शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

कच्चे रस्ते असलेले तालुक्याचे शहर एरंडोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 19:15 IST

सामान्यपणे तालुक्याच्या शहरात सर्वत्र पक्के रस्ते असतात.

एरंडोल : सामान्यपणे तालुक्याच्या शहरात सर्वत्र पक्के रस्ते असतात. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागात खेडोपाडी गावांतर्गत रस्ते पक्के झाले आहेत. मात्र एरंडोल येथे अजूनही नवीन वसाहतींमध्ये रस्ते कच्चे असल्याचे दिसून येते. सुमारे आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या या वसाहतींमध्ये कच्चे रस्ते असल्यामुळे अनेक अडचणींना रहिवाशांना सामोरे जावे लागते.एरंडोल हे तालुक्याचे खेडे वजा शहर आहे. गेल्या ४५ वर्षात येथे अनेक नवीन वसाहती अस्तित्वात आल्या. त्यात मूळ शहरालगत असलेल्या रामचंद्र नगर, पद्मावती पार्क व सावतामाळी नगर या भागात अजूनही मातीचे रस्ते आहेत. तसेच आनंद नगर, गुरुकुल कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, इंद्रप्रस्थ नगर, काशी पुनमचंद नगर, ओम नगर, आदर्श नगर, हनुमान नगर या शहराच्या पश्चिम भागात कच्चा रस्त्यांमुळे रहिवासी जाम वैतागले आहेत.शहराच्या पूर्व भागात न्यू लक्ष्मी नगर, हिंगलाज कॉलनी, गणपती नगर, शंकर नगर, हरिओम नगर, न्यू साईनगर, प्रभा नगर या नवीन वसाहतींमध्ये बुद्धा कच्चा रस्त्यांची समस्या नागरिकांना भेडसावत आहे.विशेष हे की नवीन वसाहतींमधील रहिवाशांनी वेळोवेळी रस्ते पक्के करण्यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाला निवेदने दिली आहेत, असे नागरिकांनी सांगितले.विशेषतः पावसाळ्यात चिखलातुन पाण्याची डबकी यातून नागरिकांना वृद्धांना शाळकरी मुलांना मार्ग काढावा लागतो.ह्यहरवली वाट ,सापडेना चाल, तरी म्हणा नव्या शतकाकडे वाटचालह्ण अशा संतप्त आशयाच्या प्रतिक्रिया पावसाळ्यामध्ये या नवीन वसाहतींमधील नागरिकांच्या ऐकायला मिळतात. आमच्या पेक्षा खेड्यातील लोक बरे कारण खेडोपाडी गावात पक्के रस्ते झाले आहेत पण एरंडोल हे तालुक्याचे नगरपालिकेचे कार्यक्षेत्राचे शहर असूनही याठिकाणी कच्चा रस्त्याची समस्या भेडसावत आहे ही मोठी दुर्दैवाची बाब आहे, असा सूर उमटत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाErandolएरंडोल