शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात २९१ जणांनी कवटाळले जीवनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:12 IST

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भावनिक, आर्थिक आधाराची गरज! : जळगाव शहरात ३८ जणांनी संपविले जीवन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना ...

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भावनिक, आर्थिक आधाराची गरज! : जळगाव शहरात ३८ जणांनी संपविले जीवन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना हे असे संकट जगावर आले की त्यामुळे अनेकांचे रोजगार हिरावला गेला. अनेकांची कुटुंब उद‌्ध्वस्त झाली. लाखोंच्या संख्येने देशात लोकांचा जीव गेला. एकट्या जळगाव जिल्ह्यात २५६६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे संकटात सापडेल्या अनेकांना नैराश्य आले. कुणाची रोजीरोटी गेली तर कोणाच्या कुटुंबात भांडणं झाली. यामुळे जळगाव जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात २९१ जणांनी आत्महत्या करून जीवन संपविले आहे. यात सर्वाधिक संख्या तरुणांची आहे.

जळगाव शहर व तालुक्यात ३८ जणांनी आत्महत्या केली तर भुसावळ उपविभागात १७, फैजपूर ४६, मुक्ताईनगर २६, चाळीसगाव ४८, पाचोरा ४३, अमळनेर ४९ व चोपडा उपविभागात २४ अशा एकूण २९१ जणांनी चार महिन्यात आत्महत्या केल्याची नोंद पोलिसात आहे. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असली तरी प्रामुख्याने कोरोना हेच जास्त लोकांचे कारण ठरले आहे. कोणी राहत्या घरात गळफास घेतला, कोणी रेल्वेखाली उडी घेतली तर कोणी विष प्राशन केले. अशा लोकांचे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांना मानसिक व आर्थिक आधाराची गरज भासली आहे. अनेकांची लहान मुले पोरकी झाली आहेत. कोणत्या मुलाची आई गेली तर कोणाचे वडील गेले तर आई-वडील यांचा आधार असलेला तरुण मुलगा गेला. त्यामुळे मोठा आघात या कुटुंबावर आलेला आहे. आता लॉकडाऊन शिथिल झाले, त्यामुळे रोजगार, उद्योग-धंदे सुरू झाले. अनेकांची गाडी आता रुळावर येऊ लागली आहे.

हे दिवसही जातील...

कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. सारखं घरात बसून कुटुंबातही कटकटी सुरू झाल्या. त्यातून नैराश्य व तणावाचे वातावरण निर्माण झाले. याच कारणांनी अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. घरातील कर्ता व कमावत्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने घर व कुटुंब उघड्यावर आले. अशी कुटुंब तणाव संकटात आहेत. परंतु, येणारी व आलेली वेळ कधीच थांबत नाही. हे दिवसही निघून जातील, पुन्हा चांगले दिवस येतील, या आशेने कुटुंब जगायला शिकत आहेत. जवळचे नातेवाईक व मित्र अशावेळी मानसिक आधार देत आहेत.

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

आत्महत्या ही नैसर्गिक घटना नाही. त्यामुळे असा आघात आलेल्या कुटुंबाला सावरायला खूप वेळ लागतो. त्यात तरुण व्यक्तीने आत्महत्या केली असेल तर घरात खूपच वातावरण बिघडलेले असते, त्यांना सावरायला वेळ लागतो. मात्र जे आपल्या हातात नाही, नव्हते व जे घडून गेले, त्याला अपघात समजून विसरणे व स्वत: तसेच परिवाराची काळजी घेणे हेच अशा वेळी महत्त्वाचे असते.

२०१९ मध्ये शहरात झालेल्या आत्महत्या : १११

२०२० मध्ये शहरात झालेल्या आत्महत्या : १३६

जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यातील आत्महत्या : ३८

कोणत्या वयोगटातील किती आत्महत्या

२५ वर्षापेक्षा कमी : ०९

२६ ते ४० वयोगट : १८

४१ ते ६० वयोगट : ०९

६१ पेक्षा जास्त : ०२

काय म्हणतात मानसोपचार तज्ज्ञ

सध्याच्या परिस्थितीत कोविडमुळे कामे बंद पडले. लॉकडाऊनमध्ये मित्रांशी संवाद कमी झाला, एकाच जागी राहणे, यामुळे नैराश्यात वाढले आहे. त्यातच घरगुती हिंसाचारही या काळात वाढले आहेत, शिवाय व्यसनाधीनता वाढल्याने अशा बाबींना तरुण लवकर बळी पडत आहेत. त्यामुळे या येणाऱ्या नैराश्यात काही मनाविरुद्ध झाल्यास ते आत्महत्येचे पावले उचलतात. यासाठी संवाद वाढविणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. दिलीप महाजन, मानसोपचार तज्ज्ञ

लॉकडाऊनमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची वेगवेगळी कारणे आहेत. यात असुरक्षित वातावरण हे एक कारण आहे. कारण कोणत्याच गोष्टीची कोणाकडे उत्तरे नव्हती. पुढे काय होणार हे माहीत नव्हते. सर्वत्र नकारात्मकता होती. शिवाय अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. लॉकडाऊनच्या काळात संवाद घटला, विचारवंत लोकही कोरोना व्यतिरिक्त काहीच बोलत नव्हते. ही कारणं आहेत. सुसंवादाच्या माध्यमातून नैराश्य कमी करता येते. त्यासाठी एकमेकांमध्ये संवाद हवा

- डॉ. पंकज संघवी, मानसोपचार तज्ज्ञ

--