शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

वाढत्या प्रदुषणामुळे जळगावात जगणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:11 IST

पाणी दूषित, वायूदूषित, अन् ध्वनी प्रदूषणाचाही पडलाय विळखा

जळगाव : शहरातील वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असून, ध्वनी, वायु व जल प्रदुषणामुळे जळगावात राहणे देखील आता कठीण झाले आहे. जळगाव शहर राज्यातील इतर शहरांच्या दृष्टीने औद्योगिकीकरणापासून मागे असले तरी प्रदुषणात मात्र वाढ होत आहे.शहरात अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठ्याचा कामामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे. यामुळे शहरातील हवेत धुलीकणांचे प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास सहन करावा लागत आहे.शहरात वाघूर धरणाकडून येणाऱ्या पाणी पुरवठ्याचा जलवाहिनीत अनेक ठिकाणी गळती असल्याने जलप्रदुषण देखील होत असून, नागरिकांना अनेकदा अशुध्द जलपुरवठा होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. मेहरुण तलावात परिसरातील घरांचे सांडपाणी थेट सोडण्यात येत असल्याने मेहरुण तलावातही प्रदुषण होत असून, यामुळे तलावातील व परिसरातील जैवविविधता धोक्यात आली आहे. शहरातील घनकचरा प्रकल्पाला लागणाºया आगीतून निघणाºया धुरामधून मिथेन वायु बाहेर पडत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचत आहे.प्रशासन काय उपाय करतेय?जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे. शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात तब्बल ६६ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांचा सहभाग तर आहेच, त्यासोबतच सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, नागरिकांनाही या वृक्ष लागवड मोहीमेत सहभागासाठी प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. त्यासाठी वनविभागाच्यावतीने जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे.सवयींमध्ये बदल केल्यास पर्यावरणाचा समतोल शक्यलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ झाडांची संख्या मात्र कमी होत आहे़ यामुळे मोठ्या शहरांची आजची हवेची प्रदुषणाची पातळी बघितली तर ती धोकादायकच आहे, यासाठी आपण आपल्या छोट्या छोट्या सवयी बदल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास हातभार लागू शकतो, असे मत पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केले आहे़ झाडे लावणयसाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आणि त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे आवाहनही या तज्ञांनी केले आहे़तज्ञांच्या मते काय आहेछोट्या छोट्या बाबींसाठी वाहनांचा वापर शक्यतोवर टाळावीजेची बचत करा, अनावश्यक वापर टाळा, दुसऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहीत कराप्लास्टीक बंदीची मानसिकता स्वत:मध्ये विकसीत करावृक्षारोपणासह त्याच्या संवर्धनावर भर द्या

टॅग्स :Jalgaonजळगाव