शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अर्धवट कामामुळे वाहनधारकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:59 IST

लेंडी नाल्याचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम प्रशासनाने अर्धवटच सोडले आहे. यामुळे वाहनधारकांची गैरसोय ...

लेंडी नाल्याचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम प्रशासनाने अर्धवटच सोडले आहे. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. दरवर्षी पावसाळ््यात कांचनगरातील चौगुले प्लॉट समोरील, या लेंडी नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहायचे. या पुलाची उंची अत्यंत कमी असल्यामुळे, पाऊस पडल्यावर काही वेळातच पुलावरुन पाणी व्हायला सुरुवात व्हायची. यामुळे पुलावरील पाणी कमी होईपर्यंत, वाहतूक ठप्प होत असे. यासाठी महापालिकेतर्फे नुकताच या नाल्यावर दहा ते बारा फुट उंचीचा पूल बांधण्यात आला आहे. सध्या पूलाचे काम पूर्ण झाले असून, दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम मात्र अपूर्ण आहे. मनपा प्रशासनाने पुलाच्या उभारणीनंतर लगेच या रस्त्यावर काँक्रीटीकरणाचे काम करायला हवे होते. मात्र, मुरुम टाकून तात्पुरता रस्ता तयार केला आहे. टाकलेला हा मुरुम पावसाळ््यात वाहून जाण्याची शक्यता आहे. तसेच या रस्त्यावर पावसाळ््यात खड्डेदेखील पडण्याची शक्यता आहे. सध्या शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम सुरु असल्यामुळे, शिवाजीनगरातील नागरिक या मार्गेच वापर करत आहेत. यामुळे या पुलावर सकाळपासूनच वाहनांची वर्दळ वाढत आहे. वाहनांची वर्दळ लक्षात घेता, प्रशासनाने मुरुम टाकण्याऐवजी काँक्रिटीकरणाचा रस्ताच करायला हवा. कदाचित पुलाच्या दोन्ही बाजूला टाकलेला मुरुमाचा भराव वाहून गेला तर, पावसाळ््यात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतील. तसेच यावेळी कॉक्रीटीकरणाचेदेखील काम करता येणार नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने संभाव्य धोके लक्षात घेऊन, हा रस्ता पक्का तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान हाल तरी थांबतील.- सचिन पाटील, रहिवासी.

टॅग्स :Jalgaonजळगाव