शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टीच्या दिवशीही वीज बिल वसुली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:14 IST

महावितरण : ५० टक्के वीजबिल सवलतीची योजना लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती दिली ...

महावितरण : ५० टक्के वीजबिल सवलतीची योजना

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासनाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती दिली असली तरी, वसुली मोहिमेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे महावितरणच्या जळगाव परिमंडळातर्फे शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशीही सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामावर बोलावून वसुली मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता फारुख शेख यांनी दिली.

तसेच थकबाकीदार शेतकरी बांधवांना वीजबिलात ५० टक्के सवलत लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही शेख यांनी केले आहे.

कोरोनामुळे शासनाच्या सूचनेनुसार महावितरणने ग्राहकांच्या घरी जाऊन रिडिंग न घेता ग्राहकांना चार महिने सरासरी वीजबिल दिले. मात्र, महावितरणतर्फे देण्यात आलेले वीजबिल हे अवाजवी असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी करून हे वीजबिल भरण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे सध्या खान्देशात १ हजार कोटींच्या घरात थकबाकीचा आकडा पोहोचला आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणतर्फे थेट थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत होता. पण, या कारवाईला नुकतीच स्थगिती देण्यात आल्यामुळे हजारो कोटींची थकबाकी वसुली करण्याबाबत महावितरणपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे महावितरणतर्फे मार्चपूर्वी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशीही वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना पहिल्यांदाच विजबिलात ५० टक्के सवलत

कोरोना काळात महावितरणच्या विविध प्रकारच्या ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून, यातील सर्वाधिक थकबाकी कृषीपंप वीज ग्राहकांकडे आहे. त्यामुळे ही वसुली होण्यासाठी महावितरणने ‘महाकृषी ऊर्जा अभियानां’तर्गत शेतकऱ्यांच्या वीजबिलावर ५० टक्के सवलत दिली आहे.

हे अभियान तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार असून, पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत मिळणार असून, व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. अशा प्रकारे पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास ६६ टक्के सवलत मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या थकबाकीवर ३० टक्के तर तिसऱ्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना २० टक्के सवलत मिळणार आहे. या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.