शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

जाती-धर्मापेक्षा विकासाच्या मुद्यावर निवडणुका झाल्या पाहिजे - खासदार रक्षा खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 12:08 IST

आता शिवसैनिकांनी काम केले, विधानसभेवेळी पक्षादेशाप्रमाणे काम केले जाईल

जळगाव : जो जाती-धर्माचा उल्लेख करून निवडणूक लढवित असेल त्याला विकासावर बोलण्याचा अधिकार नाही. असा उल्लेख जो करीत असेल तो कधी मदतीला तरी येतो का, असा सवाल खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थित करीत कोणतीही निवडणूक जाती-धर्मापेक्षा विकासाच्या मुद्यावर झाली पाहिजे, अशी अपेक्षा ‘लोकमत’ भेटीदरम्यान व्यक्त केली.मंगळवारी खासदार रक्षा खडसे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी निवडणुकांविषयी तसेच विधानसभेच्या नियोजनाबाबतही चर्चा केली. त्यांच्याशी झालेला हा संवाद...प्रश्न - विधानसभा निवडणुकीचे नियोजन काय आहे?उत्तर - तसे पाहता आता आमची ‘रिअसल’ होऊन गेली आहे. तरीदेखील विधानसभा निवडणुकीसाठी अजून ‘मायक्रो प्लॅनिंग’ करावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत जातीचे मुद्दे जास्त येतील. मुळात जाती-धर्माचा मुद्दा यायलाच नको. खासदार म्हणून माझ्यावर जबाबदारी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीचे चांगले निकाल पाहता महाराष्ट्रात पुन्हा युतीचे सरकार येईल.प्रश्न - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा त्रास झाला का ?उत्तर - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने सहकार्य केले. एक-दोन जणांनी काम केले नाही. त्याचा काही फरक पडत नाही, मात्र शिवसैनिकांनी काम केले. असे प्रकार सर्वत्र होत असतात. व्यक्तीगत वाद असू शकतात. आता विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष जसे आदेश देईल, त्याप्रमाणे काम करावे लागेल.प्रश्न - पूर्वीपेक्षा आता जि.प. मध्ये वाद आहे का?उत्तर - पूर्वीही वाद होते, आताही आहे. बहुतांश कामे ग्रामपंचायत पातळीवरच होऊ लागल्याने जि.प. आता केवळ प्रशासकीय बदल्या करणे अथवा एक एजन्सी म्हणूनच राहिली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना हा त्रास सहन करावा लागतो. तेथे जास्त अधिकार नसले तरी जि.प. सदस्य, अधिकाऱ्यांनी शाळा व इतर ठिकाणी लक्ष दिले पाहिजे.प्रश्न - आपल्याला राज्यमंत्री पद मिळण्याची चर्चा आहे ?उत्तर - तशी चर्चा माध्यमांनीच केली आहे. महिलांच्या मंत्रीपदाची संख्या पाहता त्यांची संख्या वाढलेली आहे. मला मंत्रीपद मिळावे, तिथपर्यंत मी विचारही केलेला नाही. पद घेऊन बसण्यास अर्थ नाही, प्रत्यक्ष काम केले पाहिजे.प्रश्न - नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या भाषणाबद्दल काय वाटते ?उत्तर - पंतप्रधान नाही तर ते एक सेवक म्हणून काम करीत असतात. त्यांचे भाषणही त्यांनी त्या पद्धतीने केले. त्यामुळे ते सर्वसामान्यांना आपले वाटले. लोकांच्या अपेक्षा अजून आहे, त्यामुळे ते अधिक चांगले काम करतील.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव