शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

सुकी नदीचे पाणी पाटात सोडल्याने शेतकरी-अधिकाऱ्यांत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:37 IST

रावेर तालुक्यातील सुकी नदीचे पाणी पाटात सोडल्यामुळे सुकीच्या खोºयात येणाºया गावांमधील संतप्त शेतकºयांनी सोमवारी तहसील कार्यालयात आयोजीत केलेल्या बैठकीत कार्यालयात संताप व्यक्त पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरले. त्यामुळे यावेळ एकच खडाजंगी झाली.

ठळक मुद्देसंतप्त शेतकºयांना अधिकाºयांना द्यावे लागले लेखी आश्वासनरावेर तहसील कार्यालयात प्रश्नांच्या सरबत्तीमुळे उडाला गदारोळ

रावेर/ चिनावल जि. जळगाव : सुकी नदीचे पाणीपाटात सोडल्याच्या कारणावरून रावेर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या दालनामध्ये सोमवारी सकाळी ११ वाजता आयोजीत केलेल्या बैठकीत संतप्त शेतकºयांचे दोन गट आणि अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी शेतकºयांना अधिकाºयांकडून लेखी आश्वासन द्यावे लागले.गारबर्डी धरणाचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी तापी नदीत न सोडता पाटचारीत सोडल्याने सुकी नदी खोºयातील शेतकºयांची बैठक तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी संतप्त शेतकºयांनी पाटबंधारे शाखा अभियंता नेमाडे, शाखा अधिकारी महेश पाटील यांना चांगलेच धारेवर धरले. या प्रश्नावरून तालुक्यातील संबधीत गावांमधील शेतकºयांमध्ये दोन गट पडल्याचे यावेळी निदर्शनास आले.रोझोदा, कोचुर, चिनावल, सावखेडा कुंभारखेडा, गौरखेडा, उटखेडा विवरे, खिरोदा, मोठे वाघोदा, निंभोरा बुद्रूक, दसनुर या परिसरातील हजारो हेक्टरवरील केळी पिक सुकी नदीच्या पाण्यावर अवलंबून असून मागील वर्षी सुकी नदीला पाणी न आल्यामुळे या गावातील भूगर्भातील जलपातळी खुपच खालावली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. परिणामी सुकी पाणी वाटप सहकारी संस्थेने या भागातून १५ लाख रुपये गोळा करुन पाटबंधारे विभागाला दिल्याने उन्हाळ्यात सुकी नदीला गारबर्डी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे या भागातील भूगर्भातील पाणी पातळी स्थिर होती. तशात धरण भरल्यामुळे शेतकºयांच्या जिवात जीव आला होता. सुकी नदीला पाणी आल्यामुळे हा नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे हे पाणी पूर्णपणे तापी नदीला मिळू न देता सुकी नदीचे पाणी पाटचारीत सोडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. त्यामुळे ही बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी जि. प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, कोचूर येथील कमलाकर पाटील, वाघोदा येथील पी. एल. महाजन, डी. के. महाजन, चिनावल येथील गोपाल नेमाडे, वाघाडी येथील पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, निंभोरा येथील दिगंबर चौधरी, कडू पाटील, सुनील कोंडे यांच्यासह शेकडो शेतकºयांनी जोपर्यंत शाखा अभियंता लेखी देत नाही तोपर्यंत तहसीलदार यांच्या दालनातून हलणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यानंतर शाखा अभियंता महेश पाटील यांनी पाटबंधारे कार्य. अभियंता विश्वे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर शेतकºयांना लेखी आश्वासन देण्यात आले. 

टॅग्स :Waterपाणी