शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शौचालय असुविधेमुळे सचखंड एक्सप्रेस तब्बल अडीच तास उशिराने रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 01:42 IST

सचखंड एक्सप्रेसला शौचालय असुविधेमुळे प्रवाशांनी ताठर भूमिका घेत जोपर्यंत साफसफाई होणार नाही गाडी हलू देणार नाही याकारणाने सचखंड एक्सप्रेला भुसावळ स्थानकावर तब्बल अडीच तासाचा खोळंबा झाला.

ठळक मुद्देपाच गाड्यांवर परिणामरेल्वे प्रशासनाच्या हवेत गप्पासुविधांची मात्र वानवा

भुसावळ, जि,जळाव : अमृतसरकडून नांदेडकडे जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेसला शौचालय असुविधेमुळे प्रवाशांनी ताठर भूमिका घेत जोपर्यंत साफसफाई होणार नाही गाडी हलू देणार नाही याकारणाने सचखंड एक्सप्रेला भुसावळ स्थानकावर तब्बल अडीच तासाचा खोळंबा झाला. त्यामुळे इतर पाच गाड्यांना गाड्यांंना २० मिनिटे दीड तासाच्या विलंबाने सोडावे लागले.साफसफाई, स्वच्छता, सुरक्षितता यावर रेल्वे प्रशासन कोट्यवधीचे खर्च करत असून मोठे दावे करत असते. मात्र प्रत्यक्षात फक्त या गप्पा हवेतील आहे, असा अनुभव सचखंड एक्सप्रेसच्या निमित्ताने दिसून आला. गाडी क्रमांक १२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेसच्या कोच क्रमांक ए/१, बी/१ ते बी/६ कोचमध्ये बायो टॉयलेट पूर्णत: भरल्यामुळे सकाळच्या वेळेस शौचास जाण्यासाठी प्रवासासाठी रेल्वेतील सुविधेसाठी हजारो रुपये मोजूनसुद्धा सुविधा मिळत नाही. यामुळे प्रवाशांचा मोठा संताप झाला व जोपर्यंत डब्यातील शौचालयाची साफसफाई होत नाही तोपर्यंत गाडीला पुढे हलू द्यायचे नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली. सकाळी ६:४५ वाजून मिनिटांनी फलाट क्रमांक ३ वर आलेली गाडी ७:५६, ८:३५ व ८:४५ गाडीला तीन वेळा सोडण्याचा प्रयत्न केला असता प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत साफसफाई होत नाही गाडी पुढे जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. शेवटी स्वच्छता झाल्यानंतर ९:१० मिनिटांनी सुमारे अडीच तासाच्या विलंबाने गाडी नांदेड कडे मार्गस्थ झाली.दरम्यान, सचखंड एक्सप्रेस या घटनेमुळे घटनेचा परिणाम पाच गाड्यांवर दिसून आला. गाडी क्रमांक ५९०७६ भुसावल -सुरत पॅसेंजर ही निर्धारित वेळेपेक्षा १ तास २० मिनिटांनी, गाडी क्रमांक १२६५६ नवजीवन एक्सप्रेसही निर्धारित वेळेपेक्षा वीस मिनिटाने, गाडी क्रमांक १२१५२ समराष्ट्र एक्सप्रेस ही २५ मिनिटांनी, गाडी क्रमांक ५११५८ इटारसी-भुसावळ पॅसेंजर ही एक तास २० मिनिटाने भुसावळ रेल्वे स्थानकावर उशिराने आली.दरम्यान, रेल्वे प्रशासन स्वच्छतेविषयी गांभिर्याने लक्ष घालावे व नागरिकांना होणाºया असुविधा दूर कराव्यात, अशी अपेक्षा जनसामान्य आतून व्यक्त करण्यात येत आहे. एरवी चुकून पॅसेंजर ऐवजी एक्सप्रेस गाडीत बसले व तिकिट् राहून गेल्यास दंड करण्यास क्षणाचाही विलंब न करणारे रेल्वे प्रशासन मात्र सुविधांमध्ये नापास झाल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ