शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

पाण्याअभावी एक हेक्टर डाळींब बाग उपटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 18:06 IST

ऐन दुष्काळात पाण्याचे टँंकर टाकून जगविलेली डाळींबाची बाग पावसाळा सुरू होऊन अर्धा पावसाळा संपत आला तरी आडगावसह परिसरात अजूनपर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. त्यातच दैनंदिन टँकरचा खर्च तसेच रोज कुठून पाणी आणावे या नैराश्यातून आडगाव येथील शेतकरी सुभाष हिलाल पाटील या शेतकऱ्याने १७ रोजी ऐक हेक्टरवरील (अडीच ऐकर) डाळींबाचा बागच उपटून फेकण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देआडगाव येथील परिस्थितीदररोज पाणी कुठून आणणार?

विजय पाटीलआडगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : ऐन दुष्काळात पाण्याचे टँंकर टाकून जगविलेली डाळींबाची बाग पावसाळा सुरू होऊन अर्धा पावसाळा संपत आला तरी आडगावसह परिसरात अजूनपर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. त्यातच दैनंदिन टँकरचा खर्च तसेच रोज कुठून पाणी आणावे या नैराश्यातून आडगाव येथील शेतकरी सुभाष हिलाल पाटील या शेतकऱ्याने १७ रोजी ऐक हेक्टरवरील (अडीच ऐकर) डाळींबाचा बागच उपटून फेकण्याचा निर्णय घेतला.घरातील लहान बाळाला जसे जीव लावतात तसे त्यांनी डाळींबाच्या बागेला जीव लावला. बाग जतन करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. ऐक/ दोन वेळेस त्यांनी बहार पण धरला. त्यात पहिल्यांदा चांगले यश आले. दुसºया वेळेसबाजारभावामुळे बराबरी झाली. पाण्याअभावी बहुतेक शेतकऱ्यांंनी उन्हाळ्यातच बागा उपटून फेकल्या. परंतु सुभाष पाटील यांनी धीर न सोडता तीव्र दुष्काळातदेखील या विहिरीवरून, त्या विहिरीवरून पाणी आपल्या स्वत:च्या विहिरीत टाकून बाग जगविण्यासाठी धडपड सुरू केली. परंतु कालांतराने त्या विहिरीदेखील दोन अडीच महिन्यांपासून आटल्याने शेवटी त्यांनी दोन महिन्यांपासून टँंकरने विहिरीत पाणी टाकून बाग जिवंत ठेवली. आज पाऊस येईल, उद्या पाऊस येईल ही आशा ठेऊन अर्धा पावसाळा झाला तरीदेखील वरून राजा येण्याचे नाव न घेत नसल्याने डाळींबाच्या ऊत्पन्नांपेक्षाा नुसते पाण्यावरच जास्त खर्च होत असल्याने अजून त्यावर वेगवेगळ्या फवारण्या हा खर्च असह्य झाल्याने मोठ्या जड अंतकरणाने १७ रोजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पूर्ण बागच उपटून फेकली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईChalisgaonचाळीसगाव