शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

रासायनिक खतांच्या वापरामुळे कापसावर दुष्परिणाम, वडली येथे शेतकऱ्यांचे नुकसान

By सुनील पाटील | Updated: July 16, 2023 18:04 IST

शेतकऱ्यांनी गावातीलच कृषी केंद्रातून रासायनिक खत खरेदी केले होते. पिकांना दिल्यानंतर त्याचा लागलीच दुष्परिणाम जाणवू लागला.

जळगाव : रासायनिक खताच्या वापरामुळे तालुक्यातील वडली शिवारात कापूस पिकावर दुष्परिणाम जाणवू लागला आहे. पिकाची वाढ खुंटली असून पानांना गळती तसेच आकुंचित पावत आहे. या प्रकारानंतर कृषी विभागाने शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. खते पुरविणाऱ्या दुकानदाराकडील साठा सील केला आहे. खतांचे नमुने घेण्यात आले असून विश्लेषणासाठी नाशिक प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांनी गावातीलच कृषी केंद्रातून रासायनिक खत खरेदी केले होते. पिकांना दिल्यानंतर त्याचा लागलीच दुष्परिणाम जाणवू लागला. संजय बापू पाटील, किरण बापू पाटील, अवधूत माणिक पाटील, संतोष नामदेव कुंभार व साहेबराव ओंकार पाटील या शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाची वाढ खुंटली, पाने पिवळी पडण्यासह ते आकुंचित पावले. खतांमुळेच हा प्रकार झाल्याचे लक्षात आले. जळगाव बाजार समितीचे संचालक अरुण लक्ष्मण पाटील यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी तालुका कृषि अधिकारी शिवाजी राऊत, पंचायत समितीचे कृषि अधिकारी धीरज बढे, मंडळ कृषि अधिकारी मिलिंद वाल्हे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांनी पाहणी शेतात जाऊन पिकांची पाहणी केली व पंचनामे केले.

खत पिकापासून लांब केले

गावातील कृषी केंद्रावरुन १५ टन खत विक्री झाले आहे. ते २६ शेतकऱ्यांनी घेतले आहे. या शेतकऱ्यांची यादी कृषी अधिकाऱ्यांनी घेतली. सहा शेतकऱ्यांच्या पिकावर दुष्परिणाम जाणवताच ज्या शेतकऱ्यांनी नुकताच खताचा मात्र दिला, त्यांनी लागलीच पिकापासून खत वेगळे करण्याचे काम हाती घेतले होते.  

गिरीश महाजनांच्या सूचना

जामनेर, बोदवड व जळगाव तालुक्यात कापूस पिकात रासायनिक खत टाकल्यानंतर कापूस पिकावर दुष्परिणाम दिसून आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी  जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना सूचना देऊन संबंधित शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यास सुचीत केले असून शेतकऱ्यांनी वापरलेल्या रासायनिक खतांचे नमुने तपासणी करता पाठवण्याच्या सूचना दिल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

सहा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले आहेत. खतांचा साठा सील करण्यात आला आहे. नमुने नाशिक प्रयोग शाळेत पाठविले आहेत. १५ दिवसात अहवाल येईल. नियमानुसार जी नुकसान भरपाई देणे शक्य आहे, ती देण्यात येईल.-धीरज बढे, कृषी अधिकारी

टॅग्स :Jalgaonजळगाव