शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

पोलिस भरतीमध्ये अचूक नोंदणीसाठी होणार इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर - डॉ. महेश्वर रेड्डी

By विजय.सैतवाल | Updated: June 15, 2024 21:56 IST

१३७ जागांसाठी ६५५७ अर्ज : १९ जूनपासून चाचणीसह लेखी परीक्षा

जळगाव : पोलिस दलामध्ये भरती प्रक्रिया राबविली जात असून जळगाव जिल्ह्यात १३७ जागांसाठी १९ जूनपासून शारीरिक चाचण्यांना सुरुवात होणार आहे. यासाठी सहा हजार ५५७ अर्ज आलेले असून २५ जूनपर्यंत चाचण्या पूर्ण होतील. यातील उत्तीर्ण उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. चाचण्यांच्या अचूक नोंदणीसाठी या वेळी इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर होणार असून यातून थोडीही तफावत राहणार नाही, असा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी व्यक्त केला. पोलिस भरतीसंदर्भात माहिती देण्यासाठी शनिवार, १५ जून रोजी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांची पत्रकार परिषद झाली. त्या वेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली.

पहिले सहा दिवस पुरुष व सातव्या दिवशी महिला उमेदवारांची चाचणी

पोलिस भरतीसाठी १९ जूनपासून चाचण्यांना सुरुवात होणार आहे. यामध्ये पहाटे साडेचार वाजता उमेदवारांना हजर रहावे लागणार आहे. पहिल्या दिवशी अर्थात १९ रोजी ५०० पुरुष उमेदवार, दुसरा दिवस २० जून ते २३ जून दरम्यान प्रत्येक दिवशी एक-एक हजार उमेदवारांना तर २४ रोजी ७२४ उमेदवारांना चाचणीसाठी बोलविले जाणार आहे. त्यानंतर २५ जून रोजी एक हजार ३६२ महिला उमेदवार व एक तृतीय पंथीय उमेदवारास बोलविले जाणार आहे.

‘उंची, छाती’त जो उत्तीर्ण तोच जाणार पुढे

प्रत्येक दिवशी आलेल्या उमेदवारांना प्रथम वाहतूक शाखेनजीक बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तेथे अर्ज भरल्यानंतर ५०-५० जणांना पुढे पाठविले जाईल. तेथे उंची, छाती, छाती फुगवणे यांची मोजणी होईल. त्यात जो उत्तीर्ण होईल, त्यालाच पुढे पाठविले जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होऊन मूळ कागदपत्रे (ओरिजनस डॉक्युमेंट) जमा करण्यात येणार आहे. तेथून पुढे बायोमेट्रीक फिंगरप्रिंट घेऊन त्यांना चेस्ट क्रमांक देण्यात येईल.

त्याच दिवशी गुण समजणार

उमेदवारांकडून १०० मीटर, १६०० मीटर धावणे, गोळाफेक यांचे प्रात्यक्षिक करुन घेण्यात येईल. यासाठी कोण किती वेळात किती धावले, याच्या अचून नोंदणीसाठी उमेदवारांच्या पायावर चिप लावण्यात येईल. त्यानंतर सुरूवात ते शेवट या ठिकाणी असेल्या मॅटवर त्याचा स्पर्श होईल नोंद होईल. यामुळे मायक्रो सेकंदचीही तफावत येणार नाही. तसेच यातून कोणाकडून कोणताही आरोप होणार नाही, असे डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले. ज्या उमेदवारांची चाचणी झाली, त्याच दिवशी त्यांचे गुण प्रदर्शित केले जाणार आहे.

मानवी हस्तक्षेप नाही, प्रलोभलांना बळी पडू नये

संपूर्ण भरती प्रक्रियेवर सीसीटीव्हींची नजर राहणार असून यात कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नाही. पोलिस भरतीसाठी उमेदवारांना कोणी मदत करणार असल्याचे सांगत असेल तर त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये व त्यांच्या प्रलोभलांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.

डीवायएसपींकडे प्रथम अपील

भरती प्रक्रियेविषयी काही तक्रार असल्यास त्याची पहिले अपील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करता येईल. त्यानंतर दुसरे अपील पोलिस अधीक्षकांकडे करता येऊ शकते. यात सर्व अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात आले असून प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध आहे. आलेल्या एकूण अर्जांमध्ये २० टक्के महिला आहेत.

लेखी परीक्षेचा मेसेज

जे उमेदवार चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेला पात्र ठरतील त्यांना तसा मेसेज पाठविला जाणार आहे. बाहेर गावाहून जे उमेदवार येतील त्यांना इमर्जन्सी म्हणून मल्टीपर्पज सभागृहात राहता येऊ शकते, असेही पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

भरतीसाठी मनुष्यबळ

पोलिस अधीक्षक - १अप्पर पोलिस अधीक्षक - २उपविभागीय पोलिस अधिकारी - ५पोलिस निरीक्षक -१०पोलिस उपनिरीक्षक -१५पोलिस कर्मचारी - ३५०