शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
2
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
3
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
4
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
5
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
6
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
7
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
8
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
9
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
10
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
11
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
12
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
13
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
14
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
15
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
16
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
17
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
18
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
19
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
20
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
Daily Top 2Weekly Top 5

वडिल शिक्षक, त्यांच्या प्रेरणेतून ‘शिक्षकी पेशात आलो’ - प्रा़ डॉ़ पी़पी़माहुलीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:47 IST

अधिव्याख्याता ते प्र-कुलगुरूपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रा़ डॉ़ पी़पी़माहुलीकर यांच्या आयुष्याला वडिलांसह प्रा़ आऱबी़माने यांनी दिला आकाऱ़़

जळगाव: वडिल प्राथमिक शिक्षक़ त्यांच्याच शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले़ त्यांचा अध्यापनाचा विषय गणित आणि विज्ञान, म्हणून या विषयांमध्ये आवड निर्माण झाली़ इतर विद्यार्थ्यांप्रमाणे मलाही शिक्षा व्हायची़ त्यामुळे अभ्यासात नेहमी चांगला राहिलो़ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मूलभूत पाया पक्का करण्यासाठी वडिलांनी घेतलेले कष्ट मी जवळून पाहिले़ म्हणून वडिलांप्रमाणे शिक्षक व्हायचे स्वप्न बघितले़ अन् वडील पांडूरंग माहुलीकर यांच्या प्रेरणेतून ‘शिक्षकी पेशात आलो’़ याचा मला फार आनंद झाला होता़ हा अनुभव सांगताना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा़ डॉ़पी़पी़माहुलीकर यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत होते.पदव्युत्तर शिक्षणाप्रसंगीच आरटीओ व रेंज फॉरेस्ट म्हणून निवड झाली़ पण, झिरो बजेटमुळे ती भरती रद्द झाली़ खचलो नाही, पीएच़डी़पूर्ण केली आणि सन १९९३ मध्ये पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून नोकरी मिळाली़ नंतर १९९४ मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पेस्टिसाईडस् व अ‍ॅग्रो केमिकल्स विषयाचा अधिव्याख्याता म्हणून रुजू झालो़ हळूहळू प्रपाठक व प्राध्यापक झालो़ हा प्रवास इथेच थांबला नाही तर बीसीयूडी संचालक पदाची धुरा सांभाळल्यानंतर प्र-कुलगुरू म्हणून आज कार्यरत आहे़ हे सर्व शिक्षकांमुळे, अर्थातच सर्व श्रेय गुरुजनांना. आज शिक्षक दिनी त्यांना वंदन...!जेव्हा शिक्षक मित्र बनतात...अन् मिळतो प्रोत्साहनसांगली जिल्ह्यातील माहुली येथील ते मूळ रहिवासी़ वडिल माहुली जि़प़ शाळेत शिक्षक आणि त्याच शाळेत मी प्राथमिक शिक्षण पुर्ण केले़ स्वत:चा मुलगा म्हणून नव्हे तर इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच मीही त्यांचा विद्यार्थी आहे, अशी वागणूक वडिल द्यायचे़ शिक्षाही व्हायची़ पण, या शिक्षेमुळे माझ्या जीवनाला आकार मिळाला़ नंतर गावातच माध्यमिक शिक्षण पुर्ण केले़ त्यानंतर विटा येथील बळवंतमहाविद्यालयात बीएस्सी केमेस्ट्रीची पदवी प्राप्त केली़ व एम़एसस्सी के मिस्ट्री ही पदव्युत्तर पदवी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात प्राप्त केली़ याप्रसंगी माझे प्रा़ आऱबी़माने हे चांगले शिक्षक आणि एक चांगले मित्रही़ संशोधनाच्या प्रात्यक्षिकांमध्ये मी कधीही उपयशी ठरलो नाही़ काही तरी निर्णय मिळायचाचं़ हे प्रा़ आऱबी़माने यांनी ओळखले आणि आणि मला संशोधनाची संधी दिली़ अखेर मी १९९३ मध्ये पीएच़डी़प्राप्त केली़ माहुली गावातून मी पहिलाच व्यक्ती होतो, ज्याने पीएच़डी़ प्राप्त केली होती़ त्यामुळे मला खूप आनंद झाला होता व कुटूंबीयांना सुध्दा़यशस्वी जीवनासाठी वसतिगृहातील प्रवासही महत्वाचा...उच्च शिक्षणासाठी शहरात आलो़ त्यामुळे वसतिगृहात काहीवर्ष राहिलो़ वसतिगृहात कठोर शिस्त होती. पण, हे वसतिगृहातील जीवन खूप वेगळेच़ मोकळीक, बंधन नाही, कुठलाही भेदभाव नाही, जात-धर्म नाही़़सर्व एकत्र राहायचे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वसतिगृहातील जीवन जगणे ही महत्वाचे आहे़ वाचनाची आवड असल्यामुळे मी कांदबरी तसेच परीक्षा काळातही पुस्तक वाचणे बंद केले नव्हते, असे त्यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव