शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ओबीसींच्या आरक्षणासाठी आज होणार एल्गार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी ओबीसी आरक्षण हे ५० टक्क्यांपेक्षा जास्त देता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी ओबीसी आरक्षण हे ५० टक्क्यांपेक्षा जास्त देता येणार नाही, असा निर्णय दिला. त्यानंतर पुन्हा ओबीसींच्या आरक्षणाचा गदारोळ उठला आहे. राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आता ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी शनिवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान जळगाव येथील राजे संभाजी नाट्यगृहात आरक्षण हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेच्या निमंत्रक व लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी सांगितले की, सरकारने १९५३ मध्ये कालेलकर आयोगाची स्थापना केली होती. त्यानंतर १९५५ला या आयोगाने आपला अहवाल सरकार दिला. त्यात देशातील २३९९ जाती मागासलेल्या आहेत, तर ८३७ जाती या अतिमागासवर्गीय असल्याची नोंद करण्यात आली आहे. या आयोगाने अनेक महत्त्वाच्या शिफारशी केल्या. मात्र अहवाल सादर केल्यावर आयोगाच्या अध्यक्षांनी राष्ट्रपतींना एक पत्र देत सूचनांना सुरुंग लावला. त्यामुळे अहवाल गुंडाळला गेला. आणि नंतर ओबीसींच्या सामाजिक न्यायाचा प्रश्न हा राज्य सरकारकडे सोपवण्यात आला.’

१९६१ मध्ये ओबीसी समाजासाठीचा पहिला आयोग बी.डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेत नेमला गेला. त्या आयोगाने ओबीसींना दहा टक्के आरक्षण दिले. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ४६ टक्के आरक्षण दिले. मात्र आर्थिक आरक्षण न्यायालयात टिकले नाही. आणि ओबीसींना १० टक्के ऐवजी ३१ टक्के आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली होती. १९७७ मध्ये जनता पक्षाने ओबीसींच्या संघर्षाची दखल घेत मंडल आयोगाची स्थापना केली. मात्र ओबीसी जात समूहांची जातनिहाय लोकसंख्या सरकारने कधीच गोळा केली नाही. मंडल आयोगाला अभ्यास करतांना १९३३ मध्ये एकमेव जातनिहाय जनगणनेचा आधार घेऊन ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्के आहे, हे ठरवावे लागेल. मंडल आयोगाचा अहवाल १९९० मध्ये लागू करण्यात आला. त्यावेळीदेखील ओबीसींना ३२ टक्के आरक्षण देण्यात आले. आता मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे. २०१७ मध्ये केंद्र सरकारने रोहिणी आयोगाला दिला आणि ओबीसी आरक्षण चार श्रेणीत विभागण्याचा घाट घातला गेला. त्यामुळे कदाचित भविष्यात ओबीसींच्या शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षणावरदेखील गदा येऊ शकते, असेही प्रतिभा शिंदे यांनी म्हटले आहे.

या परिषदेला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार कपिल पाटील, माजी आमदार रामहरी रुपणवार यांच्यासह इतर नेतेदेखील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोट :

ओबीसी आरक्षणाच्या हक्कासाठी संसदीय मार्गाने लढायचे आहे. सोबतच ओबीसी या शब्दामागची अस्मिता समजून घेत, येथील शोषणवादी व्यवस्थेला नेस्तनाबुत करण्याची लढाई पुन्हा नव्याने लढण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व ओबीसींनी एकत्र आले पाहिजे.

- प्रतिभा शिंदे, निमंत्रक, ओबीसी समाज समन्वय समिती.