोडलगतच्या गल्ल्यांमध्येही ते घुसले. येथे दुचाकी व चारचाकी वाहने जलमय झाली होती.

दुसरा मुद्दा नदीतील अतिक्रमणाचा आहे. नदीचे बहुतांशी पात्र अतिक्रमणाने गिळंकृत केले आहे. खरजई रोडलगतच्या वीटभट्ट्या असोत की भाजी मंडई लगतच्या दुकानांची अतिक्रमणे. नदीच्या मूळ नैसर्गिक प्रवाहाला बाधा निर्माण झाली आहे. साहजिकच बुधवारी आलेल्या पुराचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये घुसून हाहाकार उडाला. नव्या व जुन्या पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने उर्वरित शहराचा संपर्क तुटला. वीजपुरवठा खंडित झाला. पावसाळ्यापूर्वी पूररेषा नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन, नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देणे, ही पालिका प्रशासनाची कामे आहेत. मात्र हे सर्व कागदावरच राहिले, असा संतप्त सूर बुधवारी दिवसभर व्यक्त होत होता.

तितूर नदी हिरापूर रस्त्यालगत तळेगावकडून वाहत येते. या नदीत ठिकठिकाणी सांडपाणी सोडल्याने तितूरची केव्हाच गटारगंगा झाली आहे. तितूरची जशी कोंडी झाली आहे. तशीच स्थिती पाटणादेवीच्या धवलतीर्थ डोहातून उगम पावलेल्या डोंगरीचीही झाली आहे. या नदीचा शहरात प्रवेश बामोशी बाबांच्या दर्गाहाला स्पर्श करुन होतो. बाबांच्या दर्गाहात वर्षभर भाविकांचा राबता असल्याने नदीपात्रातच फुले, शिरणी, पूजा साहित्याची दुकाने थाटलेली असतात. परगावाहून आलेले भाविक येथे नदीपात्रातच झोपड्या उभारुन राहतात. पुढे रिंगरोडलाही नदीपात्रालगत ठिकठिकाणी रहिवाशांनी अतिक्रमणे केली आहेत. दोन्ही बाजूने नदीपात्रे आकसल्याने बुधवारी आलेल्या पुराच्या पाण्याने थेट १० ते १५ फूट उंचीवर असलेल्या बामोशी बाबांच्या समाधीपर्यंत धडक दिली. हा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. पुराचे पाणी घाटरोडपर्यंत शिरले होते. याच पुरात दुकानदारांचे साहित्य तर नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तू, जनावरे वाहून गेली. पूर ओसरल्यानंतर आता पूरग्रस्तांचे डोळे वाहू लागले आहेत. यातून काही बोध घेतला तर ‘देर आये दुरुस्त आये’, असे होईल. नाही तर आहेच ‘नेमेचि येतो मग पावसाळा.’