शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

दिवाळीच्या तीन आठवड्यानंतरही किराणा साहित्याला मागणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:10 IST

जळगाव : दिवाळी होऊन तीन आठवडे होत आले तरी अद्यापही किराणा माल खरेदीला फारसा उठाव नसल्याने खाद्य ...

जळगाव : दिवाळी होऊन तीन आठवडे होत आले तरी अद्यापही किराणा माल खरेदीला फारसा उठाव नसल्याने खाद्य तेलासह सर्वच किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे. भाजीपालादेखील सलग तिसऱ्या आठवड्यातही स्थिर असून कांदा, बटाट्याचे भाव काहीसे कमी झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा आहे.

दरवर्षी दिवाळीनंतर साधारण १५ दिवस किराणा साहित्याची फारसी उलाढाल नसते. अनेक जण बाहेरगावी गेल्याने हा परिणाम जाणवतो. मात्र यंदा दिवाळी होऊन तीन आठवडे होत आले तरी अद्यापही किराणा साहित्याला हवा तसा उठाव नसल्याचे विक्रेत्यांचे या आठवड्यातही बहुतांश वस्तूंचे भाव स्थिर आहेत.

यामध्ये शेंगदाणे ११५ ते १२५ रुपये, साबुदाणा ६८ ते ७० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. या सोबतच साखर ३७ ते ३८ रुपये प्रति किलोवर तर रवा ३० ते ३२ रुपये, मैदा २६ ते २८ रुपये, बेसणपीठ ८० ते ८५ रुपये, वनस्पती तुपाचे भावदेखील १०० ते ११० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.

खाद्य तेलाचे भाव कमी होईना

दिवाळीच्या अगोदरपासून भाव वाढ झालेल्या खाद्य तेलाचे भाव अजूनही वाढलेलेच आहे. घरगुती फारसी मागणी नसली तरी खाद्य पदार्थ व्यावसायिकांकडून मागणी असल्याने खाद्य तेलाचे भाव अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. सोयाबीन तेल ११८ ते १२० रुपयांवर कायम आहे.

बाजारात गाजर दाखल

फळ बाजारामध्ये पेरुचे भाव कमीच असून २० रुपये प्रति किलोवर आले आहे. बाजारात गाजर दाखल झाले असून ३५ ते ४० रुपये प्रति किलोने ते विक्री होत आहे.

बटाटे ४० रुपयांवर

भाजीपाल्याचे भाव अजूनही स्थिर आहे. कांदा-बटाट्याचे भाव मात्र कमी झाले आहे. यामध्ये नवीन बटाटे दाखल झाले असून ते ४० ते ४५ रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. जुने बटाटे ६० रुपयांवरून ५० रुपयांवर आले आहे. कांद्याचे भाव ६० ते ७० रुपयांवरून ५० रुपयांवर आले आहे.

भाजीपाल्याचे भाव स्थिर राहण्यासह कांदा, बटाट्याचे भाव कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. किराणा साहित्याचे दर स्थिर असल्याने दिलासा आहे.

- राजेंद्र महाजन, ग्राहक

दिवाळी होऊन तीन आठवडे होत आले तरी यंदा किराणा साहित्याला मागणी वाढलेली नाही. त्यामुळे तेलासह जवळपास सर्वच वस्तूंचे भाव अजूनही स्थिर आहे.

- सचिन छाजेड, व्यापारी

कांदा, बटाट्याचे भाव