शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

आर्थिक नाकेबंदी हाच चीनला खरा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:31 IST

प्रत्येक भारतीयाने सरसावण्याची गरज

जळगाव : सीमेवर कुरघोड्या करणाऱ्या चीनला धडा शिकविण्यासाठी आपले सैन्य त्यांच्याशी दोन करीतच आहे. या सोबतच प्रत्येक भारतीयाने चीनच्या वस्तूंसह मोबाईल अ‍ॅप नाकारून स्वदेशीचा नारा दिल्यास चीनची आर्थिक नाकेबंदी होऊन हाच चीनला खरा धडा असेल, असे आवाहन विविध संस्थांद्वारे केले जात आहे. यासाठी चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकल्यास भारतीय सैन्याला हीच मदत ठरेल, असाही सूर उमटत आहे.चीनच्या कुरापती पुन्हा सुरू झाल्या असून गलवान येथे घुसखोर चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीत आपल्या देशाचे अनेक जवान शहीद झाले. भारतीय जवानांनी सीमेवर चोख प्रत्युत्तरही दिले आहे. आता आपण सीमेच्या आत चीनला उत्तर देण्याची वेळ आल्याचे आवाहन श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे करण्यात आले आहे. या सोबतच राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीनेदेखील चीनची आर्थिक कोंडी करण्याचे आवाहन केले जात आहे.पूर्वीपासूनच चीन विरुद्ध रोषकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातून चीनवर बहिष्काराचे अस्त्र उगारले जात आहे. यापासून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी चीनने भारतीय सीमेवर कुरापती सुरू केल्या आहेत. यात आता तर भारतीय सैनिक शहिददेखील झाले. यामुळे देशभरासह शहरातही संतापाची लाट उसलळी आहे. या पूर्वीदेखील चीन विरुद्ध लढा उभा करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत गेल्या वर्षी श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे आंदोलन उभारण्यात आले होते. यात चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कारासाठी ठिकठिकाणी आवाहन करण्यात आले. तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चिनी वस्तू न वापरण्याची शपथ देण्यात आली व महाविद्यालयांमध्ये पथनाट्यही सादर करण्यात आले. त्यानंतर चीनच्या प्रतिकात्मक ध्वजाचे दहन करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून चीनविरुद्धची ही धगधगणाºया आग आता अधिकच भडकली आहे.अ‍ॅप नाकाराभारतीय जवानांनी सीमेवर चीनला चोख प्रत्युत्तर दिले असून आता आपण सीमेत चीनला उत्तर देण्याची वेळ आल्याचे आवाहन श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केले आहे. चिनी वस्तू खरेदी करू नये नाही, चिनी अ‍ॅप वापरणे बंद करा, असे आवाहन केले जात आहे. आमच्या पैशांनी चीनने गब्बर व्हायचे आणि आमचेच पैसे वापरून स्वत:चे सैन्य पोसायचे आणि आमच्या सीमा पोखरायच्या, असे प्रकार सुरू असल्याने हे रोखणे आपल्या हातात असल्याचेही संस्थेच्यावतीने सांगितले जात आहे.सैन्य ‘बुलेट’ने लढते, आपण ‘व्हॅलेट’ने लढासीमेवर भारतीय सैन्य बंदुकीच्या गोळ््यांनी (बुलेट) लढत आहे, आपण देशात चीन विरुद्ध व्हॅलेटच्या माध्यमातून (पैशाच्या पाकिटने) लढा असे आवाहन राष्ट्रीय सुरक्षा मंचचे संयोजन सचिन नारळे यांनी केले आहे. जगभरातून चीन विरुद्धचा रोष व त्याच्यावर होणाºया बहिष्काराच्या कारवाईपासून लक्ष वळविण्यासाठी चीनने भारतीय सीमेवर कुरापती सुरू केल्याचा आरोप नारळे यांनी करीत भारतीयांनी मिळून चिनी वस्तू टाळाव्या व चीनला धडा शिकवावा, असे आवाहनही केले आहे.चीनविरुद्ध लढा द्यायचा असेल तर चिनी वस्तू, अ‍ॅप नाकारावेच लागेल. चीनला रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे, तरच चीन वठणीवर येऊ शकेल.- कैलास सोनवणे, अध्यक्ष, श्री स्वामी विवेकानंतर बहुउद्देशीय मंडळसध्या चीन सीमेवर गंभीर स्थिती आहे. आपले सैनिक बुलेटने लढत आहे, आपण आपल्या व्हॅलेटच्या माध्यमातून लढण्याची ही वेळ आहे. चीनची आर्थिक कोंडी केल्यावरच तो ठिकाणावर येईल. यासाठी प्रत्येक भारतीयाचा हातभार आवश्यक आहे.- सचिन नारळे, संयोजक, राष्ट्रीय सुरक्षा मंच

टॅग्स :Jalgaonजळगाव