शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

अमळनेरातील स्थिती : कट्टर समर्थक आणि नंतर कट्टर वैरीही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:43 IST

अनिल पाटील, उदय वाघ यांच्यात होती स्पर्धा

जळगाव : एकेकाळी माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ गेल्या काही वर्षात अमळनेरातील स्थानिक व जिल्ह्यातील पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे इतके दूर गेले की आजच्या स्थितीत दोघे एकमेकांचे कट्टर वैरी अशीच ओळख दोघांबाबत सांगितली जात आहे. त्याचे पर्यावसान अमळनेरातील व्यासपीठावरील हाणामारीत झाल्याचे समोर आले आहे.अमळनेरातील राजकीय वाटचालीचा विचार करता डॉ. बी.एस. पाटील हे १९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर सलग तीन पंचवार्षिक ते या मतदार संघातून आमदार होते. १९९५ च्या कालखंडात त्यांचे उजवे व डावे म्हणून परिचित होते ते अनिल भाईदास पाटील व भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे दोघे.बी.एस.पाटील-उदय वाघ विळ्या भोपळ्याचे नाते१९९५ नंतर हळू हळू उदय वाघ व अनिल पाटील यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. ते इतके वाढले की उदय वाघ हे डॉ. बी.एस. पाटील यांच्यापासून दूर जाण्यास सुरूवात झाली. त्यांनी तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जवळ जाण्यास सुरूवात केली. त्यानंतर बी.एस.पाटील हे भाजपाचे जिल्हाध्यक्षही झाले. त्यांना पक्षाने २००७ मध्ये झालेल्या एरंडोल लोकसभा निवडणुकीची उमेदवारीही दिली होती मात्र ते त्यावेळी पराभूत झाले. दरम्यान भाजपातील पक्षांतर्गत राजकारणात गटबाजी वाढत गेली. यात डॉ. बी.एस. पाटील, अनिल भाईदास पाटील व उदय वाघ असे तीन गट निर्माण झाले व तिघांमधील वितुष्ट हे टोकाला गेले. पक्षांतर्गत कलहामुळे व उदय वाघ यांचे पारडे पक्षात जड झाल्याने दुखावलेले डॉ. बी.एस. पाटील यांनी भाजपाला त्यागून काही काळ कॉँग्रेसमध्ये घालविला. नंतर ते पुन्हा स्वगृही परतले.स्मिता वाघ यांच्या उमेदवारीने नाराजीलोकसभा निवडणुकीत पक्षाने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यावर पक्षांतर्गत जणू उद्रेकच झाला. स्वत: गिरीश महाजन हेदेखील नाराज होते. उमेदवारी डावलली गेल्याने खासदार ए.टी. पाटील यांनी याबाबतच्या कटाचा आरोप उदय वाघ यांच्यावरच केला होता. त्या पाठोपाठ बी.एस. पाटील यांनी ए.टी. पाटील यांना समर्थन दिले. अमळनेरातून भाजपाचे सहयोगी आमदार शिरीष पाटील यांनीही बंडाचे निशाण हाती घेतले होते. या सर्व नाराजीचे पर्यावसान स्मिता वाघ यांची उमेदवारी कापली गेली. तेव्हापासून उदय व स्मिता वाघ हे नाराज होते. पक्षाच्या कार्यक्रमांना जाणेही त्यांनी टाळले. मात्र अमळनेरात मेळावा असल्याने उदय वाघ हे अमळनेरला आले. बी.एस. पाटील यांना व्यासपीठावर घेण्यास त्यांचा विरोध होता मात्र गिरीश महाजन यांनी डॉ. पाटील यांना व्यासपीठावर घेतले व त्यातूनच हाणामारीचा प्रकार घडला.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव