एरंडोल : कपाशीचे व्यापारी बाळू दामू पाटील यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात एरंडोल पोलिसांना यश मिळाले असून पप्पू उर्फ नगराज महाजन व पंकज सुरेश धनगर यांनी बाळूला काठीने मारहाण करून ठार केले व पोत्यात घालून पोते शिवून पाटाच्या वाहत्या पाण्यात टाकले. आधी बाळूचे प्रेत पाण्यात फेकलेव नंतर मोटारसायकल टाकली, असे तपासाअंती उघडकीस आले आहे.एरंडोल पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांनी दिलेली माहिती अशी की, आरोपींनी दुचाकीचे शेतात पेट्रोल संपले असे सांगून पप्पू महाजन याने बाळूच्या मोटारसायकलवर बसून पप्पूच्या शेतात नेले. त्याठिकाणी पप्पू व पंकज यांनी बाळूला मारायला सुरुवात केली व बांधाला लागून असलेल्या पठाणच्या शेतात बाळूला ठार केले व पोत्यात भरून पोते शिवले, नंतर पप्पूच्या दुचाकीवर बाळूचे प्रेत नेऊन पाटाच्या पाण्यात टाकले. नंतर त्याची दुचाकीही पाटात फेकली. ही घटना ३0 जानेवारी रोजी रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान घडली असल्याचे जबाब पोलिसांना मिळाले आहेत. दरम्यान, पंकज धनगर याला १0 फेब्रुवारी रोजी रात्री ९.२0 वाजता अटक करण्यात आली.मयताचा मोबाइल, मारेकर्याचा टी-शर्ट हस्तगत करण्यात आला आहे. अंजनी नदीच्या पुलाखाली रक्ताचे डाग असलेला टी-शर्ट पोलिसांना पप्पूने काढून दिला.जवखेडे शिवारातील बापू महाजन यांच्या शेतातील विहिरीतून मयताचा मोबाइल मिळून आला.पंकजला कोठडीपंकजला बुधवारी एरंडोल न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. आधीचे संशयित आरोपी सचिन मराठे व पप्पू यांची पोलीस कोठडी उद्या संपणार असल्याने त्यांना पुन्हा कोर्टासमोर उभे करून कोठडी मागण्यात येणार आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. पप्पूने पोलिसांना १२ हजार ९00 रुपये रोख काढून दिले. बाळूला ठार करण्यासाठी सचिनने पप्पू व पंकज यांना सुपारीदिली असावी असा संशय आहे. खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. आरोपींनी पाटाच्या पाण्यात टाकलेल्या काठय़ा व मयताचे बूट अजून सापडलेले नाही.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, पोलीस उपअधीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे, सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक एम.एस. बैसाणे व विजया अलोणे, दिनकर मांडोळे, मेहमूद पिंजारी, सुभाष धाबे हे तपास करीत आहेत. होमगार्ड छोटू पहेलवान यांनी विशेष सहकार्य केले.(वार्ताहर)
तडाखा..
धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ परिसरात मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे गव्हाचे पीक आडवे पडले आहे. बाळू दामू पाटील यांच्या खुनासाठी वापरलेले काही साहित्य अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यांचा शोध सुरू असून यात आणखी कुणाचा समावेश आहे काय? याचाही तपास सुरू आहे.