शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअर्स डे विशेष : अभियांत्रिकी क्षेत्र अधिक विस्तारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 14:30 IST

नॅनोटेक्नॉलॉजीलाही आगामी काळात महत्व असेल, असा सूर अभियंत्यांनी 'इंजिनिअर्स डे'च्या पूर्वसंध्येला सोमवारी 'लोकमत'शी बोलताना ऐकवला.

ठळक मुद्देमुलींचेही प्रमाण वाढलेनॅनोटेक्नॉलॉजी होणार व्यापक अभियंत्यांचा सूर

जिजाबराव वाघ ।चाळीसगाव, जि.जळगाव : तंत्रज्ञानाच्या कक्षा झपाट्याने विस्तारल्या जात आहे. याला कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. अभियांत्रिकी क्षेत्राच्या परिघातही असे अनेकविध नवे बदल दिसून येत आहे. मुलींचादेखील या क्षेत्राकडे ओढा वाढला आहे. नॅनोटेक्नॉलॉजीलाही आगामी काळात महत्व असेल, असा सूर अभियंत्यांनी 'इंजिनिअर्स डे'च्या पूर्वसंध्येला सोमवारी 'लोकमत'शी बोलताना ऐकवला.प्रसिद्ध अभियंते भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस 'अभियंता दिन' म्हणून साजरा केला जातो. गत १० वर्षात अभियांत्रिकी वर्तुळात मोठे बदल झाले आहे. अभ्यासक्रम स्मार्ट झाला आहे. त्यामुळे कामाच्या पद्धतीतदेखील बदल अधोरेखित झाले. मात्र संगणकाचा शिरकाव झाल्याने कठोर मेहनत, ड्राईंगसाठी हातांचा उपयोग कमी झाला आहे. पूर्वी एखाद्या ड्राईंगमध्ये काही चूक असल्यास ते नवीन रेखाटण्याशिवाय पर्याय नव्हता. तथापि, संगणक, इंटनेटमुळे यावर मात करता आली आहे. 'अ‍ॅटोकॅड' सॉफ्टवेअरमुळे एकच ड्राईंग पुन्हा पुन्हा वापरणे शक्य झाले आहे. असे अनेक नावीन्यपूर्ण बदल यात झाले आहे. मात्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव जाणवतो, असे निरीक्षणही अभियंत्यांनी नोंदविले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील गुणांमुळे 'उत्तीर्ण' होणे सोपे झाले असल्याचेही अभियंत्यांचे म्हणणे आहे.अ‍ॅडव्हान्स नॅनोटेक्नॉलॉजीचा वापरपूर्वी मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स व सिव्हील या तीन शाखांचा अभियांत्रिकीमध्ये समावेश होता. अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध नव्हती. गेल्या काही वर्षात या खिडक्या उघडल्या असून हे क्षेत्र अधिक विकसित होत आहे. अगामी काळात नॅनोटेक्नॉलॉजी, मेकॅक्ट्रॉनिक्स आणि मल्टिटास्किंग पद्धतीतील बदल आणि इन्फ्रास्ट्रक्चरमधील विकास असणार आहे. त्यामुळे गुणवत्ताधारक आणि परिश्रम करण्याची तयारी असणाºया तरुणांसाठी ही मोठी संधी असणार आहे.विषयांची संख्या वाढलीअभियंत्यांमुळे देश ओळखला जात आहे. विषयांची संख्या वाढली आहे. कृषी, पर्यावरण क्षेत्रातही अभियांत्रिकी पाऊलखुणा उमटू लागल्या आहे. ‘आयटी’तील प्रगतीमुळे वेगाने बदलही होत आहे.पुढील काळात गुणवत्ताप्रधान व पर्यावरणाचा समतोल राखणारे बदलही अभियांत्रिकीत अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवणे व योग्य मनुष्यबळ निर्मितीला महत्व असणार आहे. मायक्रो प्रॉडक्टव्दारे अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाºया नॅनोटेक्नॉलॉजीला महत्व असेल.थ्रो आऊटचा शिरकाव अभियांत्रिकी क्षेत्रातही झाला आहे. त्यामुळे पुढील काळात मोठ्या संगणकांची गरज भासणार नाही. हातात मावेल असे अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल. त्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्याची मुभा असावी, अशी अपेक्षादेखील अभियंत्यांनी व्यक्त केली.स्पर्धा परीक्षांकडे अधिक कलअभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढल्याने इंजिनिअर्सचे लोंढे बाहेर पडत आहे. हुशार आणि चतुरस्र इंजिनिअर्स स्पर्धा परीक्षांची वाट धरतात. त्यामुळे या क्षेत्रातील गुणवत्ताधारक मनुष्यबळ कमी होत आहे. इंजिनिअर्सची संख्या वाढल्याने बेरोजगारीची समस्या ऐरणीवर आली आहे. लॉकडाऊनचा फटकाही दीर्घ काळ जाणवणार आहे.- सुधाकर पालवे, सिव्हील इंजिनिअर्स, चाळीसगाव.बांधकाम क्षेत्रात झाले बदलअभियांत्रीकीतील नावीन्यपूर्ण बदलांचे ठसे बांधकाम क्षेत्रात उमटले आहे. सॅटेलाईटव्दारे सर्वेक्षण, कमी मनुष्यबळाचा वापर करुन धरणे, रस्ते, मोठे प्रकल्प उभारले जात आहे. यामुळे शासनाच्या पैशांसह वेळेचीही बचत होत आहे. बांधकांमध्ये यंत्राचा वापर होऊ लागल्याने कामे लवकर होताहेत. लॉकडाऊनमुळे घडी विस्कटली आहे.- सुनील बी. भावसार, सिव्हील इंजिनिअर्स, चाळीसगाव.