शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरातील स्थिती : कट्टर समर्थक आणि नंतर कट्टर वैरीही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:43 IST

अनिल पाटील, उदय वाघ यांच्यात होती स्पर्धा

जळगाव : एकेकाळी माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ गेल्या काही वर्षात अमळनेरातील स्थानिक व जिल्ह्यातील पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे इतके दूर गेले की आजच्या स्थितीत दोघे एकमेकांचे कट्टर वैरी अशीच ओळख दोघांबाबत सांगितली जात आहे. त्याचे पर्यावसान अमळनेरातील व्यासपीठावरील हाणामारीत झाल्याचे समोर आले आहे.अमळनेरातील राजकीय वाटचालीचा विचार करता डॉ. बी.एस. पाटील हे १९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर सलग तीन पंचवार्षिक ते या मतदार संघातून आमदार होते. १९९५ च्या कालखंडात त्यांचे उजवे व डावे म्हणून परिचित होते ते अनिल भाईदास पाटील व भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे दोघे.बी.एस.पाटील-उदय वाघ विळ्या भोपळ्याचे नाते१९९५ नंतर हळू हळू उदय वाघ व अनिल पाटील यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. ते इतके वाढले की उदय वाघ हे डॉ. बी.एस. पाटील यांच्यापासून दूर जाण्यास सुरूवात झाली. त्यांनी तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जवळ जाण्यास सुरूवात केली. त्यानंतर बी.एस.पाटील हे भाजपाचे जिल्हाध्यक्षही झाले. त्यांना पक्षाने २००७ मध्ये झालेल्या एरंडोल लोकसभा निवडणुकीची उमेदवारीही दिली होती मात्र ते त्यावेळी पराभूत झाले. दरम्यान भाजपातील पक्षांतर्गत राजकारणात गटबाजी वाढत गेली. यात डॉ. बी.एस. पाटील, अनिल भाईदास पाटील व उदय वाघ असे तीन गट निर्माण झाले व तिघांमधील वितुष्ट हे टोकाला गेले. पक्षांतर्गत कलहामुळे व उदय वाघ यांचे पारडे पक्षात जड झाल्याने दुखावलेले डॉ. बी.एस. पाटील यांनी भाजपाला त्यागून काही काळ कॉँग्रेसमध्ये घालविला. नंतर ते पुन्हा स्वगृही परतले.स्मिता वाघ यांच्या उमेदवारीने नाराजीलोकसभा निवडणुकीत पक्षाने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यावर पक्षांतर्गत जणू उद्रेकच झाला. स्वत: गिरीश महाजन हेदेखील नाराज होते. उमेदवारी डावलली गेल्याने खासदार ए.टी. पाटील यांनी याबाबतच्या कटाचा आरोप उदय वाघ यांच्यावरच केला होता. त्या पाठोपाठ बी.एस. पाटील यांनी ए.टी. पाटील यांना समर्थन दिले. अमळनेरातून भाजपाचे सहयोगी आमदार शिरीष पाटील यांनीही बंडाचे निशाण हाती घेतले होते. या सर्व नाराजीचे पर्यावसान स्मिता वाघ यांची उमेदवारी कापली गेली. तेव्हापासून उदय व स्मिता वाघ हे नाराज होते. पक्षाच्या कार्यक्रमांना जाणेही त्यांनी टाळले. मात्र अमळनेरात मेळावा असल्याने उदय वाघ हे अमळनेरला आले. बी.एस. पाटील यांना व्यासपीठावर घेण्यास त्यांचा विरोध होता मात्र गिरीश महाजन यांनी डॉ. पाटील यांना व्यासपीठावर घेतले व त्यातूनच हाणामारीचा प्रकार घडला.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव