शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

समर्थ राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणातील भरीव कामगिरी तितकीच अत्यावश्यक - हर्षल विभांडीक यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 16:09 IST

समर्थ राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणातील भरीव कामगिरी तितकीच अत्यावश्यक असल्याचे डिजिटल शाळा उपक्रमाचे प्रणेते हर्षल विभांडीक यांनी येथे सांगितले.

ठळक मुद्देडिजिटल शाळा उपक्रमाचे प्रणेते हर्षल विभांडीक यांनी साधला संवादकळंत्री प्राथमिक विद्यालयाचे आयोजनसंस्थेच्या सर्व शाळांमध्ये डिजिटल शिक्षण देणार - नारायणदास अग्रवालविद्यार्थ्यांच्या अभिनव प्रगतीसाठीच डिजिटल शिक्षण - डॉ.सुनील राजपूत

चाळीसगाव, जि.जळगाव : समर्थ राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणातील भरीव कामगिरी तितकीच अत्यावश्यक असल्याचे डिजिटल शाळा उपक्रमाचे प्रणेते हर्षल विभांडीक यांनी येथे सांगितले.सी.आर.कळंत्री विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, भारत महासत्तेकडे वाटचाल करीत असून, देश प्रगतीपथावर नेण्यासाठी शिक्षण हा खरा केंद्रबिंदू राहिला आहे. शिक्षण क्षेत्रात दररोज काहीना काही नवीन घडत असते. त्या बदलाच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतातील शाळांना जगातील प्रगत देशातील शाळांशी जोडण्याची गरज आहे. जेणेकरुन बदलत्या जागतिक प्रवाहांशी त्यांची ओळख होईल. जिल्हा परिषदेसह अनेकविध भागातील मराठी माध्यमाची शाळा डिजीटल करणे हा त्यातीलच एक भाग राहिला आहे. शाळेत होत असलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक असे सर्वांगीण संस्कारक्षम उपक्रम हे प्रशंसनीय राहिले आहे. यातूनच भारताला जागतिक पातळीवर समर्थ राष्ट्र म्हणून उभे करायचे असेल तर शिक्षण क्षेत्रात भरीव काम केल्याशिवाय गत्यंतर नाही.यावेळी सी.आर.कळंत्री विद्यालयात डीजिटल कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल, सचिव डॉ.विनोद कोतकर, सी.आर.कळंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ.सुनील राजपूत, संचालक राजेंद्र चौधरी, मु.रा.अमृतकर, क.मा.राजपूत, सुरेश स्वार, योगेश अग्रवाल, प्राचार्य मिलिंद बिल्दीकर, मुख्याध्यापक प्रमोद दायमा आदी उपस्थित होते.महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मेहता आॅडीटोरीयम सभागृहात सोमवारी सकाळी ९ वाजता वर्षभरात शाळेमध्ये झालेल्या विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, आदर्श विद्यार्थी अशा सर्व क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रमोद दायमा यांनी, तर सूत्रसंचालन स्मिता चित्ते, मनीषा पाटील यांनी, तर दीपाली पाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव