शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

यंदाच्या पावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात ४१ घरे पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:54 IST

आतापर्यंत पुराच्या पाण्यात ८ जण वाहून गेले

जळगाव : यंदा पावसाने जोरदार हजेरी लावत सरासरीची शंभरी ओलांडली आहे. मात्र संततधार व जोरदार पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४१ पक्क्या व कच्च्या घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. तर ३१९७ कच्च्या व पक्क्या घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. तर पुराच्या पाण्यात वाहून ८ जणांचा मृत्यू झाला आहे.यंदा पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आले. या पुरामुळे तसेच संततधार पावसामुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ४१ घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे. १४८२ पक्क्या घरांची तर १६९७ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली आहे.पुन्हा अतिवृष्टीचा इशारा... जिल्ह्यात यंदा पावसाने सरासरीची शंभरी पार केली आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अशी परिस्थिती असताना जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. लहान-मोठे पूल, रस्ते पुराच्या पाण्यामुळे बाधीत झाले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेची झाडे, विद्युत खांब व तारा धोकादायक अवस्थेत आहेत. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव