शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 21:47 IST

तलाठीबांधवांच्याआंदोलनामुळेविद्यार्थ्यांना कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक दाखलेही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी उत्पन्नांचे दाखले आवश्यक आहे.मात्र तो ही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाआहे.

ठळक मुद्दे शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना अडचणी तलाठी बांधवांच्या आंदोलनाचा फटकाउत्पन्न दाखल्यांसाठी ४०० ते १५०० रुपये

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२७ - तलाठीबांधवांच्याआंदोलनामुळेविद्यार्थ्यांना कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक दाखलेही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी उत्पन्नांचे दाखले आवश्यक आहे.मात्र तो ही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाआहे.

२ आॅक्टोबरपासून तलाठी संघटनांनी विविध २५ मागण्यांसाठी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे ग्रामीण भागात रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला नागरिकांना दिला जात नाही.  शासनाकडून याबाबत कोणतीही सकारात्मक चर्चा होत नसल्याने तलाठी संघटनांनी आपले बहिष्कार आंदोलन सुरुच ठेवले आहे. मात्र या आंदोलनाचा फटका महाविद्यालयीन विद्यार्र्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी ३१ आॅक्टोबर शेवटची मुदत आहे. मात्र उत्पन्नाचे दाखल मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना हा अर्ज भरता येत नसल्याचे चित्र आहे.

महाविद्यालयांकडून तहसीलदारांच्या सूचनांकडे दुर्लक्षउत्पन्नांचे दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना अडचणी येवू नये म्हणून तहसील कार्यालयांकडून महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले असून, यामध्ये विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेताना उत्पन्नांचा दाखल्याऐवजी विद्यार्थ्यांकडून ‘स्वयंघोषणा’ पत्र घ्यावे अशा सूचना दिल्या आहेत. तलाठ्यांचे आंदोलन मागे घेतल्यानंतर विद्यार्थी आपला उत्पन्नांचा दाखला जमा करतील असे या पत्रकात म्हटले आहे. मात्र महाविद्यालयांकडून तहसीलदारांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले असून, विद्यार्थ्यांकडून उत्पन्नांचा दाखला मागितला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा अडचणी वाढल्या आहेत.

उत्पन्न दाखल्यांसाठी ४०० ते १५०० रुपये१.शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असल्याने तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र तलाठी संघटनांकडून सुरु असलेल्या आंदोलनाचा फायदा वेंडर कडून घेतला जात आहे. विद्यार्थ्यांकडून उत्पन्नाचा दाखला काढून देण्यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम घेतली जात असल्याचीतक्रारविद्यार्थ्यांनी‘लोकमत’कडेकेली.२. एका दिवसात उत्पन्नाचा दाखल काढण्यासाठी १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपये घेतले जात आहेत. तर तीन ते चार दिवसात दाखला हवाअसल्यास ४०० ते ६०० रुपये वेंडर्सकडून घेतले जात आहेत.  

मुदत वाढविण्याची मागणी५ आॅगस्टपासून शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सुरुवातीला अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन असल्याने महिनाभर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करता आले नाही.  सर्व्हरची समस्या मार्गी लागल्यानंतर आता तलाठ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.