शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकरी कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील पावणे तीन लाख शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, आता निकषाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:56 IST

‘महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९’ची घोषणा

जळगाव : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ‘महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९’ ची घोषणा राज्य सरकारकडून झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील दोन लाख ७२ हजार ८३२ शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्य सरकारने या पूर्वी सदर योजनेसाठी मागविलेल्या माहितीमध्ये जिल्ह्यातील वरील शेतकºयांकडे पीक कर्जाची १८२३ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती पाठविण्यात आली आहे. या शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी सरकारकडून यामध्ये आता तरी वेगवेगळे निकष लावून शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नये,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शेतकरी कर्जमाफीसाठी या पूर्वीच्या महायुती सरकारच्या काळात अगोदर राजकीय पक्षांचे आंदोलन व नंतर स्वत: शेतकºयांनीच सुरू केलेल्या आंदोलनानंतर तत्कालीन राज्य शासनाने दीड लाखांपर्यंतच्या थकबाकीला कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यातही आधी २०१२ ते २०१६ पर्यंतचे थकबाकीदार शेतकºयांचा समावेश होता. नंतर त्यात सुधारणा करून २००९ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश करण्यात आला. यासाठी जिल्ह्यातून वेगवेगळ््या याद्या मागविण्यात आल्या. सोबतच यामध्ये अनेक जाचक अटी असल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले.त्यानंतर राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली व शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्हा स्तरावरून माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील दोन लाख ७२ हजार ८३२ शेतकºयांकडे पीक कर्जाची १८२३ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती पाठविण्यात आली.त्यानंतर २१ डिसेंबर रोजी राज्यातील शेतकºयांसाठी ‘महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यात सप्टेंबर २०१९ पर्यंत या योजनेंतर्गत प्रती शेतकरी दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे. मार्च २०२०पासून योजनेचा लाभ थेट शेतकºयांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येणार आहे.निकषाकडे लक्षशिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांनी सत्तेवर येण्यापूर्वी शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. यात ‘किमान पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज’ तरी माफ होईल अशी शेतकºयांना आशा होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन लाखाची मर्यादा टाकून हे सरकारदेखील अटी व निकष लावणार असल्याचे दिसत आहे, असा आरोप आतापासूनच शेतकरी संघटनांकडून होत आहे. त्यामुळे निकष लावून शेतकºयांना वेठीस धरु नका, अशी मागणी केली जात आहे.मागच्या सरकारने छत्रपतींच्या नावाने फसवले तसे या सरकारने महात्मा फुले यांच्या नावाने शेतककºयांना फसवू नये, अशी अपेक्षा शेतकºयांनी आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांनी सत्तेवर येण्यापूर्वी शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन लाखाची मर्यादा टाकून हे सरकारदेखील अटी व निकष लावणार आहेत का, असा प्रश्न निर्माण होत आहे. असे न करता सरकारने शेतकºयांसाठी सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा.- एस.बी. पाटील, शेतकरी कृती समिती

टॅग्स :Jalgaonजळगाव