शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांनंतरही नुकसानाची भरपाई मिळेना..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST

भडगाव : ११ जून २०१९ ला तालुक्यातील पावणे सहाशे हेक्टरवरील केळी, लिंबूसह चक्रीवादळाने पिकांचे नुकसान केले होते. प्रशासनाने तातडीने ...

भडगाव : ११ जून २०१९ ला तालुक्यातील पावणे सहाशे हेक्टरवरील केळी, लिंबूसह चक्रीवादळाने पिकांचे नुकसान केले होते. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देऊ म्हटले होते. मात्र दोन झाली तरीही शेतकरी अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

तालुक्यात सुमारे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शासनदफ्तरी नोंद आहे. शासनाच्या या दुर्लक्षामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरीवर्गात नाराजी पसरली आहे. याबाबत आमदार किशोर पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की, आजच याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री किशोरराजे निंबाळकर, तसेच विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना भरपाईसाठी अनुदान मिळावे, यासाठी पत्र देऊन संबंधितांशी चर्चाही केली. याबाबत शासनदरबारी आमचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.

भडगाव तालुक्यात ११ जून २०१९ ला वादळाचा जोरदार पाऊस बरसला. चक्रीवादळासह पडलेल्या पावसाने सुमारे ५६७ हेक्टरवरील पीक अक्षरशः जमिनदोस्त केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. महसूल व कृषी विभागाने ८५२ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले होते. या नुकसानीचा अहवाल अनुदानासाठी शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र दोन वर्षे होत आली तरी एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई भरपाई मिळाली नाही.

याबाबत तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांना विचारले असता या शेतकऱ्यांना अद्याप कोणताही लाभ आर्थिक मदत मिळाली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

एकीकडे रब्बी गेली, दुसरीकडे खरिपाचा हंगाम पाण्यात गेला. तिसरा म्हणजे कोरोनामुळे आरोग्याचा गेल्या दीड वर्षात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. नुकसान भरपाईचा गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चारही बाजूने कुचंबणा झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक आमदारांनी भडगाव तालुक्यातील वादळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, म्हणून विधानसभेत आवाज उठवला होता.

आमदार किशोर पाटील यांनीही विधानसभेत शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळावी, म्हणून आवाज उठविला. आताही या पीक नुकसानीचे अनुदान मिळाले असते तर खरीप हंगामात पीक पेरण्यांना बियाणे, रासायनिक खते घेण्यासाठी या अनुदानाचे पैसे कामात आले असते. मात्र अद्यापही ते प्राप्त झालेले नाही.

चक्रीवादळाने झालेले नुकसान

क्षेत्र (हेक्टरी)

केळी : ४९३.५६ हेक्टर

लिंबू : ३६.२९ हेक्टर

मोसंबी : १६ हेक्टर

पपई : ९.३६ हेक्टर

डाळिंब : १२ हेक्टर.

२ वर्षे संपली तरी शेतकऱ्यांना केळीची नुकसानभरपाई मिळाली नाही. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर पंचनामे झाले होते. आमदार किशोर पाटील, खा. उन्मेष पाटील, यांनी लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. आताच्या सरकारला माहिती नाही. पण आमदार, खासदार तेच आहेत, त्यांनी आठवण करून द्यावी. आमदार सत्तेत आहेत. आजपर्यंत एक कवडीही शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत केली नाही.

-दीपक संभाजी महाजन, राष्ट्रवादी किसान सेल, भडगाव तालुकाध्यक्ष

चक्रीवादळाने भडगाव तालुक्यात केळी, लिंबुसह पिके आडवे पडून नुकसान झाले होते. सुमारे पावणेसहा हेक्टर क्षेत्राचे पिकांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला होता. शासनाकडून याबाबत शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.

-बी. बी. गोरडे, तालुका कृषी अधिकारी भडगाव.

आज दि. ३० रोजी मी यासंदर्भात मदत व पुनर्वसनमंत्री किशोरराजे निंबाळकर व विजय वडेट्टीवार यांची मंत्रालयात संबंधितांची भेट घेउन शेतकऱ्यांना पिक नुकसानीचे अनुदान लवकर मिळावे. याबाबत लेखी पत्र दिले. आमचा शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळेल.

-किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव