शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पोलिस भरतीमध्ये अचूक नोंदणीसाठी होणार इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर - डॉ. महेश्वर रेड्डी

By विजय.सैतवाल | Updated: June 15, 2024 21:56 IST

१३७ जागांसाठी ६५५७ अर्ज : १९ जूनपासून चाचणीसह लेखी परीक्षा

जळगाव : पोलिस दलामध्ये भरती प्रक्रिया राबविली जात असून जळगाव जिल्ह्यात १३७ जागांसाठी १९ जूनपासून शारीरिक चाचण्यांना सुरुवात होणार आहे. यासाठी सहा हजार ५५७ अर्ज आलेले असून २५ जूनपर्यंत चाचण्या पूर्ण होतील. यातील उत्तीर्ण उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. चाचण्यांच्या अचूक नोंदणीसाठी या वेळी इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर होणार असून यातून थोडीही तफावत राहणार नाही, असा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी व्यक्त केला. पोलिस भरतीसंदर्भात माहिती देण्यासाठी शनिवार, १५ जून रोजी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांची पत्रकार परिषद झाली. त्या वेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली.

पहिले सहा दिवस पुरुष व सातव्या दिवशी महिला उमेदवारांची चाचणी

पोलिस भरतीसाठी १९ जूनपासून चाचण्यांना सुरुवात होणार आहे. यामध्ये पहाटे साडेचार वाजता उमेदवारांना हजर रहावे लागणार आहे. पहिल्या दिवशी अर्थात १९ रोजी ५०० पुरुष उमेदवार, दुसरा दिवस २० जून ते २३ जून दरम्यान प्रत्येक दिवशी एक-एक हजार उमेदवारांना तर २४ रोजी ७२४ उमेदवारांना चाचणीसाठी बोलविले जाणार आहे. त्यानंतर २५ जून रोजी एक हजार ३६२ महिला उमेदवार व एक तृतीय पंथीय उमेदवारास बोलविले जाणार आहे.

‘उंची, छाती’त जो उत्तीर्ण तोच जाणार पुढे

प्रत्येक दिवशी आलेल्या उमेदवारांना प्रथम वाहतूक शाखेनजीक बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तेथे अर्ज भरल्यानंतर ५०-५० जणांना पुढे पाठविले जाईल. तेथे उंची, छाती, छाती फुगवणे यांची मोजणी होईल. त्यात जो उत्तीर्ण होईल, त्यालाच पुढे पाठविले जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होऊन मूळ कागदपत्रे (ओरिजनस डॉक्युमेंट) जमा करण्यात येणार आहे. तेथून पुढे बायोमेट्रीक फिंगरप्रिंट घेऊन त्यांना चेस्ट क्रमांक देण्यात येईल.

त्याच दिवशी गुण समजणार

उमेदवारांकडून १०० मीटर, १६०० मीटर धावणे, गोळाफेक यांचे प्रात्यक्षिक करुन घेण्यात येईल. यासाठी कोण किती वेळात किती धावले, याच्या अचून नोंदणीसाठी उमेदवारांच्या पायावर चिप लावण्यात येईल. त्यानंतर सुरूवात ते शेवट या ठिकाणी असेल्या मॅटवर त्याचा स्पर्श होईल नोंद होईल. यामुळे मायक्रो सेकंदचीही तफावत येणार नाही. तसेच यातून कोणाकडून कोणताही आरोप होणार नाही, असे डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले. ज्या उमेदवारांची चाचणी झाली, त्याच दिवशी त्यांचे गुण प्रदर्शित केले जाणार आहे.

मानवी हस्तक्षेप नाही, प्रलोभलांना बळी पडू नये

संपूर्ण भरती प्रक्रियेवर सीसीटीव्हींची नजर राहणार असून यात कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नाही. पोलिस भरतीसाठी उमेदवारांना कोणी मदत करणार असल्याचे सांगत असेल तर त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये व त्यांच्या प्रलोभलांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.

डीवायएसपींकडे प्रथम अपील

भरती प्रक्रियेविषयी काही तक्रार असल्यास त्याची पहिले अपील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करता येईल. त्यानंतर दुसरे अपील पोलिस अधीक्षकांकडे करता येऊ शकते. यात सर्व अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात आले असून प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध आहे. आलेल्या एकूण अर्जांमध्ये २० टक्के महिला आहेत.

लेखी परीक्षेचा मेसेज

जे उमेदवार चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेला पात्र ठरतील त्यांना तसा मेसेज पाठविला जाणार आहे. बाहेर गावाहून जे उमेदवार येतील त्यांना इमर्जन्सी म्हणून मल्टीपर्पज सभागृहात राहता येऊ शकते, असेही पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

भरतीसाठी मनुष्यबळ

पोलिस अधीक्षक - १अप्पर पोलिस अधीक्षक - २उपविभागीय पोलिस अधिकारी - ५पोलिस निरीक्षक -१०पोलिस उपनिरीक्षक -१५पोलिस कर्मचारी - ३५०