शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

वडिल शिक्षक, त्यांच्या प्रेरणेतून ‘शिक्षकी पेशात आलो’ - प्रा़ डॉ़ पी़पी़माहुलीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:47 IST

अधिव्याख्याता ते प्र-कुलगुरूपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रा़ डॉ़ पी़पी़माहुलीकर यांच्या आयुष्याला वडिलांसह प्रा़ आऱबी़माने यांनी दिला आकाऱ़़

जळगाव: वडिल प्राथमिक शिक्षक़ त्यांच्याच शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले़ त्यांचा अध्यापनाचा विषय गणित आणि विज्ञान, म्हणून या विषयांमध्ये आवड निर्माण झाली़ इतर विद्यार्थ्यांप्रमाणे मलाही शिक्षा व्हायची़ त्यामुळे अभ्यासात नेहमी चांगला राहिलो़ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मूलभूत पाया पक्का करण्यासाठी वडिलांनी घेतलेले कष्ट मी जवळून पाहिले़ म्हणून वडिलांप्रमाणे शिक्षक व्हायचे स्वप्न बघितले़ अन् वडील पांडूरंग माहुलीकर यांच्या प्रेरणेतून ‘शिक्षकी पेशात आलो’़ याचा मला फार आनंद झाला होता़ हा अनुभव सांगताना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा़ डॉ़पी़पी़माहुलीकर यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत होते.पदव्युत्तर शिक्षणाप्रसंगीच आरटीओ व रेंज फॉरेस्ट म्हणून निवड झाली़ पण, झिरो बजेटमुळे ती भरती रद्द झाली़ खचलो नाही, पीएच़डी़पूर्ण केली आणि सन १९९३ मध्ये पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून नोकरी मिळाली़ नंतर १९९४ मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पेस्टिसाईडस् व अ‍ॅग्रो केमिकल्स विषयाचा अधिव्याख्याता म्हणून रुजू झालो़ हळूहळू प्रपाठक व प्राध्यापक झालो़ हा प्रवास इथेच थांबला नाही तर बीसीयूडी संचालक पदाची धुरा सांभाळल्यानंतर प्र-कुलगुरू म्हणून आज कार्यरत आहे़ हे सर्व शिक्षकांमुळे, अर्थातच सर्व श्रेय गुरुजनांना. आज शिक्षक दिनी त्यांना वंदन...!जेव्हा शिक्षक मित्र बनतात...अन् मिळतो प्रोत्साहनसांगली जिल्ह्यातील माहुली येथील ते मूळ रहिवासी़ वडिल माहुली जि़प़ शाळेत शिक्षक आणि त्याच शाळेत मी प्राथमिक शिक्षण पुर्ण केले़ स्वत:चा मुलगा म्हणून नव्हे तर इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच मीही त्यांचा विद्यार्थी आहे, अशी वागणूक वडिल द्यायचे़ शिक्षाही व्हायची़ पण, या शिक्षेमुळे माझ्या जीवनाला आकार मिळाला़ नंतर गावातच माध्यमिक शिक्षण पुर्ण केले़ त्यानंतर विटा येथील बळवंतमहाविद्यालयात बीएस्सी केमेस्ट्रीची पदवी प्राप्त केली़ व एम़एसस्सी के मिस्ट्री ही पदव्युत्तर पदवी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात प्राप्त केली़ याप्रसंगी माझे प्रा़ आऱबी़माने हे चांगले शिक्षक आणि एक चांगले मित्रही़ संशोधनाच्या प्रात्यक्षिकांमध्ये मी कधीही उपयशी ठरलो नाही़ काही तरी निर्णय मिळायचाचं़ हे प्रा़ आऱबी़माने यांनी ओळखले आणि आणि मला संशोधनाची संधी दिली़ अखेर मी १९९३ मध्ये पीएच़डी़प्राप्त केली़ माहुली गावातून मी पहिलाच व्यक्ती होतो, ज्याने पीएच़डी़ प्राप्त केली होती़ त्यामुळे मला खूप आनंद झाला होता व कुटूंबीयांना सुध्दा़यशस्वी जीवनासाठी वसतिगृहातील प्रवासही महत्वाचा...उच्च शिक्षणासाठी शहरात आलो़ त्यामुळे वसतिगृहात काहीवर्ष राहिलो़ वसतिगृहात कठोर शिस्त होती. पण, हे वसतिगृहातील जीवन खूप वेगळेच़ मोकळीक, बंधन नाही, कुठलाही भेदभाव नाही, जात-धर्म नाही़़सर्व एकत्र राहायचे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वसतिगृहातील जीवन जगणे ही महत्वाचे आहे़ वाचनाची आवड असल्यामुळे मी कांदबरी तसेच परीक्षा काळातही पुस्तक वाचणे बंद केले नव्हते, असे त्यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव