शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मजुर परतले तरीही अमृतच्या कामांची संथगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST

जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत योजनेतंर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामावर कोरोनाच्या दुसऱ्या ...

जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत योजनेतंर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक मजूर लॉकडाऊन दरम्यान घरी परतल्यामुळे या दोन्ही योजनेचे काम जवळपास दीड ते दोन महिने बंदच होते. आता निर्बंध उठविले गेले असून, अनेक मजूर आता परतले आहेत. मात्र,अजूनही मजुरांची संख्या पुरेसी नसल्याने या दोन्ही योजनांचे काम संथगतीनेच सुरु आहे. या दोन्ही योजनांचे काम जितके लांबेल तितकेच रस्त्यांची कामे देखील लांबणार आहेत.

केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत मार्च २०१७ मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. नोव्हेंबर २०१९ पर्यंत या योजनेचे काम होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदार, मनपा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हे काम लांबतच गेले. त्यात कोरोनामुळे हे काम लांबले. आता पुन्हा या कामासाठी शासनाने ठेकेदाराला ६ महिन्यांची मुदतवाढ दिली असली तरी काम ३ महिन्यात पुर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, भुयारी गटार योजनेचे काम देखील संथगतीने सुरु असून, या योजनेचे काम पुर्ण करण्याची मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत आहे.

‘त्या’ वाढीव १६५ कॉलन्यांचा विषय अधांतरीतच

अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या निविदेत शहरातील राहून गेलेल्या १६५ कॉलन्यांचा समावेश मनपाने नव्याने केला आहे. तसेच या भागांमध्येही या योजनेतंर्गत पाणी मिळावे यासाठी ३० कोटी रुपयांच्या निधीला महासभेने मंजुरी देखील दिली आहे. मात्र, अजूनही मनपा प्रशासनाकडून या वाढीव कॉलन्यांमधील कामांसाठी पुढील प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. एकीकडे योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असताना, दुसरीकडे पुन्हा उर्वरित कामांना मनपाकडून उशीर केला जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. अनेक महिन्यांपासून १६५ कॉलन्यांमधील रखडलेला विषय स्कृटीनीसाठी पडून असून, अजूनही मंजूरीच्या प्रतीक्षेत आहे.

मलनिस्सारण प्रकल्पाचे काम मात्र वेगात

शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम ६५ टक्के पुर्ण झाले असून, या कामावर कोरोनामुळे फरक पडला असला तरी , शिवाजीनगरातील जुन्या खत कारखान्यातील सुमारे १० एकर जागेवर तयार होणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पाचे काम मात्र वेगात सुरु आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे काम ७० टक्के पुर्ण झाले आहे. शहरातील सुमारे ४२ लाख लीटर वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर या प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे नदी, नाल्यांमध्ये वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर भविष्यात शेतीसाठी केला जाणार आहे. तसेच या पाण्याव्दारे मनपा प्रशासनाला उत्पन्नाचा नवा स्त्रोत देखील मिळणार आहे.

भुयारी गटार योजनेचे आतापर्यंत झालेले काम - ६५ टक्के

एकूण योजनेचा खर्च - १९५ कोटी

मुदत - सप्टेंबर २०२१

मक्तेदार - एल.सी.इन्फ्रास्ट्रक्चर, अहमदाबाद

जलवाहिण्या टाकण्याचे काम - २०३ किमी पैकी ११० किमी

---

पाणी पुरवठा योजनेचे झालेले काम - ९० टक्के

एकूण योजनेचा खर्च - २५० कोटी

मुदत - डिसेंबर २०२१

जलवाहिण्या टाकण्याचे काम - ९५ टक्के

पाण्यांच्या टाक्यांचे काम - ७० टक्के पुर्ण