शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

मे अखेर मनपाचे ५४ कर्मचारी होणार निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:12 IST

आधीच एक हजारहून जागा आहेत रिक्त

जळगाव : महापालिकेत कर्मचाऱ्यांची कमतरता असताना दुसरीकडे ३१ मे पर्यंत मनपाचे ५४ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे मनपाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाच वर्षापूर्वी स्थायी समितीच्या मंजुूरीने शासनाकडे पाठविण्यात आलेल्या २५८२ पदांच्या आकृतीबंधाला अद्याप मान्यता मिळालेली नाही.मनपात प्रत्येक वर्षी ७० हून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. एकूण २८०० कर्मचाºयांची गरज असताना मनपात सध्या १७५० कर्मचारी कार्यरत आहेत. तब्बल १ हजारहून अधिक कर्मचाºयांच्या जागा रिक्त आहेत.कर्मचारीअभावी मनपातील अनेक कामांवर परिणाम झालेला दिसून येत आहे. मनपाचे क्षेत्र प्रत्येकवर्षी वाढत आहे. मात्र, कर्मचारी संख्या प्रत्येक वर्षी कमी होत आहे.२०११ मध्येच १११ जणांची केली होती भरतीमनपाची २००३ मध्ये स्थापना झाल्यानंतर केवळ २०११ मध्ये १११ जणांची भरती केली असून, त्या ऐवजी एकही वेळेस रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत.महापालिका झाल्यानतंर आस्थापनेतील कर्मचाºयांचा विभागनिहाय आकृतीबंधात देखील बदल करणे आवश्यक होते. मात्र, १५ वर्षांपासून मनपाने यामध्ये बदल देखील केला नाही. राजेंद्र पाटील आस्थापना अधिक्षक असताना महापालिका कर्मचाºयांचा आकृतीबंध तयार करण्यात आला.आकृतीबंध मान्यतेसाठी सभेत ठेवण्यात आला होता. त्यात दुरुस्ती करीत पदवीधर विधी विभागात शाखा प्रमुख, अधीक्षक, लिपीक व शिपाई यांची पदे वाढविण्यात आली. नगरसचिव विभागात २ लिपीक वाढविण्यात आले.प्रभाग समितीमध्ये ४८ ऐवजी ५२ लिपीक, ३७ ऐवजी ५३ शिपाई अशी दुरुस्ती सुचविण्यात आली होती.मनपातील कर्मचाºयांना दिले जाताहेत पदेमनपात अनेक कर्मचाºयांसह अधिकाºयांची पदे देखील रिक्त आहेत. यामध्ये अप्पर आयुक्त पद, १ उपायुक्त, ३ सहाय्यक उपायुक्त, मुख्य लेखापरीक्षक, नगरसचिव, आरोग्य अधिकारी, वाहन विभाग प्रमुख अशी अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांवर मनपाकडून मनपातील क्लार्क, लिपीक, अभियंताना ही पदे देण्यात आली आहे. अनेकदा पात्र नसलेल्या महापालिकेतील कर्मचाºयांना पदभार देवून प्रभारी कारभारी करुन काम रेटून नेले जात असल्याचे भयंकर चित्र मनपात अनेक वर्षांपासून पहायला मिळत आहे. बहुतांश कारभारी प्रभारी असल्याने प्रशासकीय कामकाजात शिथिलता आली आहे.कंत्राट पध्दतीने भरणार जागाशासनाकडून आकृतीबंधाला मंजूरी मिळाली नसल्याने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत रिक्त जागा भरण्यासाठी कंत्राटीपध्दतीने कर्मचारी भरण्याचा ठराव करण्यात आला आहे. दरम्यान, या ठरावावर अंतीम प्रक्रिया झाली नसून, या प्रक्रियेला अजून सहा महिन्यांचा काळ जाणार आहे. कंत्राटी पध्दतीने कर्मचाºयांचा जागा भरल्या तर मनपाच्या कामात सुसुत्रता येण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव