शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

वाढत्या प्रदुषणामुळे जळगावात जगणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:11 IST

पाणी दूषित, वायूदूषित, अन् ध्वनी प्रदूषणाचाही पडलाय विळखा

जळगाव : शहरातील वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असून, ध्वनी, वायु व जल प्रदुषणामुळे जळगावात राहणे देखील आता कठीण झाले आहे. जळगाव शहर राज्यातील इतर शहरांच्या दृष्टीने औद्योगिकीकरणापासून मागे असले तरी प्रदुषणात मात्र वाढ होत आहे.शहरात अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठ्याचा कामामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे. यामुळे शहरातील हवेत धुलीकणांचे प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास सहन करावा लागत आहे.शहरात वाघूर धरणाकडून येणाऱ्या पाणी पुरवठ्याचा जलवाहिनीत अनेक ठिकाणी गळती असल्याने जलप्रदुषण देखील होत असून, नागरिकांना अनेकदा अशुध्द जलपुरवठा होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. मेहरुण तलावात परिसरातील घरांचे सांडपाणी थेट सोडण्यात येत असल्याने मेहरुण तलावातही प्रदुषण होत असून, यामुळे तलावातील व परिसरातील जैवविविधता धोक्यात आली आहे. शहरातील घनकचरा प्रकल्पाला लागणाºया आगीतून निघणाºया धुरामधून मिथेन वायु बाहेर पडत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचत आहे.प्रशासन काय उपाय करतेय?जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे. शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात तब्बल ६६ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांचा सहभाग तर आहेच, त्यासोबतच सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, नागरिकांनाही या वृक्ष लागवड मोहीमेत सहभागासाठी प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. त्यासाठी वनविभागाच्यावतीने जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे.सवयींमध्ये बदल केल्यास पर्यावरणाचा समतोल शक्यलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ झाडांची संख्या मात्र कमी होत आहे़ यामुळे मोठ्या शहरांची आजची हवेची प्रदुषणाची पातळी बघितली तर ती धोकादायकच आहे, यासाठी आपण आपल्या छोट्या छोट्या सवयी बदल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास हातभार लागू शकतो, असे मत पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केले आहे़ झाडे लावणयसाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आणि त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे आवाहनही या तज्ञांनी केले आहे़तज्ञांच्या मते काय आहेछोट्या छोट्या बाबींसाठी वाहनांचा वापर शक्यतोवर टाळावीजेची बचत करा, अनावश्यक वापर टाळा, दुसऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहीत कराप्लास्टीक बंदीची मानसिकता स्वत:मध्ये विकसीत करावृक्षारोपणासह त्याच्या संवर्धनावर भर द्या

टॅग्स :Jalgaonजळगाव