शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

शौचालय असुविधेमुळे सचखंड एक्सप्रेस तब्बल अडीच तास उशिराने रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 01:42 IST

सचखंड एक्सप्रेसला शौचालय असुविधेमुळे प्रवाशांनी ताठर भूमिका घेत जोपर्यंत साफसफाई होणार नाही गाडी हलू देणार नाही याकारणाने सचखंड एक्सप्रेला भुसावळ स्थानकावर तब्बल अडीच तासाचा खोळंबा झाला.

ठळक मुद्देपाच गाड्यांवर परिणामरेल्वे प्रशासनाच्या हवेत गप्पासुविधांची मात्र वानवा

भुसावळ, जि,जळाव : अमृतसरकडून नांदेडकडे जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेसला शौचालय असुविधेमुळे प्रवाशांनी ताठर भूमिका घेत जोपर्यंत साफसफाई होणार नाही गाडी हलू देणार नाही याकारणाने सचखंड एक्सप्रेला भुसावळ स्थानकावर तब्बल अडीच तासाचा खोळंबा झाला. त्यामुळे इतर पाच गाड्यांना गाड्यांंना २० मिनिटे दीड तासाच्या विलंबाने सोडावे लागले.साफसफाई, स्वच्छता, सुरक्षितता यावर रेल्वे प्रशासन कोट्यवधीचे खर्च करत असून मोठे दावे करत असते. मात्र प्रत्यक्षात फक्त या गप्पा हवेतील आहे, असा अनुभव सचखंड एक्सप्रेसच्या निमित्ताने दिसून आला. गाडी क्रमांक १२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेसच्या कोच क्रमांक ए/१, बी/१ ते बी/६ कोचमध्ये बायो टॉयलेट पूर्णत: भरल्यामुळे सकाळच्या वेळेस शौचास जाण्यासाठी प्रवासासाठी रेल्वेतील सुविधेसाठी हजारो रुपये मोजूनसुद्धा सुविधा मिळत नाही. यामुळे प्रवाशांचा मोठा संताप झाला व जोपर्यंत डब्यातील शौचालयाची साफसफाई होत नाही तोपर्यंत गाडीला पुढे हलू द्यायचे नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली. सकाळी ६:४५ वाजून मिनिटांनी फलाट क्रमांक ३ वर आलेली गाडी ७:५६, ८:३५ व ८:४५ गाडीला तीन वेळा सोडण्याचा प्रयत्न केला असता प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत साफसफाई होत नाही गाडी पुढे जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. शेवटी स्वच्छता झाल्यानंतर ९:१० मिनिटांनी सुमारे अडीच तासाच्या विलंबाने गाडी नांदेड कडे मार्गस्थ झाली.दरम्यान, सचखंड एक्सप्रेस या घटनेमुळे घटनेचा परिणाम पाच गाड्यांवर दिसून आला. गाडी क्रमांक ५९०७६ भुसावल -सुरत पॅसेंजर ही निर्धारित वेळेपेक्षा १ तास २० मिनिटांनी, गाडी क्रमांक १२६५६ नवजीवन एक्सप्रेसही निर्धारित वेळेपेक्षा वीस मिनिटाने, गाडी क्रमांक १२१५२ समराष्ट्र एक्सप्रेस ही २५ मिनिटांनी, गाडी क्रमांक ५११५८ इटारसी-भुसावळ पॅसेंजर ही एक तास २० मिनिटाने भुसावळ रेल्वे स्थानकावर उशिराने आली.दरम्यान, रेल्वे प्रशासन स्वच्छतेविषयी गांभिर्याने लक्ष घालावे व नागरिकांना होणाºया असुविधा दूर कराव्यात, अशी अपेक्षा जनसामान्य आतून व्यक्त करण्यात येत आहे. एरवी चुकून पॅसेंजर ऐवजी एक्सप्रेस गाडीत बसले व तिकिट् राहून गेल्यास दंड करण्यास क्षणाचाही विलंब न करणारे रेल्वे प्रशासन मात्र सुविधांमध्ये नापास झाल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ