शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
2
"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ६०० ड्रोन डागले, पण..."
3
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
4
धक्कादायक! ८ वर्षांच्या मुलाची लोकांना भीती; सायकल चोरीचा 'मास्टरमाइंड', पोलीसही हैराण
5
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
6
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
7
भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  
8
भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार
9
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
10
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
11
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
12
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
13
Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!
14
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
15
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
16
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
17
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
18
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
19
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
20
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली

कोरोना काळात २९१ जणांनी कवटाळले जीवनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:12 IST

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भावनिक, आर्थिक आधाराची गरज! : जळगाव शहरात ३८ जणांनी संपविले जीवन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना ...

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भावनिक, आर्थिक आधाराची गरज! : जळगाव शहरात ३८ जणांनी संपविले जीवन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना हे असे संकट जगावर आले की त्यामुळे अनेकांचे रोजगार हिरावला गेला. अनेकांची कुटुंब उद‌्ध्वस्त झाली. लाखोंच्या संख्येने देशात लोकांचा जीव गेला. एकट्या जळगाव जिल्ह्यात २५६६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे संकटात सापडेल्या अनेकांना नैराश्य आले. कुणाची रोजीरोटी गेली तर कोणाच्या कुटुंबात भांडणं झाली. यामुळे जळगाव जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात २९१ जणांनी आत्महत्या करून जीवन संपविले आहे. यात सर्वाधिक संख्या तरुणांची आहे.

जळगाव शहर व तालुक्यात ३८ जणांनी आत्महत्या केली तर भुसावळ उपविभागात १७, फैजपूर ४६, मुक्ताईनगर २६, चाळीसगाव ४८, पाचोरा ४३, अमळनेर ४९ व चोपडा उपविभागात २४ अशा एकूण २९१ जणांनी चार महिन्यात आत्महत्या केल्याची नोंद पोलिसात आहे. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असली तरी प्रामुख्याने कोरोना हेच जास्त लोकांचे कारण ठरले आहे. कोणी राहत्या घरात गळफास घेतला, कोणी रेल्वेखाली उडी घेतली तर कोणी विष प्राशन केले. अशा लोकांचे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांना मानसिक व आर्थिक आधाराची गरज भासली आहे. अनेकांची लहान मुले पोरकी झाली आहेत. कोणत्या मुलाची आई गेली तर कोणाचे वडील गेले तर आई-वडील यांचा आधार असलेला तरुण मुलगा गेला. त्यामुळे मोठा आघात या कुटुंबावर आलेला आहे. आता लॉकडाऊन शिथिल झाले, त्यामुळे रोजगार, उद्योग-धंदे सुरू झाले. अनेकांची गाडी आता रुळावर येऊ लागली आहे.

हे दिवसही जातील...

कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. सारखं घरात बसून कुटुंबातही कटकटी सुरू झाल्या. त्यातून नैराश्य व तणावाचे वातावरण निर्माण झाले. याच कारणांनी अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. घरातील कर्ता व कमावत्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने घर व कुटुंब उघड्यावर आले. अशी कुटुंब तणाव संकटात आहेत. परंतु, येणारी व आलेली वेळ कधीच थांबत नाही. हे दिवसही निघून जातील, पुन्हा चांगले दिवस येतील, या आशेने कुटुंब जगायला शिकत आहेत. जवळचे नातेवाईक व मित्र अशावेळी मानसिक आधार देत आहेत.

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

आत्महत्या ही नैसर्गिक घटना नाही. त्यामुळे असा आघात आलेल्या कुटुंबाला सावरायला खूप वेळ लागतो. त्यात तरुण व्यक्तीने आत्महत्या केली असेल तर घरात खूपच वातावरण बिघडलेले असते, त्यांना सावरायला वेळ लागतो. मात्र जे आपल्या हातात नाही, नव्हते व जे घडून गेले, त्याला अपघात समजून विसरणे व स्वत: तसेच परिवाराची काळजी घेणे हेच अशा वेळी महत्त्वाचे असते.

२०१९ मध्ये शहरात झालेल्या आत्महत्या : १११

२०२० मध्ये शहरात झालेल्या आत्महत्या : १३६

जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यातील आत्महत्या : ३८

कोणत्या वयोगटातील किती आत्महत्या

२५ वर्षापेक्षा कमी : ०९

२६ ते ४० वयोगट : १८

४१ ते ६० वयोगट : ०९

६१ पेक्षा जास्त : ०२

काय म्हणतात मानसोपचार तज्ज्ञ

सध्याच्या परिस्थितीत कोविडमुळे कामे बंद पडले. लॉकडाऊनमध्ये मित्रांशी संवाद कमी झाला, एकाच जागी राहणे, यामुळे नैराश्यात वाढले आहे. त्यातच घरगुती हिंसाचारही या काळात वाढले आहेत, शिवाय व्यसनाधीनता वाढल्याने अशा बाबींना तरुण लवकर बळी पडत आहेत. त्यामुळे या येणाऱ्या नैराश्यात काही मनाविरुद्ध झाल्यास ते आत्महत्येचे पावले उचलतात. यासाठी संवाद वाढविणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. दिलीप महाजन, मानसोपचार तज्ज्ञ

लॉकडाऊनमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची वेगवेगळी कारणे आहेत. यात असुरक्षित वातावरण हे एक कारण आहे. कारण कोणत्याच गोष्टीची कोणाकडे उत्तरे नव्हती. पुढे काय होणार हे माहीत नव्हते. सर्वत्र नकारात्मकता होती. शिवाय अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. लॉकडाऊनच्या काळात संवाद घटला, विचारवंत लोकही कोरोना व्यतिरिक्त काहीच बोलत नव्हते. ही कारणं आहेत. सुसंवादाच्या माध्यमातून नैराश्य कमी करता येते. त्यासाठी एकमेकांमध्ये संवाद हवा

- डॉ. पंकज संघवी, मानसोपचार तज्ज्ञ

--