शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

पाण्याअभावी एक हेक्टर डाळींब बाग उपटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 18:06 IST

ऐन दुष्काळात पाण्याचे टँंकर टाकून जगविलेली डाळींबाची बाग पावसाळा सुरू होऊन अर्धा पावसाळा संपत आला तरी आडगावसह परिसरात अजूनपर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. त्यातच दैनंदिन टँकरचा खर्च तसेच रोज कुठून पाणी आणावे या नैराश्यातून आडगाव येथील शेतकरी सुभाष हिलाल पाटील या शेतकऱ्याने १७ रोजी ऐक हेक्टरवरील (अडीच ऐकर) डाळींबाचा बागच उपटून फेकण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देआडगाव येथील परिस्थितीदररोज पाणी कुठून आणणार?

विजय पाटीलआडगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : ऐन दुष्काळात पाण्याचे टँंकर टाकून जगविलेली डाळींबाची बाग पावसाळा सुरू होऊन अर्धा पावसाळा संपत आला तरी आडगावसह परिसरात अजूनपर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. त्यातच दैनंदिन टँकरचा खर्च तसेच रोज कुठून पाणी आणावे या नैराश्यातून आडगाव येथील शेतकरी सुभाष हिलाल पाटील या शेतकऱ्याने १७ रोजी ऐक हेक्टरवरील (अडीच ऐकर) डाळींबाचा बागच उपटून फेकण्याचा निर्णय घेतला.घरातील लहान बाळाला जसे जीव लावतात तसे त्यांनी डाळींबाच्या बागेला जीव लावला. बाग जतन करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. ऐक/ दोन वेळेस त्यांनी बहार पण धरला. त्यात पहिल्यांदा चांगले यश आले. दुसºया वेळेसबाजारभावामुळे बराबरी झाली. पाण्याअभावी बहुतेक शेतकऱ्यांंनी उन्हाळ्यातच बागा उपटून फेकल्या. परंतु सुभाष पाटील यांनी धीर न सोडता तीव्र दुष्काळातदेखील या विहिरीवरून, त्या विहिरीवरून पाणी आपल्या स्वत:च्या विहिरीत टाकून बाग जगविण्यासाठी धडपड सुरू केली. परंतु कालांतराने त्या विहिरीदेखील दोन अडीच महिन्यांपासून आटल्याने शेवटी त्यांनी दोन महिन्यांपासून टँंकरने विहिरीत पाणी टाकून बाग जिवंत ठेवली. आज पाऊस येईल, उद्या पाऊस येईल ही आशा ठेऊन अर्धा पावसाळा झाला तरीदेखील वरून राजा येण्याचे नाव न घेत नसल्याने डाळींबाच्या ऊत्पन्नांपेक्षाा नुसते पाण्यावरच जास्त खर्च होत असल्याने अजून त्यावर वेगवेगळ्या फवारण्या हा खर्च असह्य झाल्याने मोठ्या जड अंतकरणाने १७ रोजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पूर्ण बागच उपटून फेकली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईChalisgaonचाळीसगाव