शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

आठ महिन्यातच मतदानाचा टक्का ८ टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 12:30 IST

मनपा निवडणुकीत झाले होते ५७ टक्के मतदान

जळगाव : लोकसभेसाठी २३ रोजी झालेल्या मतदानात जळगाव शहरात केवळ ४९ टक्के मतदान झाल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. कारण आठ महिन्यांपूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत जळगाव शहरात ५७ टक्के मतदान झाले होते. केवळ आठ महिन्यांचा अंतरातच शहराच्या मतदानाच्या टक्केवारीत ८ टक््क्यांची घट का झाली ? याबाबत राजकीय पक्ष व प्रशासनाकडून विचारमंथन सुरु आहे.लोकसभा निवडणुकीसाठी यंदा जळगाव मतदार संघात भाजपा व राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये काट्याची लढत रंगलेली पहायला मिळाली. तसेच निवडणुकीआधी भाजपाकडून विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करत चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर प्रचारादरम्यान अमळनेर येथे झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष व माजी आमदारांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर भाजपाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली. त्यामुळे भाजपा नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांकडून मतदान काढण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी अपेक्षा होती. मात्र शहरात भाजपाचे ५७ नगरसेवक असताना शहरात केवळ ४९ टक्के मतदान झाल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तापमानाचाही परिणाममनपा निवडणुकीच्या वेळेस पावसाळा असल्याने तापामान जास्त नव्हते. मात्र, २३ रोजी झालेल्या लोकसभेच्या मतदानावेळी ४२ अंश सेल्सीअस तापमान असल्यामुळे दुपारी १२ पर्यंत चांगले मतदान झाले. दुपारून मात्र मतदान करण्यासाठी नागरिक बाहेर निघाले नाहीत.मनपाची पुनरावृत्ती न झाल्याने नगरसेवक झाले नाराजभाजपाकडून जळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे या निवडणुकीत देखील मनपा निवडणुकीप्रमाणे मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होईल अशी अपेक्षा नगरसेवकांकडून केली जात होती. मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाने पैसेवाटप न करण्यावर भर दिला. तर काही ठिकाणी पैसे वाटपाचे काम बाहेरच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविल्यामुळे देखील नगरसेवक नाराज असल्याने नगरसेवकांनी आपल्या प्रभागात उपस्थित राहून केवळ औपचारिकता बजावल्याचे पहायला मिळाले. मतदान काढण्यासाठी नगरसेवकांकडून कोणतेही प्रयत्न झाले नाही. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचेही बोलले जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव