शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

जळगावात 60 हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: June 19, 2017 15:51 IST

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये स्थिती बिकट : पुन्हा बियाणे खरेदी करावे लागणार, शेतकरी अडचणीत

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.19 : जिल्हाभरात 7 ते 11 जून यादरम्यान आलेल्या कमी अधिक पावसात कडधान्य, तृणधान्य व गळीत धान्याची पेरणी केलेल्या जवळपास 60 हजार हेक्टवरील पिके (अंकुर) पावसाअभावी जळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रावर दुबार पेरणी निश्चित मानली जात असून, शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडल्याची स्थिती आहे. 
जिल्हाभरात एक लाख 80 हजार हेक्टरवर पेरणी झाली. त्यात एकटय़ा कापसाचे क्षेत्र एक लाख 42 हजार हेक्टरवर आहे. उर्वरित म्हणजेच जवळपास 38 हजार हेक्टरवर ज्वारी, मका, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिके आहेत. त्यात मक्याची सर्वाधिक 12 हजार हेक्टरवर पेरणी झाली. त्यापाठोपाठ सोयाबीनची नऊ हजार हेक्टवर पेरणी झाली आहे.
पूर्वहंगामी कापूस वगळता इतर पिके धोक्यात
एक लाख 42 हजार हेक्टरपैकी 60 हजार हेक्टवरील पिके ही कोरडवाहू आहेत. ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. उर्वरित म्हणजेच 82 हजार हेक्टवर पूर्वहंगामी (बागायती) कापूस आहे. या कापसाचे सिंचन होत असल्याने त्याला धोका नाही. पण 60 हजार हेक्टवरील पिके काही भागांचा अपवाद वगळता पूर्णत: धोक्यात आली आहेत. जळगाव, धरणगाव, एरंडोल, भुसावळ आणि यावल तालुक्याच्या जळगावनजीकचा भाग या क्षेत्रात पिकांची अवस्था नाजूक बनली आहे.