शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
2
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
3
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
4
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
5
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
6
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
7
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
8
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
9
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
10
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
11
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
12
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
13
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
14
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
15
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
16
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
17
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
18
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
19
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
20
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण योजंनामुळे टंचाईच्या झळा तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 23:02 IST

जामनेर तालुक्यातील ७ गावांमध्ये विहीर अधिग्रहण

जामनेर : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतर्फे २००७ मध्ये ७३ गावांसाठी राबविण्यात आलेल्या भारत निर्माण राष्ट्रीय पेयजल योजनांकडे कुणीच लक्ष न दिल्याने त्यांचा बोजबावरा उडाला आहे. गेल्या ११ वर्षांमध्ये मंजूर ७३ पैकी केवळ २५ योजना पूर्ण झाल्या असून अपूर्णावस्थेतील ३८ योजनांची अवस्था बिकट आहे. परिणामी अपूर्ण योजंनामुळे तालुक्यात पाणी टचांई तीव्र होत आहे. योजनांवर शासनाचा पाण्यासारखा कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊनही बहुतांश गावांमध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेयोजनेचे दप्तर कोणाकडे ?२००७ पासूनच्या पाणीपुरवठा योजनांवर झालेला खर्च निरर्थक ठरला असल्याचे तालुकावासीयांचे म्हणणे आहे. काही गावात केवळ जलकुंभ बांधले गेले तर अस्तीत्वात असलेल्या जुन्या योजनेतील जलवाहिनी वापरुन योजना पूर्ण झाल्याची माहिती मिळाली. योजनेची कार्यवाही करण्याचे अधिकार संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच व समिती अध्यक्षास असतात. योजनेचे दप्तर समितीकडेच असणे अपेक्षित आहे, मात्र जामनेर तालुक्यातील योजनेचे दप्तर ठेकेदारांकडे किंवा संबंधित अभियंत्याकडे असल्याच्या तक्रारी सुध्दा प्रत्येक आढावा बैठकीत सरपंच व सदस्यांनी केल्या.जबाबदारी कुणाची?गेल्या ११ वर्षांपासून जिल्हा परिषदमध्ये ७ सीईओंच्या बदल्या झाल्या. तालुक्यातील अपूर्णावस्थेतील योजनांचा आढावा घेण्यासाठी पंचायात समितीत जिल्हा परिषदचे सीईओ, संबंधित अधिकारी, अभियंता यांनी अनेक बैठका घेतल्या. संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले गेले, मात्र कार्यवाही झाली नाही.अपुरा पाऊस हे जरी टंचाईचे कारण असले तरी सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्याची जपवणूक करून ते पाणी टंचाईच्या काळात अशा योजनांच्या माध्यमातून गावांपर्यंत पोहचविणे शक्य होते. गावपातळीवर योजनांच्या देखभालीसाठी पाणी पुरवठा समिती सदस्यांची जबाबदारी महत्त्वाची ठरते. परंतु योजनेचे काम करताना जलवाहीनी वरच्यावर टाकल्याने योजनाच कुचकामी ठरल्याचे तालुक्यात चित्र आहे,७ गावात विहीर अधिग्रहणतालुक्यात टंचाई चटके जाणवू लागले असून सवतखेडे, शेरी, वाकोद, मोयखेडा दिगर, बिलवाडी, देवळसगाव या गावात विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तसेच लाखोली, सार्वे, वाघारी, पहूर कसबे, टिघ्रे वडगाव या गावांचे टँकरसाठी प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाले आहे.इतर तालुक्यात गुन्हे, जामनेरात का नाही ?जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी एक वर्षापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील अपूर्ण पाणी पुरवठा योजनेबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल केले होते. तालुक्यातही गट विकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले होते. मात्र तालुक्यात ३८ योजना अपूर्णावस्थेत असल्यामुळे एक सुध्दा गुन्हा दाखल झाला नाही, याचे कारण सुद्धा गुलदस्त्यात आहे. मंजूर योजनांपैकी ३० पाणीपुरवठा योजना अपूर्ण असल्याचे जि.प.कडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ३८ पाणीपुरवठा योजना अपूर्णावस्थेत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.जामनेत तालुक्यात ३० पाणीपुरवठा योजना अपूर्णावस्थेत आहे. संबंधीत समिती व ठेकेदार यांना मार्चअखेरपर्यंत योजना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. योजना पूर्ण न झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील.- एस.आर. चव्हाण, प्रभारी उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद

टॅग्स :Jalgaonजळगाव