शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

बंदीनंतरही हरी विठ्ठलनगरात भरला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा व मनपा प्रशासनाने आठवडा बाजाराला बंदी आणली आहे. मात्र, मंगळवारी आषाढी एकादशीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा व मनपा प्रशासनाने आठवडा बाजाराला बंदी आणली आहे. मात्र, मंगळवारी आषाढी एकादशीच्या शासकीय सुटीचा फायदा घेत हरी विठ्ठलनगरात सकाळी ९ वाजेपासून आठवडा बाजार भरला होता. याबाबत मनपा प्रशासनाला माहिती मिळताच काही वेळातच मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने हा बाजार उठवून लावला आहे.

दर मंगळवारी हरी विठ्ठलनगरात आठवडा बाजार भरत असतो. मात्र, कोरोनामुळे बाजार भरण्यास बंदी असल्याने चार महिन्यांपासून चोरून-लपून याठिकाणी बाजार भरविला जात आहे. दर मंगळवारी सकाळी व सायंकाळी मनपाचे पथक याठिकाणी आधीच तैनात राहत असल्याने काही महिन्यांपासून हा बाजार भरतच नाही. मात्र, मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त शासकीय सुटी असल्याने महापालिकेचे कर्मचारी देखील रजेवर असतील, या आशेने भाजीपाला विक्रेत्यांनी हरी विठ्ठलनगर भागात सकाळपासूनच दुकाने थाटण्यास सुरुवात केली होती. सकाळी ९ वाजेपर्यंत या बाजारात विक्रेत्यांसह नागरिकांची देखील मोठी गर्दी झाली होती.

मनपाचे पथक दाखल होताच सुरू झाला गोंधळ

आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती मिळताच मनपा उपायुक्त संतोष वाहुळे व रामानंद पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मनपाचे पथक याठिकाणी दाखल झाले. मनपाचे पथक दाखल होताच विक्रेत्यांनी जेवढा माल जमा करता येईल तेवढा माल जमा करून, या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे या ठिकाणी चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. तसेच मनपाने विक्रेत्यांचा माल जप्त केला तर विक्रेत्यांसोबत वाद होतील म्हणून यावेळी कारवाई न करता केवळ बाजारात थाटलेली दुकाने उठविण्याच्या सूचना मनपाच्या पथकाकडून देण्यात आल्या. या सूचनेनंतरही ज्या विक्रेत्यांनी दुकाने उठविली नाहीत, अशा काही विक्रेत्यांचा माल मनपाकडून जप्त करण्यात आला. तसेच कारवाईदरम्यान विक्रेते व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद देखील झाला.