शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

वारीला दिली पर्यावरणाची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 21:42 IST

मंगेश महाराज जोशी : मुक्ताई पालखीचे स्वागत जणू दिवाळी

चंद्रशेखर जोशीजळगाव : संत मुक्ताई पालखीचे हे १४७ वे वर्ष. संत आप्पा महाराज यांना झालेल्या दृष्टांतानंतर पालखीला सुरूवात झाली. गावागावात मुक्ताईची पालखी पोहोचते त्यावेळी प्रत्येक व्यक्तीत पांडुरंग अवतरल्याचा साक्षात्कार होतो. अतिशय आनंदाने, उत्साहाने पालखीचे स्वागत होते. वारीचे वैशिष्ठ्य म्हणजे वारीस पर्यावरणाची जोड देण्यात आल्याची माहिती श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.शनिवारी संत मुक्ताई राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. त्यामुळे मंगेश महाराज जोशी यांच्याशी झालेली बातचित पुढील प्रमाणे.प्रश्न : पालखीची सुरूवात कधी व कुणाच्या पुढाकारातून झाली ?मंगेश महाराज : १८७२ पासून संत मुक्ताई पालखीला प्रारंभ झाला. हे या पालखीचे १४७ वे वर्ष आहे. संत आप्पा महाराज यांना दृष्टांत झाला होता. त्यात त्यांना झालेल्या दृष्टांतानंतर वारीस प्रारंभ झाला.प्रश्न : पालखी ठिकठिकाणी जाते त्यावेळचा अनुभव काय?मंगेश महाराज : सुमारे एक हजार किलो मिटरचा प्रवास करत असताना गावागावात ज्या वेळी मुक्ताईची पालखी जाते त्यावेळी दिवाळीचा आनंद व्यक्तीव्यक्तीच्या चेहेऱ्यावर दिसतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, आदिशक्ती संत मुक्ताई की जय...आप्पा महाराज की जय.. अशा घोषणा व त्या साथीला टाळ- मृदुंगाचा गजर असे अतिशय उत्साही वातावरण गावागावात असते. काही ठिकाणी तर पालखीच्या स्वागतासाठी पायघड्या टाकल्या जातात. तो आनंद सोहळा असतो.प्रश्न : पालखीचे काही वैशिष्ठय असेल काय?मंगेश महाराज : निश्चितच. वारीत केवळ वृद्ध व्यक्ती असतात असे नाही. तरूण, तरूणी, महिला-पुरूष सर्व वयोगटातील व्यक्तींचा सहभाग यात असतो. सध्या पर्यावरणाचा झालेला -हास लक्षात घेऊन वन क्षेत्रातून पालखी जात असताना बिजारोपण आम्ही करणार आहोत. तीन-चार वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. पर्यावरण पुरकतेची जोड पालखी सोहळ्याला देण्यात आली आहे.कालानुरूप केले काही बदलपालखी सोहळ्याबाबत बोलताना मंगेश महाराज म्हणाले. कालानुरूप काही स्वागतार्ह बदल आपण केलेले आहेत. तीन-चार वर्षापूर्वी सर्व यात्रेकरूंना आंब्याच्या कोयी-चिकू, सीताफळ, जांभुळ आदी फळांच्या बिया घरून आणायला सांगून प्रवास मार्गात त्या बिया फेकत वाटचाल करतो. या उपक्रमामुळे वृक्षवल्ली वाढून त्यात दिंडीचे योगदान वाढणार आहे. तसेच ज्या मंदिरात दिंडीचा मुक्काम असेल तिथल्या देवतेला नवे कपडे आणि मंदिर स्वच्छता असा उपक्रम राबविण्यात येत असतो.प्रश्न : दिंडीच्या परंपरांबाबत काय सांगाल ?मंगेश महाराज : जळगाव ते पंढरपूरपर्यंत जाताना मुक्ताईचा प्रसाद म्हणून महाराज चुरमुºयाचा प्रसाद देत व येताना काल्याचा लाह्यांचा प्रसाद देत असत. तीन परंपरा आजही कायम आहे. पंढरपूर चिंचोली येथे संत निवृत्तीनाथ व मुक्ताईची पालखी एकत्र येते त्यावेळी पालखी भेटीचा सोहळा अवर्णनीय असतो.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव