शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

सुट्टीच्या दिवशीही वीज बिल वसुली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:14 IST

महावितरण : ५० टक्के वीजबिल सवलतीची योजना लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती दिली ...

महावितरण : ५० टक्के वीजबिल सवलतीची योजना

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासनाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती दिली असली तरी, वसुली मोहिमेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे महावितरणच्या जळगाव परिमंडळातर्फे शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशीही सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामावर बोलावून वसुली मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता फारुख शेख यांनी दिली.

तसेच थकबाकीदार शेतकरी बांधवांना वीजबिलात ५० टक्के सवलत लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही शेख यांनी केले आहे.

कोरोनामुळे शासनाच्या सूचनेनुसार महावितरणने ग्राहकांच्या घरी जाऊन रिडिंग न घेता ग्राहकांना चार महिने सरासरी वीजबिल दिले. मात्र, महावितरणतर्फे देण्यात आलेले वीजबिल हे अवाजवी असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी करून हे वीजबिल भरण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे सध्या खान्देशात १ हजार कोटींच्या घरात थकबाकीचा आकडा पोहोचला आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणतर्फे थेट थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत होता. पण, या कारवाईला नुकतीच स्थगिती देण्यात आल्यामुळे हजारो कोटींची थकबाकी वसुली करण्याबाबत महावितरणपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे महावितरणतर्फे मार्चपूर्वी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशीही वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना पहिल्यांदाच विजबिलात ५० टक्के सवलत

कोरोना काळात महावितरणच्या विविध प्रकारच्या ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून, यातील सर्वाधिक थकबाकी कृषीपंप वीज ग्राहकांकडे आहे. त्यामुळे ही वसुली होण्यासाठी महावितरणने ‘महाकृषी ऊर्जा अभियानां’तर्गत शेतकऱ्यांच्या वीजबिलावर ५० टक्के सवलत दिली आहे.

हे अभियान तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार असून, पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत मिळणार असून, व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. अशा प्रकारे पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास ६६ टक्के सवलत मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या थकबाकीवर ३० टक्के तर तिसऱ्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना २० टक्के सवलत मिळणार आहे. या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.