शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कच्चे रस्ते असलेले तालुक्याचे शहर एरंडोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 19:15 IST

सामान्यपणे तालुक्याच्या शहरात सर्वत्र पक्के रस्ते असतात.

एरंडोल : सामान्यपणे तालुक्याच्या शहरात सर्वत्र पक्के रस्ते असतात. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागात खेडोपाडी गावांतर्गत रस्ते पक्के झाले आहेत. मात्र एरंडोल येथे अजूनही नवीन वसाहतींमध्ये रस्ते कच्चे असल्याचे दिसून येते. सुमारे आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या या वसाहतींमध्ये कच्चे रस्ते असल्यामुळे अनेक अडचणींना रहिवाशांना सामोरे जावे लागते.एरंडोल हे तालुक्याचे खेडे वजा शहर आहे. गेल्या ४५ वर्षात येथे अनेक नवीन वसाहती अस्तित्वात आल्या. त्यात मूळ शहरालगत असलेल्या रामचंद्र नगर, पद्मावती पार्क व सावतामाळी नगर या भागात अजूनही मातीचे रस्ते आहेत. तसेच आनंद नगर, गुरुकुल कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, इंद्रप्रस्थ नगर, काशी पुनमचंद नगर, ओम नगर, आदर्श नगर, हनुमान नगर या शहराच्या पश्चिम भागात कच्चा रस्त्यांमुळे रहिवासी जाम वैतागले आहेत.शहराच्या पूर्व भागात न्यू लक्ष्मी नगर, हिंगलाज कॉलनी, गणपती नगर, शंकर नगर, हरिओम नगर, न्यू साईनगर, प्रभा नगर या नवीन वसाहतींमध्ये बुद्धा कच्चा रस्त्यांची समस्या नागरिकांना भेडसावत आहे.विशेष हे की नवीन वसाहतींमधील रहिवाशांनी वेळोवेळी रस्ते पक्के करण्यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाला निवेदने दिली आहेत, असे नागरिकांनी सांगितले.विशेषतः पावसाळ्यात चिखलातुन पाण्याची डबकी यातून नागरिकांना वृद्धांना शाळकरी मुलांना मार्ग काढावा लागतो.ह्यहरवली वाट ,सापडेना चाल, तरी म्हणा नव्या शतकाकडे वाटचालह्ण अशा संतप्त आशयाच्या प्रतिक्रिया पावसाळ्यामध्ये या नवीन वसाहतींमधील नागरिकांच्या ऐकायला मिळतात. आमच्या पेक्षा खेड्यातील लोक बरे कारण खेडोपाडी गावात पक्के रस्ते झाले आहेत पण एरंडोल हे तालुक्याचे नगरपालिकेचे कार्यक्षेत्राचे शहर असूनही याठिकाणी कच्चा रस्त्याची समस्या भेडसावत आहे ही मोठी दुर्दैवाची बाब आहे, असा सूर उमटत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाErandolएरंडोल