शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांचा आगार व्यवस्थापकांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 12:40 IST

पहाटेपासून रांगेत उभे राहूनही पास मिळत नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त

जळगाव : सहा दिवसांपासून शाळा सुरु झाल्या तरी विद्यार्थ्यांना एस.टी. बसेस्च्या पास मिळत नसल्याने पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पहाटे पाच वाजेपासूनच बसस्थानकात रांगा लागत आहेत. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे स्मार्टकार्डची नोंदणीही होत नसल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी आगार व्यवस्थापकांना घेराव घातला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्मार्टकार्डची नोंदणी न करता, थेट पास देण्याची मागणी केली.बनावटगिरीला आळा घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक व राज्य शासनाच्या विविध पुरस्कारप्राप्त नागरिकांना ‘आधारकार्ड’ क्रमाकांशी जोडलेले स्मार्टकार्ड दिले जाणार आहे. यासाठी महिनाभरापासून नवीन बस स्थानकात ज्येष्ठ नागरिकांची स्मार्टकार्डसाठी नोंदणी सुरु आहे. आता विद्यार्थ्यांनादेखील स्मार्टकार्ड दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दर महिन्याला दिला जाणारी कागदी पास बंद होणार आहे.सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थी संतप्तपास काढण्यासाठी परिसरातील गावातील विद्यार्थी पहाटेपासूनच रांगा लावत असले तरी सर्व्हर डाऊन असल्यामुळे एका विद्यार्थ्याच्या स्मार्टकार्ड नोंदणीसाठी २० ते २५ मिनिटे लागत आहे. हे स्मार्टकार्ड आधारकार्डच्या क्रमाकांशी लिंक करण्यात येत असल्यामुळे आधारकार्डचे सर्व्हरच अतिशय संथ गतीने सुरु आहे.विद्यार्थी वेठीसशाळा सुरु होऊन सहा दिवस झाले तरी विद्यार्थ्यांना पास मिळत नसल्याचे चित्र आहे.बसस्थानकात विद्यार्थ्यांची दररोज गर्दी होत आहे. त्यामुळे आता तर नोंदणीसाठी पहाटेपासूनच रांगा लागत आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना दररोज भुर्दंड सहन करावा लागत असून ते वेठीस धरले जात आहे. तसेच या ठिकाणी स्मार्टकार्ड नोंदणीसाठी ज्येष्ठ नागरिकांनींही गर्दी केल्यामुळे नोंदणी कक्षाजवळ अक्षरश: झुंबड उडत आहे.अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराविद्यार्थ्यांना पासेससाठी होणाऱ्या विलंबाबत डॉ.राधेश्याम चौधरी यांनी बस स्थानकात जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांना तात्काळ पास मिळण्यासाठी दोन ठिकाणी स्मार्टकार्ड नोंदणीं व विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे जनरेटरची व्यवस्था करावी, सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक अडचणी तात्काळ सोडाव्यात, विद्यार्थ्यांना लवकर पास मिळण्यासाठी दोन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, कॅन्टींनच्या इमारतीत विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करावी आदी मागण्या आगार प्रमुखांकडे केल्या. विद्यार्थ्यांच्या या समस्या न सुटल्यास काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचेही चौधरी यांनी यावेळी सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर कोळी, संदीप तेले, पी. पी. पाटील, सुभाष ठाकरे, कैलास पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव