शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

पंचायत राज समितीच्या आदेशानंतरही जळगाव पोलिसात गुन्हा दाखल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:09 IST

शालेय पोषण आहाराच्या मुदतबाह्य साठ्याप्रकरणी पंचायत राज समितीने तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही दुसºया दिवशी गुन्हा दाखल झाला नाही. जिल्हा परिषदेच्यावतीने कोणीही फिर्याद द्यायला आले नाहीत, त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

ठळक मुद्देशालेय पोषण आहार प्रकरणजि.प.प्रशासनाने फिर्याद दिलीच नाहीकायद्यातील तरतूदींची अडचण?

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६  :  शालेय पोषण आहाराच्या मुदतबाह्य साठ्याप्रकरणी पंचायत राज समितीने तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही दुसºया दिवशी गुन्हा दाखल झाला नाही. जिल्हा परिषदेच्यावतीने कोणीही फिर्याद द्यायला आले नाहीत, त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

जिल्हा दौºयावर आलेल्या पंचायत राज समितीच्या बैठकीत शालेय पोषण आहाराचा मुद्दा चर्चेला आला होता. २०१४ मध्ये झालेल्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने पंचायत राज समितीने बुधवारी जिल्हा परिषदेत पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व एमआयडीसीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना पाचारण केले होते.

समोरासमोर झालेल्या चौकशीत गुन्हा दाखल करण्यासाठी जि.प.प्रशासन येणार असल्याचे लेखी पत्र कुराडे यांनी सादर केले होते. त्यामुळे फिर्याद देण्याची जबाबदारी जि.प.प्रशासनावर आहे. याची दखल घेत समितीने गुन्हा दाखल करण्यासाठी जि.प.प्रशासनाला तत्काळ फिर्याद देण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी सायंकाळपर्यंत जि.प.च्यावतीने कोणीही फिर्याद द्यायला आले नाही अशी माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी दिली. दरम्यान, मुदतबाह्य साठा प्रकरणात नेमकी काय फिर्याद द्यावी असा प्रश्न जि.प. प्रशासनाला पडला आहे तर यात कोणते कलम लावावेत याचाही प्रश्न पोलीस यंत्रणेला पडला आहे.