शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

वडजीसह सहा गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 18:43 IST

गिरणेतून बेसुमार वाळू उपसा : पाण्याची पातळी खालावली

वडजी, ता. भडगाव : परिसरातील गिरणा पात्रातील वाळू उपशाने पाण्याची पातळी खालवत असून वडजीसह परिसराती सहा गावांचा पाणीपुरवठा यामुळे धोक्यात आला आहे.गेल्या काही वर्षापासून पावसाअभावी गिरणा पट्टयात पाणीटंचाईचे सावट दिवसेंदिवस गडद होत असतांना यातच भर म्हणून वडजी, वाक व वडधे येथील गिरणा पात्रात बिनधास्त वाळू उपसा सुरू असल्याने गिरणा धरणातून सुटणारे आवर्तनातील पाणी वाळू अभावी जमीनीत न जिरता वाहून जाते. त्यामुळे वडजी, रोकडाफार्म, वडगाव -नालबंदी, रूपनगर, पळासखेडा, महिंदळे या गावांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीत लगेचच पाण्याचा ठणठणाट होत आहे.गेल्या काही वर्षापासून वाक व वडधे गावांच्या हद्दीतील गिरणा पात्रातील वाळू मोठया प्रमाणात उपसली गेली आहे मात्र वडजी गावाच्या हद्दीत वडजी ग्रा.पं. व नागरिकांनी भविष्यात पाणीटंचाई होणार नाही यासाठी मोठ्या प्रमाणावर वाळू राखून ठेवली होती. यामुळे वडजी, वडगाव - नालबंदी, पळासखेडा, माहिंदळे या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाºया विहिरींना गिरणा धरणातून सोडलेल्या आवर्तनानंतरही पुढचे आवर्तनापर्यंन्त बºयापैकी पाणी टिकून राहत असे. वाक व वडधे गावांच्या हद्दीतील नदीपात्रातील वाळू संपली असल्याने अवैद्य वाळूउपसा करणाऱ्यांचा मोर्चा आता वडजी हद्दीच्या नदीपात्रात वळला असुन हजारो ब्रास वाळू रात्रीचा फायदा उठवत नेली. १०ते १२ फुटापर्यंत वाळूचा उपसा झाल्याचे दिसून येत आहे.यामुळे पाणीपुरवठा करणाºया विहिरीनी तळ गाठला आहे. तर गिरणा नदी भर पावसाळ्यात कोरडी झाल्याने साधे डबके देखील गिरणेला नसल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट या गावापुढे आ वासून उभे आहे.महसूल विभागाचे दुर्लक्षअशाच प्रकारे सतत वाळूउपसा होत गेला तर लवकरच या सहा-सात गावांना सततच पाणीटंचाईच्या भीषण संकटाला समोर जावे लागेल. हजारो ब्रॉस वाळू उपसा होवून देखील महसुल विभाग सर्व अलबेल असल्याचे भासवत आहे. १० फुट खोलीपर्यंत मोठमोठे खड्डे पाडून गिरणा नदीचे वस्त्रहरण होत आहे. मात्र प्रशासनातर्फे ठोस अशा काही उपाययोजना होत नसल्याचे दिसून येते. एखाद वेळेसच थातूरमातूर क ारवाई होते. याची दखल घेवून लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न उचलावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.