शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 21:47 IST

तलाठीबांधवांच्याआंदोलनामुळेविद्यार्थ्यांना कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक दाखलेही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी उत्पन्नांचे दाखले आवश्यक आहे.मात्र तो ही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाआहे.

ठळक मुद्दे शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना अडचणी तलाठी बांधवांच्या आंदोलनाचा फटकाउत्पन्न दाखल्यांसाठी ४०० ते १५०० रुपये

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२७ - तलाठीबांधवांच्याआंदोलनामुळेविद्यार्थ्यांना कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक दाखलेही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी उत्पन्नांचे दाखले आवश्यक आहे.मात्र तो ही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाआहे.

२ आॅक्टोबरपासून तलाठी संघटनांनी विविध २५ मागण्यांसाठी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे ग्रामीण भागात रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला नागरिकांना दिला जात नाही.  शासनाकडून याबाबत कोणतीही सकारात्मक चर्चा होत नसल्याने तलाठी संघटनांनी आपले बहिष्कार आंदोलन सुरुच ठेवले आहे. मात्र या आंदोलनाचा फटका महाविद्यालयीन विद्यार्र्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी ३१ आॅक्टोबर शेवटची मुदत आहे. मात्र उत्पन्नाचे दाखल मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना हा अर्ज भरता येत नसल्याचे चित्र आहे.

महाविद्यालयांकडून तहसीलदारांच्या सूचनांकडे दुर्लक्षउत्पन्नांचे दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना अडचणी येवू नये म्हणून तहसील कार्यालयांकडून महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले असून, यामध्ये विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेताना उत्पन्नांचा दाखल्याऐवजी विद्यार्थ्यांकडून ‘स्वयंघोषणा’ पत्र घ्यावे अशा सूचना दिल्या आहेत. तलाठ्यांचे आंदोलन मागे घेतल्यानंतर विद्यार्थी आपला उत्पन्नांचा दाखला जमा करतील असे या पत्रकात म्हटले आहे. मात्र महाविद्यालयांकडून तहसीलदारांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले असून, विद्यार्थ्यांकडून उत्पन्नांचा दाखला मागितला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा अडचणी वाढल्या आहेत.

उत्पन्न दाखल्यांसाठी ४०० ते १५०० रुपये१.शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असल्याने तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र तलाठी संघटनांकडून सुरु असलेल्या आंदोलनाचा फायदा वेंडर कडून घेतला जात आहे. विद्यार्थ्यांकडून उत्पन्नाचा दाखला काढून देण्यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम घेतली जात असल्याचीतक्रारविद्यार्थ्यांनी‘लोकमत’कडेकेली.२. एका दिवसात उत्पन्नाचा दाखल काढण्यासाठी १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपये घेतले जात आहेत. तर तीन ते चार दिवसात दाखला हवाअसल्यास ४०० ते ६०० रुपये वेंडर्सकडून घेतले जात आहेत.  

मुदत वाढविण्याची मागणी५ आॅगस्टपासून शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सुरुवातीला अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन असल्याने महिनाभर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करता आले नाही.  सर्व्हरची समस्या मार्गी लागल्यानंतर आता तलाठ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.