शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जाती-धर्मापेक्षा विकासाच्या मुद्यावर निवडणुका झाल्या पाहिजे - खासदार रक्षा खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 12:08 IST

आता शिवसैनिकांनी काम केले, विधानसभेवेळी पक्षादेशाप्रमाणे काम केले जाईल

जळगाव : जो जाती-धर्माचा उल्लेख करून निवडणूक लढवित असेल त्याला विकासावर बोलण्याचा अधिकार नाही. असा उल्लेख जो करीत असेल तो कधी मदतीला तरी येतो का, असा सवाल खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थित करीत कोणतीही निवडणूक जाती-धर्मापेक्षा विकासाच्या मुद्यावर झाली पाहिजे, अशी अपेक्षा ‘लोकमत’ भेटीदरम्यान व्यक्त केली.मंगळवारी खासदार रक्षा खडसे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी निवडणुकांविषयी तसेच विधानसभेच्या नियोजनाबाबतही चर्चा केली. त्यांच्याशी झालेला हा संवाद...प्रश्न - विधानसभा निवडणुकीचे नियोजन काय आहे?उत्तर - तसे पाहता आता आमची ‘रिअसल’ होऊन गेली आहे. तरीदेखील विधानसभा निवडणुकीसाठी अजून ‘मायक्रो प्लॅनिंग’ करावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत जातीचे मुद्दे जास्त येतील. मुळात जाती-धर्माचा मुद्दा यायलाच नको. खासदार म्हणून माझ्यावर जबाबदारी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीचे चांगले निकाल पाहता महाराष्ट्रात पुन्हा युतीचे सरकार येईल.प्रश्न - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा त्रास झाला का ?उत्तर - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने सहकार्य केले. एक-दोन जणांनी काम केले नाही. त्याचा काही फरक पडत नाही, मात्र शिवसैनिकांनी काम केले. असे प्रकार सर्वत्र होत असतात. व्यक्तीगत वाद असू शकतात. आता विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष जसे आदेश देईल, त्याप्रमाणे काम करावे लागेल.प्रश्न - पूर्वीपेक्षा आता जि.प. मध्ये वाद आहे का?उत्तर - पूर्वीही वाद होते, आताही आहे. बहुतांश कामे ग्रामपंचायत पातळीवरच होऊ लागल्याने जि.प. आता केवळ प्रशासकीय बदल्या करणे अथवा एक एजन्सी म्हणूनच राहिली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना हा त्रास सहन करावा लागतो. तेथे जास्त अधिकार नसले तरी जि.प. सदस्य, अधिकाऱ्यांनी शाळा व इतर ठिकाणी लक्ष दिले पाहिजे.प्रश्न - आपल्याला राज्यमंत्री पद मिळण्याची चर्चा आहे ?उत्तर - तशी चर्चा माध्यमांनीच केली आहे. महिलांच्या मंत्रीपदाची संख्या पाहता त्यांची संख्या वाढलेली आहे. मला मंत्रीपद मिळावे, तिथपर्यंत मी विचारही केलेला नाही. पद घेऊन बसण्यास अर्थ नाही, प्रत्यक्ष काम केले पाहिजे.प्रश्न - नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या भाषणाबद्दल काय वाटते ?उत्तर - पंतप्रधान नाही तर ते एक सेवक म्हणून काम करीत असतात. त्यांचे भाषणही त्यांनी त्या पद्धतीने केले. त्यामुळे ते सर्वसामान्यांना आपले वाटले. लोकांच्या अपेक्षा अजून आहे, त्यामुळे ते अधिक चांगले काम करतील.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव