शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

आठ महिन्यातच मतदानाचा टक्का ८ टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 12:30 IST

मनपा निवडणुकीत झाले होते ५७ टक्के मतदान

जळगाव : लोकसभेसाठी २३ रोजी झालेल्या मतदानात जळगाव शहरात केवळ ४९ टक्के मतदान झाल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. कारण आठ महिन्यांपूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत जळगाव शहरात ५७ टक्के मतदान झाले होते. केवळ आठ महिन्यांचा अंतरातच शहराच्या मतदानाच्या टक्केवारीत ८ टक््क्यांची घट का झाली ? याबाबत राजकीय पक्ष व प्रशासनाकडून विचारमंथन सुरु आहे.लोकसभा निवडणुकीसाठी यंदा जळगाव मतदार संघात भाजपा व राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये काट्याची लढत रंगलेली पहायला मिळाली. तसेच निवडणुकीआधी भाजपाकडून विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करत चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर प्रचारादरम्यान अमळनेर येथे झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष व माजी आमदारांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर भाजपाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली. त्यामुळे भाजपा नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांकडून मतदान काढण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी अपेक्षा होती. मात्र शहरात भाजपाचे ५७ नगरसेवक असताना शहरात केवळ ४९ टक्के मतदान झाल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तापमानाचाही परिणाममनपा निवडणुकीच्या वेळेस पावसाळा असल्याने तापामान जास्त नव्हते. मात्र, २३ रोजी झालेल्या लोकसभेच्या मतदानावेळी ४२ अंश सेल्सीअस तापमान असल्यामुळे दुपारी १२ पर्यंत चांगले मतदान झाले. दुपारून मात्र मतदान करण्यासाठी नागरिक बाहेर निघाले नाहीत.मनपाची पुनरावृत्ती न झाल्याने नगरसेवक झाले नाराजभाजपाकडून जळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे या निवडणुकीत देखील मनपा निवडणुकीप्रमाणे मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होईल अशी अपेक्षा नगरसेवकांकडून केली जात होती. मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाने पैसेवाटप न करण्यावर भर दिला. तर काही ठिकाणी पैसे वाटपाचे काम बाहेरच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविल्यामुळे देखील नगरसेवक नाराज असल्याने नगरसेवकांनी आपल्या प्रभागात उपस्थित राहून केवळ औपचारिकता बजावल्याचे पहायला मिळाले. मतदान काढण्यासाठी नगरसेवकांकडून कोणतेही प्रयत्न झाले नाही. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचेही बोलले जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव