शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणात नैतिक, अध्यात्मिक मूल्यांचा समावेश असावा - जयश्री डागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:30 IST

ताणतणाव कमी करण्यासाठी मानसिक शांती प्राप्त करा

जळगाव : आज आपण जे शिक्षण घेतो त्यात आणि प्रत्यक्ष जीवन, यात मोठी तफावत असल्याने नोकरी, व्यवसाय करताना प्रत्येकाचा मोठा ताणतणाव वाढत आहे. त्यासाठी शिक्षण घेतानाचा त्यात नैतिक, अध्यात्मिक मूल्यांचाही समावेश करीत जीवन मूल्याचे धडे शिक्षणातून मिळणे गरजेचे आहे, असे मत व्यक्तीमक्त विकास प्रशिक्षक जयश्री डागा (कोलकाता) यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.व्यक्तीमक्त विकासाचे प्रशिक्षण देण्यासह धार्मिक कार्याचा प्रचार, प्रसार करणाऱ्या जयश्री डागा या शहरात आल्या असता त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्यावेळी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात डागा यांच्याशी झालेला हा संवाद....प्रश्न - धकाधकीच्या जीवनात तणावापासून कशी मुक्ती मिळू शकते?उत्तर - आज प्रत्येकाकडे वेळ कमी आहे, असे म्हटले जाते. मात्र कोणतेही काम वेळेवर केल्यास व योग्य नियोजन ठेवल्यास कोणतेही काम सहज शक्य होते. महत्त्वाचे म्हणजे भूतकाळाचा व भविष्याचा विचार न करता आज काय स्थिती आहे, ते ओळखून वर्तमानात जगणे शिकले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक जण जास्त विचार करतो व तणाव वाढवून घेत असतो. त्यासाठी मानसिक शांती राखत काम केल्यास आपोआपच कार्यक्षमता वाढते व तणाव कमी होण्यास मदत होते.प्रश्न - स्पर्धेच्या युगात यश कसे मिळवावे ?उत्तर - यशासाठी अहिंसेचा मार्ग सुखर आहे. अहिंसेची शिकवण ही केवळ स्वत:वरच नाही तर आपले संपूर्ण कुटुंब, आपला व्यवसाय, सामाजिक जीवन यावर प्रभावशाली आहे. अहिंसेचा भाव ठेवल्यास या सर्व पातळीवर यश मिळविणे शक्य आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगातही यातून आपण यश मिळवू शकतो व सर्व समस्यांचेही निराकरण त्यातून होवू शकते.प्रश्न - व्यक्तीमत्व विकासाबाबत काय सल्ला द्याल ?उत्तर - व्यक्तीत्व हे केवळ बाह्य असू नये तर आपल्या वागण्या-बोलण्यातूनही उत्तम व्यक्तीमत्त्वाची छाप पडली पाहिजे. शारीरिक व्यक्तीमत्त्वासह प्रत्येक जण मानसिक, भावनात्मक, अध्यात्मिक पातळीवर विकसित झाला तर त्याचा खरा व्यक्तीमत्त्व विकास होवू शकतो.वेळेला महत्त्व द्यादैनंदिन जीवनात कोणतेही काम करताना ते वेळेवर होणे महत्त्वाचे असून एकदा वेळ चुकली की अडथळे येतात व त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.- जयश्री डागा, व्यक्तीमक्त विकास प्रशिक्षक

टॅग्स :Jalgaonजळगाव