शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

जाती-धर्मापेक्षा विकासाच्या मुद्यावर निवडणुका झाल्या पाहिजे - खासदार रक्षा खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 12:08 IST

आता शिवसैनिकांनी काम केले, विधानसभेवेळी पक्षादेशाप्रमाणे काम केले जाईल

जळगाव : जो जाती-धर्माचा उल्लेख करून निवडणूक लढवित असेल त्याला विकासावर बोलण्याचा अधिकार नाही. असा उल्लेख जो करीत असेल तो कधी मदतीला तरी येतो का, असा सवाल खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थित करीत कोणतीही निवडणूक जाती-धर्मापेक्षा विकासाच्या मुद्यावर झाली पाहिजे, अशी अपेक्षा ‘लोकमत’ भेटीदरम्यान व्यक्त केली.मंगळवारी खासदार रक्षा खडसे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी निवडणुकांविषयी तसेच विधानसभेच्या नियोजनाबाबतही चर्चा केली. त्यांच्याशी झालेला हा संवाद...प्रश्न - विधानसभा निवडणुकीचे नियोजन काय आहे?उत्तर - तसे पाहता आता आमची ‘रिअसल’ होऊन गेली आहे. तरीदेखील विधानसभा निवडणुकीसाठी अजून ‘मायक्रो प्लॅनिंग’ करावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत जातीचे मुद्दे जास्त येतील. मुळात जाती-धर्माचा मुद्दा यायलाच नको. खासदार म्हणून माझ्यावर जबाबदारी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीचे चांगले निकाल पाहता महाराष्ट्रात पुन्हा युतीचे सरकार येईल.प्रश्न - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा त्रास झाला का ?उत्तर - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने सहकार्य केले. एक-दोन जणांनी काम केले नाही. त्याचा काही फरक पडत नाही, मात्र शिवसैनिकांनी काम केले. असे प्रकार सर्वत्र होत असतात. व्यक्तीगत वाद असू शकतात. आता विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष जसे आदेश देईल, त्याप्रमाणे काम करावे लागेल.प्रश्न - पूर्वीपेक्षा आता जि.प. मध्ये वाद आहे का?उत्तर - पूर्वीही वाद होते, आताही आहे. बहुतांश कामे ग्रामपंचायत पातळीवरच होऊ लागल्याने जि.प. आता केवळ प्रशासकीय बदल्या करणे अथवा एक एजन्सी म्हणूनच राहिली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना हा त्रास सहन करावा लागतो. तेथे जास्त अधिकार नसले तरी जि.प. सदस्य, अधिकाऱ्यांनी शाळा व इतर ठिकाणी लक्ष दिले पाहिजे.प्रश्न - आपल्याला राज्यमंत्री पद मिळण्याची चर्चा आहे ?उत्तर - तशी चर्चा माध्यमांनीच केली आहे. महिलांच्या मंत्रीपदाची संख्या पाहता त्यांची संख्या वाढलेली आहे. मला मंत्रीपद मिळावे, तिथपर्यंत मी विचारही केलेला नाही. पद घेऊन बसण्यास अर्थ नाही, प्रत्यक्ष काम केले पाहिजे.प्रश्न - नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या भाषणाबद्दल काय वाटते ?उत्तर - पंतप्रधान नाही तर ते एक सेवक म्हणून काम करीत असतात. त्यांचे भाषणही त्यांनी त्या पद्धतीने केले. त्यामुळे ते सर्वसामान्यांना आपले वाटले. लोकांच्या अपेक्षा अजून आहे, त्यामुळे ते अधिक चांगले काम करतील.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव