शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

माल वाहतूकदारांचा संप : रेल्वे माल धक्क्यावर ३० हजार टन माल पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 12:51 IST

कोट्यवधीची उलाढाल ठप्प

ठळक मुद्देसिमेंट व रासायनिक खते पडूनमाल ठेवायला जागा नसल्याने पाळधीला रवाना

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून मालवाहतूकदारांनी बेमुदत संप पुकारल्यामुळे, जळगाव रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्यावर३० हजार टन माल पडून आहे. यामुळे गुंतवणुकदारांची कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे. स्टेशनवरील गोडावून मध्ये माल ठेवायला जागा नसल्याने, भाड्याने गोडाउनमध्ये माल ठेवण्याची वेळ आली आहे.डिझेलच्या वाढलेल्या किंमती, ई-वे बिलातील जाचक अटी व इतर मागण्यासांठी २० जुलैपासून देशभरातील मालवाहतुकदारांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील ५०० माल वाहतूकदार संपात सहभागी झाले आहेत. या संपामुळे दाणा बाजारात परराज्यातून येणाऱ्या मालाची आवक पूर्णपणे ठप्प झाली असून, दुसरीकडे रेल्वेने दररोज परराज्यातून येणारा विविध प्रकारचा माल, संपामुळे मालधक्क्यावरच पडून आहे. संपामुळे गुंतवणुकदारांचा कोट्यावधींचा माल अडकून पडल्याने, उद्योगधंदे थंडावले आहेत.माल ठेवायला जागा नसल्याने पाळधीला रवानामालवाहतूक दारांच्या संपामुळे आधीच माल धक्क्यावर आठवडाभरापासून ३० हजार टन मालाचा साठा पडून असल्याने, दररोज मालगाडीने येणारा माल ठेवायला जागा नाही. यामुळे हा माल पाळधी येथे भाड्याने गोडावून घेऊन, गुरुवारपासून पाठविला जात आहे. शहरातील काही खासगी मालकांच्या ट्रकद्वारे या मालाची वाहतूक करण्यात येत असून, गोडावूनचे भाडे व वाहतूकीचा खर्च वाढल्याने, मालाची ने-आण करणाºया येथील ठेकेदाराला तोटा सहन करावा लागत आहे. दरम्यान, माल धक्क्यावर मालगाडी आल्याने, १२ तासांच्या आत माल उतरविणे गरजेचे असल्याने, दररोज हजारो टन येणारा माल कुठे ठेवायचा हा प्रश्न ठेकेदाराला पडला आहे.सिमेंट व रासायनिक खते पडूनजळगाव रेल्वे स्टेशनवरील माल धक्क्यावर मालगाडीने दररोज गुजराथ, चंद्रपूर, कर्नाटक, राजस्थान या भागातून सिमेंट, रासायनिक खते, मार्बल, फळे, भुसार माल, धान्य व औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांचा कच्चा माल येत असतो. जळगाव मालधक्का वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याने जळगाव, धुळे व नंदुरबार येथील व्यापाºयांनी परराज्यातून मागवलेला हजारो टन माल या ठिकाणी येत असतो. जळगाव माल धक्क्यावर मालगाडी येताच, तासाभरात हा माल मालवाहतूकदारांच्या ट्रकद्वारे संंबंधीत व्यापाºयांकडे पाठविला जातो. मात्र, आठवडाभरापासून मालवाहतूक दारांच्या संपामुळे, हा माल माल धक्क्यावरच पडून आहे. दररोज चार ते पाच हजार टन माल येत असल्याने, आठवडाभरापासून सुमारे ३० हजार टन इतक्या मालाचा साठा झाला आहे.मालवाहतूकदारांच्या संपामुळे माल धक्क्यावर ३० हजार टन मालाचा साठा झाल्यामुळे, गुजरातहून आलेल्या खतांच्या साठवणुकीसाठी जागा नाही. पाळधीला माल ठेवण्यासाठी गोदाम भाडयाने घेतले आहे. संप मिटेपर्यंत मालाची साठवणूक करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.-विजय पुरोहित, व्यवस्थापक, जळगाव रेल्वे मालधक्का हुंडेकरी असोसिएशन.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव