शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

४२ कोटींचा संपूर्ण निधी रस्त्यावर खर्च होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांकडून मनपा प्रशासनासह विद्यमान व तत्कालीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांकडून मनपा प्रशासनासह विद्यमान व तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडेदेखील शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनपातील नवीन सत्ताधाऱ्यांनी ४२ कोटींमधील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कामांचे प्रस्ताव रद्द करून, त्या निधीतून सर्व कामे ही रस्त्यांची केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर नगरोत्थान अंतर्गत महापालिकेला १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. मात्र या निधीतून तत्कालीन सत्ताधाऱ्यांना दोन वर्षांत कामेदेखील सुचविता आलेली नव्हती. त्यातच महापालिकेने शंभर कोटी रुपयांचा कामाचे प्रत्येकी ५०-५० कोटी रुपयांचे दोन प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले होते. मात्र, यामधील केवळ ४२ कोटींच्या कामांना शासनाकडून मंजुरी मिळाली होती. त्यातच राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ४२ कोटींच्या कामांसह उर्वरित ५८ कोटींच्या कामांनाही राज्यशासनाने स्थगिती आणली होती. आता महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्याने या ४२ कोटींच्या कामावरील स्थगिती उठण्याची शक्यता आहे.

कंपाउंड वॉल, चैनलिंक फेन्सिंगची अनावश्यक कामे रद्द करणार

१. शहरात मुख्य समस्या ही रस्त्यांची आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी म्हणून आमची जबाबदारी शहरातील रस्त्यांची दुरवस्था सुधारण्याची आहे, अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी लोकमतला दिली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ४२ कोटींचा निधीमधील तब्बल २२ कोटींची तरतूद कंपाउंड वॉल तयार करणे, खुल्या भूखंडांना चैनलिंक फेन्सिंग बसविणे अशा कामांवर केली होती.

२. तर शहरातील नागरिक ज्या समस्येने ग्रासलेले आहेत त्या रस्त्यांच्या समस्यांसाठी केवळ १६ कोटींची तरतूद तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केली होती. मात्र शहरातील मुख्य समस्या ओळखून या निधीमधील अनावश्यक कामे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता या ४२ कोटींचा निधीमधील सर्व कामे ही शहरातील रस्त्यांची करण्यात येणार असल्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

३. याबाबत नवीन कामांसाठी प्रस्ताव मागवण्याचे काम सुरू झाले असून, पुढील महासभेत याबाबतचा ठराव करण्यात येईल, अशीही माहिती माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली. यासह उर्वरित ५८ कोटींच्या निधी मधीलदेखील अनावश्यक कामे रद्द करण्यात येतील व नगरोत्थानच्या संपूर्ण १०० कोटींच्या निधीमधून केवळ शहरातील रस्त्यांची कामे केली जातील अशीही माहिती नितीन लढ्ढा यांनी दिली.

त्या ७० कोटींच्या रस्त्यांचे कामाचे अंदाजपत्रक रखडले

शहरातील रस्त्यांच्या समस्येबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्यानंतर तत्कालीन भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी सप्टेंबर २०२० व फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत शहरात मनपा फंडातून ७० कोटींच्या निधीतून नवीन रस्ते तयार करण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यादृष्टीने महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून नवीन रस्त्यांच्या कामासाठी अंदाजपत्रकदेखील तयार करण्याचे काम सुरू झाले होते. मात्र मनपात सत्तांतर झाल्यानंतर हे कामदेखील आता रखडले आहे. तसेच मनपा फंडातून होणाऱ्या कामासाठी स्थानिक ठेकेदाराने कडून फारसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी होती. यामुळे आमदार सुरेश भोळे यांनी मुंबई येथील एका खासगी ठेकेदाराला हे काम देण्याबाबतचा प्रस्तावदेखील मनपा प्रशासनाकडे दिला होता. मात्र मनपा सत्तांतर झाल्यामुळे हे पूर्ण काम रखडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.