शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
4
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
5
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
6
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
7
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
8
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
9
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
10
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
11
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
12
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
13
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
14
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
15
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
16
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
17
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
18
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
19
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
20
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

मे अखेर मनपाचे ५४ कर्मचारी होणार निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:12 IST

आधीच एक हजारहून जागा आहेत रिक्त

जळगाव : महापालिकेत कर्मचाऱ्यांची कमतरता असताना दुसरीकडे ३१ मे पर्यंत मनपाचे ५४ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे मनपाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाच वर्षापूर्वी स्थायी समितीच्या मंजुूरीने शासनाकडे पाठविण्यात आलेल्या २५८२ पदांच्या आकृतीबंधाला अद्याप मान्यता मिळालेली नाही.मनपात प्रत्येक वर्षी ७० हून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. एकूण २८०० कर्मचाºयांची गरज असताना मनपात सध्या १७५० कर्मचारी कार्यरत आहेत. तब्बल १ हजारहून अधिक कर्मचाºयांच्या जागा रिक्त आहेत.कर्मचारीअभावी मनपातील अनेक कामांवर परिणाम झालेला दिसून येत आहे. मनपाचे क्षेत्र प्रत्येकवर्षी वाढत आहे. मात्र, कर्मचारी संख्या प्रत्येक वर्षी कमी होत आहे.२०११ मध्येच १११ जणांची केली होती भरतीमनपाची २००३ मध्ये स्थापना झाल्यानंतर केवळ २०११ मध्ये १११ जणांची भरती केली असून, त्या ऐवजी एकही वेळेस रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत.महापालिका झाल्यानतंर आस्थापनेतील कर्मचाºयांचा विभागनिहाय आकृतीबंधात देखील बदल करणे आवश्यक होते. मात्र, १५ वर्षांपासून मनपाने यामध्ये बदल देखील केला नाही. राजेंद्र पाटील आस्थापना अधिक्षक असताना महापालिका कर्मचाºयांचा आकृतीबंध तयार करण्यात आला.आकृतीबंध मान्यतेसाठी सभेत ठेवण्यात आला होता. त्यात दुरुस्ती करीत पदवीधर विधी विभागात शाखा प्रमुख, अधीक्षक, लिपीक व शिपाई यांची पदे वाढविण्यात आली. नगरसचिव विभागात २ लिपीक वाढविण्यात आले.प्रभाग समितीमध्ये ४८ ऐवजी ५२ लिपीक, ३७ ऐवजी ५३ शिपाई अशी दुरुस्ती सुचविण्यात आली होती.मनपातील कर्मचाºयांना दिले जाताहेत पदेमनपात अनेक कर्मचाºयांसह अधिकाºयांची पदे देखील रिक्त आहेत. यामध्ये अप्पर आयुक्त पद, १ उपायुक्त, ३ सहाय्यक उपायुक्त, मुख्य लेखापरीक्षक, नगरसचिव, आरोग्य अधिकारी, वाहन विभाग प्रमुख अशी अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांवर मनपाकडून मनपातील क्लार्क, लिपीक, अभियंताना ही पदे देण्यात आली आहे. अनेकदा पात्र नसलेल्या महापालिकेतील कर्मचाºयांना पदभार देवून प्रभारी कारभारी करुन काम रेटून नेले जात असल्याचे भयंकर चित्र मनपात अनेक वर्षांपासून पहायला मिळत आहे. बहुतांश कारभारी प्रभारी असल्याने प्रशासकीय कामकाजात शिथिलता आली आहे.कंत्राट पध्दतीने भरणार जागाशासनाकडून आकृतीबंधाला मंजूरी मिळाली नसल्याने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत रिक्त जागा भरण्यासाठी कंत्राटीपध्दतीने कर्मचारी भरण्याचा ठराव करण्यात आला आहे. दरम्यान, या ठरावावर अंतीम प्रक्रिया झाली नसून, या प्रक्रियेला अजून सहा महिन्यांचा काळ जाणार आहे. कंत्राटी पध्दतीने कर्मचाºयांचा जागा भरल्या तर मनपाच्या कामात सुसुत्रता येण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव