शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शौचालय असुविधेमुळे सचखंड एक्सप्रेस तब्बल अडीच तास उशिराने रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 01:42 IST

सचखंड एक्सप्रेसला शौचालय असुविधेमुळे प्रवाशांनी ताठर भूमिका घेत जोपर्यंत साफसफाई होणार नाही गाडी हलू देणार नाही याकारणाने सचखंड एक्सप्रेला भुसावळ स्थानकावर तब्बल अडीच तासाचा खोळंबा झाला.

ठळक मुद्देपाच गाड्यांवर परिणामरेल्वे प्रशासनाच्या हवेत गप्पासुविधांची मात्र वानवा

भुसावळ, जि,जळाव : अमृतसरकडून नांदेडकडे जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेसला शौचालय असुविधेमुळे प्रवाशांनी ताठर भूमिका घेत जोपर्यंत साफसफाई होणार नाही गाडी हलू देणार नाही याकारणाने सचखंड एक्सप्रेला भुसावळ स्थानकावर तब्बल अडीच तासाचा खोळंबा झाला. त्यामुळे इतर पाच गाड्यांना गाड्यांंना २० मिनिटे दीड तासाच्या विलंबाने सोडावे लागले.साफसफाई, स्वच्छता, सुरक्षितता यावर रेल्वे प्रशासन कोट्यवधीचे खर्च करत असून मोठे दावे करत असते. मात्र प्रत्यक्षात फक्त या गप्पा हवेतील आहे, असा अनुभव सचखंड एक्सप्रेसच्या निमित्ताने दिसून आला. गाडी क्रमांक १२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेसच्या कोच क्रमांक ए/१, बी/१ ते बी/६ कोचमध्ये बायो टॉयलेट पूर्णत: भरल्यामुळे सकाळच्या वेळेस शौचास जाण्यासाठी प्रवासासाठी रेल्वेतील सुविधेसाठी हजारो रुपये मोजूनसुद्धा सुविधा मिळत नाही. यामुळे प्रवाशांचा मोठा संताप झाला व जोपर्यंत डब्यातील शौचालयाची साफसफाई होत नाही तोपर्यंत गाडीला पुढे हलू द्यायचे नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली. सकाळी ६:४५ वाजून मिनिटांनी फलाट क्रमांक ३ वर आलेली गाडी ७:५६, ८:३५ व ८:४५ गाडीला तीन वेळा सोडण्याचा प्रयत्न केला असता प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत साफसफाई होत नाही गाडी पुढे जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. शेवटी स्वच्छता झाल्यानंतर ९:१० मिनिटांनी सुमारे अडीच तासाच्या विलंबाने गाडी नांदेड कडे मार्गस्थ झाली.दरम्यान, सचखंड एक्सप्रेस या घटनेमुळे घटनेचा परिणाम पाच गाड्यांवर दिसून आला. गाडी क्रमांक ५९०७६ भुसावल -सुरत पॅसेंजर ही निर्धारित वेळेपेक्षा १ तास २० मिनिटांनी, गाडी क्रमांक १२६५६ नवजीवन एक्सप्रेसही निर्धारित वेळेपेक्षा वीस मिनिटाने, गाडी क्रमांक १२१५२ समराष्ट्र एक्सप्रेस ही २५ मिनिटांनी, गाडी क्रमांक ५११५८ इटारसी-भुसावळ पॅसेंजर ही एक तास २० मिनिटाने भुसावळ रेल्वे स्थानकावर उशिराने आली.दरम्यान, रेल्वे प्रशासन स्वच्छतेविषयी गांभिर्याने लक्ष घालावे व नागरिकांना होणाºया असुविधा दूर कराव्यात, अशी अपेक्षा जनसामान्य आतून व्यक्त करण्यात येत आहे. एरवी चुकून पॅसेंजर ऐवजी एक्सप्रेस गाडीत बसले व तिकिट् राहून गेल्यास दंड करण्यास क्षणाचाही विलंब न करणारे रेल्वे प्रशासन मात्र सुविधांमध्ये नापास झाल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ