शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
2
"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
3
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
4
आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
5
'बिग बॉस मराठी ६' लवकरच? कलर्स मराठीने शेअर केला 'धमाकेदार' प्रोमो, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
7
१५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता, २ डिसेंबरला लग्न पण त्याआधीच मयुरेशवर काळाने घाला घातला
8
वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं लग्न, वृंदावन मंदिरात अभिनेत्यासोबत अडकली विवाहबंधनात
9
"टर्मिनेटरसारखी फिरतेय..." श्रद्धा कपूरच्या पायाला दुखापत, स्वत: व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
10
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
11
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
12
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
13
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
14
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
15
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
16
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
17
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
18
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
19
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
20
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
Daily Top 2Weekly Top 5

माल वाहतूकदारांचा संप : रेल्वे माल धक्क्यावर ३० हजार टन माल पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 12:51 IST

कोट्यवधीची उलाढाल ठप्प

ठळक मुद्देसिमेंट व रासायनिक खते पडूनमाल ठेवायला जागा नसल्याने पाळधीला रवाना

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून मालवाहतूकदारांनी बेमुदत संप पुकारल्यामुळे, जळगाव रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्यावर३० हजार टन माल पडून आहे. यामुळे गुंतवणुकदारांची कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे. स्टेशनवरील गोडावून मध्ये माल ठेवायला जागा नसल्याने, भाड्याने गोडाउनमध्ये माल ठेवण्याची वेळ आली आहे.डिझेलच्या वाढलेल्या किंमती, ई-वे बिलातील जाचक अटी व इतर मागण्यासांठी २० जुलैपासून देशभरातील मालवाहतुकदारांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील ५०० माल वाहतूकदार संपात सहभागी झाले आहेत. या संपामुळे दाणा बाजारात परराज्यातून येणाऱ्या मालाची आवक पूर्णपणे ठप्प झाली असून, दुसरीकडे रेल्वेने दररोज परराज्यातून येणारा विविध प्रकारचा माल, संपामुळे मालधक्क्यावरच पडून आहे. संपामुळे गुंतवणुकदारांचा कोट्यावधींचा माल अडकून पडल्याने, उद्योगधंदे थंडावले आहेत.माल ठेवायला जागा नसल्याने पाळधीला रवानामालवाहतूक दारांच्या संपामुळे आधीच माल धक्क्यावर आठवडाभरापासून ३० हजार टन मालाचा साठा पडून असल्याने, दररोज मालगाडीने येणारा माल ठेवायला जागा नाही. यामुळे हा माल पाळधी येथे भाड्याने गोडावून घेऊन, गुरुवारपासून पाठविला जात आहे. शहरातील काही खासगी मालकांच्या ट्रकद्वारे या मालाची वाहतूक करण्यात येत असून, गोडावूनचे भाडे व वाहतूकीचा खर्च वाढल्याने, मालाची ने-आण करणाºया येथील ठेकेदाराला तोटा सहन करावा लागत आहे. दरम्यान, माल धक्क्यावर मालगाडी आल्याने, १२ तासांच्या आत माल उतरविणे गरजेचे असल्याने, दररोज हजारो टन येणारा माल कुठे ठेवायचा हा प्रश्न ठेकेदाराला पडला आहे.सिमेंट व रासायनिक खते पडूनजळगाव रेल्वे स्टेशनवरील माल धक्क्यावर मालगाडीने दररोज गुजराथ, चंद्रपूर, कर्नाटक, राजस्थान या भागातून सिमेंट, रासायनिक खते, मार्बल, फळे, भुसार माल, धान्य व औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांचा कच्चा माल येत असतो. जळगाव मालधक्का वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याने जळगाव, धुळे व नंदुरबार येथील व्यापाºयांनी परराज्यातून मागवलेला हजारो टन माल या ठिकाणी येत असतो. जळगाव माल धक्क्यावर मालगाडी येताच, तासाभरात हा माल मालवाहतूकदारांच्या ट्रकद्वारे संंबंधीत व्यापाºयांकडे पाठविला जातो. मात्र, आठवडाभरापासून मालवाहतूक दारांच्या संपामुळे, हा माल माल धक्क्यावरच पडून आहे. दररोज चार ते पाच हजार टन माल येत असल्याने, आठवडाभरापासून सुमारे ३० हजार टन इतक्या मालाचा साठा झाला आहे.मालवाहतूकदारांच्या संपामुळे माल धक्क्यावर ३० हजार टन मालाचा साठा झाल्यामुळे, गुजरातहून आलेल्या खतांच्या साठवणुकीसाठी जागा नाही. पाळधीला माल ठेवण्यासाठी गोदाम भाडयाने घेतले आहे. संप मिटेपर्यंत मालाची साठवणूक करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.-विजय पुरोहित, व्यवस्थापक, जळगाव रेल्वे मालधक्का हुंडेकरी असोसिएशन.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव