शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

वडिल शिक्षक, त्यांच्या प्रेरणेतून ‘शिक्षकी पेशात आलो’ - प्रा़ डॉ़ पी़पी़माहुलीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:47 IST

अधिव्याख्याता ते प्र-कुलगुरूपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रा़ डॉ़ पी़पी़माहुलीकर यांच्या आयुष्याला वडिलांसह प्रा़ आऱबी़माने यांनी दिला आकाऱ़़

जळगाव: वडिल प्राथमिक शिक्षक़ त्यांच्याच शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले़ त्यांचा अध्यापनाचा विषय गणित आणि विज्ञान, म्हणून या विषयांमध्ये आवड निर्माण झाली़ इतर विद्यार्थ्यांप्रमाणे मलाही शिक्षा व्हायची़ त्यामुळे अभ्यासात नेहमी चांगला राहिलो़ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मूलभूत पाया पक्का करण्यासाठी वडिलांनी घेतलेले कष्ट मी जवळून पाहिले़ म्हणून वडिलांप्रमाणे शिक्षक व्हायचे स्वप्न बघितले़ अन् वडील पांडूरंग माहुलीकर यांच्या प्रेरणेतून ‘शिक्षकी पेशात आलो’़ याचा मला फार आनंद झाला होता़ हा अनुभव सांगताना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा़ डॉ़पी़पी़माहुलीकर यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत होते.पदव्युत्तर शिक्षणाप्रसंगीच आरटीओ व रेंज फॉरेस्ट म्हणून निवड झाली़ पण, झिरो बजेटमुळे ती भरती रद्द झाली़ खचलो नाही, पीएच़डी़पूर्ण केली आणि सन १९९३ मध्ये पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून नोकरी मिळाली़ नंतर १९९४ मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पेस्टिसाईडस् व अ‍ॅग्रो केमिकल्स विषयाचा अधिव्याख्याता म्हणून रुजू झालो़ हळूहळू प्रपाठक व प्राध्यापक झालो़ हा प्रवास इथेच थांबला नाही तर बीसीयूडी संचालक पदाची धुरा सांभाळल्यानंतर प्र-कुलगुरू म्हणून आज कार्यरत आहे़ हे सर्व शिक्षकांमुळे, अर्थातच सर्व श्रेय गुरुजनांना. आज शिक्षक दिनी त्यांना वंदन...!जेव्हा शिक्षक मित्र बनतात...अन् मिळतो प्रोत्साहनसांगली जिल्ह्यातील माहुली येथील ते मूळ रहिवासी़ वडिल माहुली जि़प़ शाळेत शिक्षक आणि त्याच शाळेत मी प्राथमिक शिक्षण पुर्ण केले़ स्वत:चा मुलगा म्हणून नव्हे तर इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच मीही त्यांचा विद्यार्थी आहे, अशी वागणूक वडिल द्यायचे़ शिक्षाही व्हायची़ पण, या शिक्षेमुळे माझ्या जीवनाला आकार मिळाला़ नंतर गावातच माध्यमिक शिक्षण पुर्ण केले़ त्यानंतर विटा येथील बळवंतमहाविद्यालयात बीएस्सी केमेस्ट्रीची पदवी प्राप्त केली़ व एम़एसस्सी के मिस्ट्री ही पदव्युत्तर पदवी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात प्राप्त केली़ याप्रसंगी माझे प्रा़ आऱबी़माने हे चांगले शिक्षक आणि एक चांगले मित्रही़ संशोधनाच्या प्रात्यक्षिकांमध्ये मी कधीही उपयशी ठरलो नाही़ काही तरी निर्णय मिळायचाचं़ हे प्रा़ आऱबी़माने यांनी ओळखले आणि आणि मला संशोधनाची संधी दिली़ अखेर मी १९९३ मध्ये पीएच़डी़प्राप्त केली़ माहुली गावातून मी पहिलाच व्यक्ती होतो, ज्याने पीएच़डी़ प्राप्त केली होती़ त्यामुळे मला खूप आनंद झाला होता व कुटूंबीयांना सुध्दा़यशस्वी जीवनासाठी वसतिगृहातील प्रवासही महत्वाचा...उच्च शिक्षणासाठी शहरात आलो़ त्यामुळे वसतिगृहात काहीवर्ष राहिलो़ वसतिगृहात कठोर शिस्त होती. पण, हे वसतिगृहातील जीवन खूप वेगळेच़ मोकळीक, बंधन नाही, कुठलाही भेदभाव नाही, जात-धर्म नाही़़सर्व एकत्र राहायचे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वसतिगृहातील जीवन जगणे ही महत्वाचे आहे़ वाचनाची आवड असल्यामुळे मी कांदबरी तसेच परीक्षा काळातही पुस्तक वाचणे बंद केले नव्हते, असे त्यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव