शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने - नीलेश विकमसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 13:18 IST

देशाचे भविष्य बदलविण्याची ताकद सी.ए.अभ्यासक्रमात

ठळक मुद्देराष्ट्रीय वृद्धीदरावरही परिणाम नाहीसनदी लेखापालांची गरज वाढतेयतंत्रज्ञानाचे आव्हान पेलण्यासाठी तयारी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 - नोटाबंदी असो अथवा वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणाली असो, यामुळे भविष्यात चांगले परिणाम दिसणार आहे. यामुळे कोणताही परिणाम झाला नसून देशाची अर्थव्यवस्था योग्य पातळीवर असल्याचे आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नीलेश विकमसे यांनी सांगितले.  नवीन कायद्यांमुळे चुकीचे काम करणा:यांना करांची भीती आहे, मात्र प्रामाणिक व्यक्तीला याची काहीही चिंता राहणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केली.  रिंगरोडवरील आयसीएआय भवन येथे 27 सप्टेंबर रोजी जळगावशाखेला त्यांनी सदिच्छा भेटी दिली, त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी सेंट्रल कौन्सिलचे सदस्य  मंगेश किनारे,  अनिल भंडारी, प्रफुल्ल छाजेड, सर्वेश जोशी, जळगाव शाखेच्या चेअरमन पल्लवी मयूर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 दहा वर्षांनी सी.ए.च्या नवीन अभ्यासक्रमाची रचना होत असते. त्यात आता अर्थव्यवस्थेत व प्रशासकीय रचनेत सनदी लेखापालांची गरज वाढत आहे. त्यामुळे गरीब, श्रीमंत, युवक-युवती, कोणतेही आरक्षण असा भेदभाव नसलेला, सर्व समानता असलेला व भविष्यात अधिक उत्पन्न देणारा सी.ए.अभ्यासक्रम तयार कण्यात आला असून यामुळे विद्याथ्र्याना उज्‍जवल भविष्याच्या संधी असल्याचे विकमसे यांनी सांगितले. 

नोटाबंदीनंतर राष्ट्रीय वृद्धीदर कमी झाला असे वाटत असले तरी हा दर नोटाबंदी अथवा जीएसटीमुळे कमी झाला नसून तो आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम असल्याचे विकमसे यांनी स्पष्ट केले.

आयसीएआयने आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठे काम केले असून जी.एस.टी.विषयी जनजागृती व पुस्तके प्रकाशित केली आहेत. आयसीएआयला रेल्वे विभागाची अर्थविषयक जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. संस्थेने डिजिटल अकौन्टन्सी बोर्ड तयार करुन तंत्रज्ञानाचे आव्हान पेलण्यासाठी तयारी केली आहे. कॅनडासारख्या देशात 12 हजार चार्टर्ड अकौन्टटची गरज असताना तिथे केवळ सहा हजार चार्टर्ड अकौन्टटंची उपलब्धता आहे. त्यामुळे आपल्या देशातील चार्टर्ड अकौन्टंटला देश विदेशात मोठय़ा संधी उपलब्ध असणारे हे करिअर असल्याचे विकसने यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जळगाव शाखेचे उपाध्यक्ष अजय जैन, मानद सचिव स्मिता बाफना, पंकज अग्रवाल, माजी अध्यक्ष नितीन झंवर, निरंजन दोशी, जयेश दोशी, शेखर सोनाळकर आदींची उपस्थिती होती.