शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

अमळनेरातील स्थिती : कट्टर समर्थक आणि नंतर कट्टर वैरीही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:43 IST

अनिल पाटील, उदय वाघ यांच्यात होती स्पर्धा

जळगाव : एकेकाळी माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ गेल्या काही वर्षात अमळनेरातील स्थानिक व जिल्ह्यातील पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे इतके दूर गेले की आजच्या स्थितीत दोघे एकमेकांचे कट्टर वैरी अशीच ओळख दोघांबाबत सांगितली जात आहे. त्याचे पर्यावसान अमळनेरातील व्यासपीठावरील हाणामारीत झाल्याचे समोर आले आहे.अमळनेरातील राजकीय वाटचालीचा विचार करता डॉ. बी.एस. पाटील हे १९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर सलग तीन पंचवार्षिक ते या मतदार संघातून आमदार होते. १९९५ च्या कालखंडात त्यांचे उजवे व डावे म्हणून परिचित होते ते अनिल भाईदास पाटील व भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे दोघे.बी.एस.पाटील-उदय वाघ विळ्या भोपळ्याचे नाते१९९५ नंतर हळू हळू उदय वाघ व अनिल पाटील यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. ते इतके वाढले की उदय वाघ हे डॉ. बी.एस. पाटील यांच्यापासून दूर जाण्यास सुरूवात झाली. त्यांनी तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जवळ जाण्यास सुरूवात केली. त्यानंतर बी.एस.पाटील हे भाजपाचे जिल्हाध्यक्षही झाले. त्यांना पक्षाने २००७ मध्ये झालेल्या एरंडोल लोकसभा निवडणुकीची उमेदवारीही दिली होती मात्र ते त्यावेळी पराभूत झाले. दरम्यान भाजपातील पक्षांतर्गत राजकारणात गटबाजी वाढत गेली. यात डॉ. बी.एस. पाटील, अनिल भाईदास पाटील व उदय वाघ असे तीन गट निर्माण झाले व तिघांमधील वितुष्ट हे टोकाला गेले. पक्षांतर्गत कलहामुळे व उदय वाघ यांचे पारडे पक्षात जड झाल्याने दुखावलेले डॉ. बी.एस. पाटील यांनी भाजपाला त्यागून काही काळ कॉँग्रेसमध्ये घालविला. नंतर ते पुन्हा स्वगृही परतले.स्मिता वाघ यांच्या उमेदवारीने नाराजीलोकसभा निवडणुकीत पक्षाने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यावर पक्षांतर्गत जणू उद्रेकच झाला. स्वत: गिरीश महाजन हेदेखील नाराज होते. उमेदवारी डावलली गेल्याने खासदार ए.टी. पाटील यांनी याबाबतच्या कटाचा आरोप उदय वाघ यांच्यावरच केला होता. त्या पाठोपाठ बी.एस. पाटील यांनी ए.टी. पाटील यांना समर्थन दिले. अमळनेरातून भाजपाचे सहयोगी आमदार शिरीष पाटील यांनीही बंडाचे निशाण हाती घेतले होते. या सर्व नाराजीचे पर्यावसान स्मिता वाघ यांची उमेदवारी कापली गेली. तेव्हापासून उदय व स्मिता वाघ हे नाराज होते. पक्षाच्या कार्यक्रमांना जाणेही त्यांनी टाळले. मात्र अमळनेरात मेळावा असल्याने उदय वाघ हे अमळनेरला आले. बी.एस. पाटील यांना व्यासपीठावर घेण्यास त्यांचा विरोध होता मात्र गिरीश महाजन यांनी डॉ. पाटील यांना व्यासपीठावर घेतले व त्यातूनच हाणामारीचा प्रकार घडला.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव