शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

मे अखेर मनपाचे ५४ कर्मचारी होणार निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:12 IST

आधीच एक हजारहून जागा आहेत रिक्त

जळगाव : महापालिकेत कर्मचाऱ्यांची कमतरता असताना दुसरीकडे ३१ मे पर्यंत मनपाचे ५४ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे मनपाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाच वर्षापूर्वी स्थायी समितीच्या मंजुूरीने शासनाकडे पाठविण्यात आलेल्या २५८२ पदांच्या आकृतीबंधाला अद्याप मान्यता मिळालेली नाही.मनपात प्रत्येक वर्षी ७० हून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. एकूण २८०० कर्मचाºयांची गरज असताना मनपात सध्या १७५० कर्मचारी कार्यरत आहेत. तब्बल १ हजारहून अधिक कर्मचाºयांच्या जागा रिक्त आहेत.कर्मचारीअभावी मनपातील अनेक कामांवर परिणाम झालेला दिसून येत आहे. मनपाचे क्षेत्र प्रत्येकवर्षी वाढत आहे. मात्र, कर्मचारी संख्या प्रत्येक वर्षी कमी होत आहे.२०११ मध्येच १११ जणांची केली होती भरतीमनपाची २००३ मध्ये स्थापना झाल्यानंतर केवळ २०११ मध्ये १११ जणांची भरती केली असून, त्या ऐवजी एकही वेळेस रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत.महापालिका झाल्यानतंर आस्थापनेतील कर्मचाºयांचा विभागनिहाय आकृतीबंधात देखील बदल करणे आवश्यक होते. मात्र, १५ वर्षांपासून मनपाने यामध्ये बदल देखील केला नाही. राजेंद्र पाटील आस्थापना अधिक्षक असताना महापालिका कर्मचाºयांचा आकृतीबंध तयार करण्यात आला.आकृतीबंध मान्यतेसाठी सभेत ठेवण्यात आला होता. त्यात दुरुस्ती करीत पदवीधर विधी विभागात शाखा प्रमुख, अधीक्षक, लिपीक व शिपाई यांची पदे वाढविण्यात आली. नगरसचिव विभागात २ लिपीक वाढविण्यात आले.प्रभाग समितीमध्ये ४८ ऐवजी ५२ लिपीक, ३७ ऐवजी ५३ शिपाई अशी दुरुस्ती सुचविण्यात आली होती.मनपातील कर्मचाºयांना दिले जाताहेत पदेमनपात अनेक कर्मचाºयांसह अधिकाºयांची पदे देखील रिक्त आहेत. यामध्ये अप्पर आयुक्त पद, १ उपायुक्त, ३ सहाय्यक उपायुक्त, मुख्य लेखापरीक्षक, नगरसचिव, आरोग्य अधिकारी, वाहन विभाग प्रमुख अशी अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांवर मनपाकडून मनपातील क्लार्क, लिपीक, अभियंताना ही पदे देण्यात आली आहे. अनेकदा पात्र नसलेल्या महापालिकेतील कर्मचाºयांना पदभार देवून प्रभारी कारभारी करुन काम रेटून नेले जात असल्याचे भयंकर चित्र मनपात अनेक वर्षांपासून पहायला मिळत आहे. बहुतांश कारभारी प्रभारी असल्याने प्रशासकीय कामकाजात शिथिलता आली आहे.कंत्राट पध्दतीने भरणार जागाशासनाकडून आकृतीबंधाला मंजूरी मिळाली नसल्याने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत रिक्त जागा भरण्यासाठी कंत्राटीपध्दतीने कर्मचारी भरण्याचा ठराव करण्यात आला आहे. दरम्यान, या ठरावावर अंतीम प्रक्रिया झाली नसून, या प्रक्रियेला अजून सहा महिन्यांचा काळ जाणार आहे. कंत्राटी पध्दतीने कर्मचाºयांचा जागा भरल्या तर मनपाच्या कामात सुसुत्रता येण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव