शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रासायनिक खतांच्या वापरामुळे कापसावर दुष्परिणाम, वडली येथे शेतकऱ्यांचे नुकसान

By सुनील पाटील | Updated: July 16, 2023 18:04 IST

शेतकऱ्यांनी गावातीलच कृषी केंद्रातून रासायनिक खत खरेदी केले होते. पिकांना दिल्यानंतर त्याचा लागलीच दुष्परिणाम जाणवू लागला.

जळगाव : रासायनिक खताच्या वापरामुळे तालुक्यातील वडली शिवारात कापूस पिकावर दुष्परिणाम जाणवू लागला आहे. पिकाची वाढ खुंटली असून पानांना गळती तसेच आकुंचित पावत आहे. या प्रकारानंतर कृषी विभागाने शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. खते पुरविणाऱ्या दुकानदाराकडील साठा सील केला आहे. खतांचे नमुने घेण्यात आले असून विश्लेषणासाठी नाशिक प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांनी गावातीलच कृषी केंद्रातून रासायनिक खत खरेदी केले होते. पिकांना दिल्यानंतर त्याचा लागलीच दुष्परिणाम जाणवू लागला. संजय बापू पाटील, किरण बापू पाटील, अवधूत माणिक पाटील, संतोष नामदेव कुंभार व साहेबराव ओंकार पाटील या शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाची वाढ खुंटली, पाने पिवळी पडण्यासह ते आकुंचित पावले. खतांमुळेच हा प्रकार झाल्याचे लक्षात आले. जळगाव बाजार समितीचे संचालक अरुण लक्ष्मण पाटील यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी तालुका कृषि अधिकारी शिवाजी राऊत, पंचायत समितीचे कृषि अधिकारी धीरज बढे, मंडळ कृषि अधिकारी मिलिंद वाल्हे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांनी पाहणी शेतात जाऊन पिकांची पाहणी केली व पंचनामे केले.

खत पिकापासून लांब केले

गावातील कृषी केंद्रावरुन १५ टन खत विक्री झाले आहे. ते २६ शेतकऱ्यांनी घेतले आहे. या शेतकऱ्यांची यादी कृषी अधिकाऱ्यांनी घेतली. सहा शेतकऱ्यांच्या पिकावर दुष्परिणाम जाणवताच ज्या शेतकऱ्यांनी नुकताच खताचा मात्र दिला, त्यांनी लागलीच पिकापासून खत वेगळे करण्याचे काम हाती घेतले होते.  

गिरीश महाजनांच्या सूचना

जामनेर, बोदवड व जळगाव तालुक्यात कापूस पिकात रासायनिक खत टाकल्यानंतर कापूस पिकावर दुष्परिणाम दिसून आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी  जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना सूचना देऊन संबंधित शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यास सुचीत केले असून शेतकऱ्यांनी वापरलेल्या रासायनिक खतांचे नमुने तपासणी करता पाठवण्याच्या सूचना दिल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

सहा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले आहेत. खतांचा साठा सील करण्यात आला आहे. नमुने नाशिक प्रयोग शाळेत पाठविले आहेत. १५ दिवसात अहवाल येईल. नियमानुसार जी नुकसान भरपाई देणे शक्य आहे, ती देण्यात येईल.-धीरज बढे, कृषी अधिकारी

टॅग्स :Jalgaonजळगाव