शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

थकीत वीज बिलांमुळे जिल्हा परिषदेच्या डिजीटल शाळा आल्या धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:06 IST

जळगाव : वीज थकबाकी मुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. यामुळे डिजीटल शाळांचे अस्तित्व धोक्यात ...

ठळक मुद्दे बील भरण्याची जबाबदारी आता ग्रामपंचायतीकडे

जळगाव : वीज थकबाकी मुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. यामुळे डिजीटल शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्ह्यात या वीज बिलांची सुमारे ७७ लाख इतकी थकबाकी अहे. दरम्यान वीज बिलाच्या थकबाकीवर उपाय म्हणून शाळांचे वीज बिल हे ग्राम पंचायतींनी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरावे, अशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे.स्पर्धेत टिकण्यासाठी डिजीटल शाळाजिल्हा परिषदेच्या शाळांकडे अनेक विद्यार्थी दर्जाअभावी पाठ फिरवत असल्यामुळे इतर खाजगी व इंग्रजी माध्यमांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जिल्हा परिषदेने स्वनिधी तसेच लोकसहभागातून अनेक ठिकाणी डिजिटल शाळा सुरु केल्या आहेत. यात रंगरंगोटी करुन शाळा आकर्षकही करण्यात आल्या आहेत आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहे.सर्वच शाळा डिजीटल करणारजिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १८३७ शाळा आहेत. यापैकी सुमारे ५५० शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. इतर उर्वरीत सर्व शाळा देखील डिजीटल करण्याचा मानस जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांनी व्यक्त केला आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूदही केली जात आहे.ग्राम पंचायत विभागला दिले पत्र१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्राम पंचायतींनी शाळांचे वीज बिल न चुकता भरावे, याबाबतच्या सूचना ग्रामपंचायतींना करुन ही बाब त्यांना बंधनकारक करण्यात यावी यासाठी शिक्षण विभागामार्फत सभापती पोपट भोळे यांनी नुकतेच ग्रामपंचायत विभागाला पत्र पाठविले असून सर्वसाधारण सभेने मान्य केलेल्या या विषयाची तातडीने अंमलबजावणी करावी,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.एकूण ७७ लाखाची थकबाकीजिल्ह्यातील शाळांकडे वीज बिलांची एकूण ७६ लाख ९१हजारावर थकबाकी आहे. यात सर्वाधिक धकबाकी जळगाव तालुक्याची १६ लाख ९२ हजार ९४४ इतकी आहे तर सर्वात कमी थकबाकी यावल तालुक्याची १लाख ९० हजार ९६१ इतकी आहे.विजच नाही, तर डिजीटल शाळांचा उपयोग काय?वीज बिल न भरल्यामुळे जवळपास सर्वच शाळांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. मात्र वीजच नसेल तर शाळा डिजीटल करुन उपयोग काय? असा प्रश्न जि. प. सदस्य लालचंद पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करुन ही स्थिती उद्भवू नये म्हणून राज्यातील अन्य एका जिल्हा परिषदेचे उदाहरण देत शाळांचे वीज बिल हे ग्राम पंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातून भरावे, अशा सूचना कराव्या अशी मागणी केली होती मात्र याची दखलच न घेतल्याने पुन्हा हा मुद्दा जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मांडला होता.

टॅग्स :Schoolशाळा