शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरातील भाटे भगिणींची भूतदया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:05 IST

नि:स्वार्थ सेवा

महेंद्र रामोशेअमळनेर - बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली आणि त्यांना पुन्हा माणूस म्हणून उभे केले. त्याच धर्तीवर अमळनेर शहरातील पोलीस लाईन सामोरील भाटे भगिनी मुक्या प्राण्यांची सेवा करत आहेत. अपघातग्रस्त, रोगट, अर्धमेलेले मोकाट श्वानांची सेवा करीत त्यांच्यासाठी आपले जीवन समर्पित या भगिनींनी केले आहे. आपल्या आई आणि भावा पासून मिळालेला वारसा कुसुम भवानजी भाटे, चारुशीला भाटे, आणि अनुपमा भाटे या तिघी बहिणी चालवत आहेत.शहरात मोकाट फिरणाऱ्या श्वानांचा कुठेही अपघात झाला किंवा त्यांना काही दुर्धर आजर लागला, नाल्यात पडला तर ते श्वान या भाटे भगिनींकडे सोडले जाते. या तिन्ही बहिणी धावत-पळत जाऊन त्या श्वानाला तात्काळ दवाखान्यात नेऊन त्यावर स्वखर्चाने उपचार करतात. अनेकवेळा उपचारासाठी पैसे नव्हते म्हणून त्यांनी कर्ज देखील घेतले आहे.संकटांना द्यावे लागते तोंडकुसुम भाटे यांनी आपली कहाणी सांगताना सांगितले की, आम्ही श्वानांची सेवा करतो म्हणून आमच्यावर दगड धोंडे फेकले जातात, मारहाण केली जाते, घाण फेकली जाते इतकेच नाही आम्हाला वेडे ठरवले जाते. मात्र असे असले तरी आम्ही कुठेही श्वानांना त्रास होत असेल तर आम्ही त्याची सुटका करतो आणि त्याला घरी घेऊन येतो. आज या भाटे भगिनींकडे १२५ लहान मोठे श्वान आहेत. त्यात अपघातग्रस्त झालेली, कोणाला आजार झालेला तर कोणते विहीर,गटारमध्ये पडलेले असे अनेक श्वान त्यांनी आज वाढवलेली आहेत.आई आणि भावाने स्थापन केलेल्या ‘ज्ञान कस्तुरी श्वान सेवा संस्थेच्या’ माध्यमातून या भगिनी श्वानांची सेवा करत आहेत. गेल्या ५०वर्षांपासून हे सेवाकार्य सुरू आहे.या कार्यात त्यांना त्रास देणारे कमी नाहीत मात्र मदत करणारे सुद्धा आहेत. त्यांची नावे या भगिनींच्या तोंडपाठ आहेत. प्राण्यांचे औषधे मोफत देणारे जळगावचे डॉ.मनीष बाविस्कर, अजय ललवाणी, अमोल नाथबुवा, ज्ञानेश्वर भोई, ज्ञानेश्वर पाटील, सिंदूबाई पारे, शांताराम बोरसे, धनराज पाटील आदी त्यांना दूध चारा आणि औषध मोफत देतात. इतकेच नव्हे तर न्या. दिनेश कोठलीकर यांच्या परिवाराचे सदस्यदेखील भरीव मदत करतात. त्यांची मुंबई येथे बदली झाली असली तरी ते आजदेखील मदत पाठवत आहेत, असा उल्लेख भाटे यांनी केलाश्वानासोबत भाटे भगिणींकडे १९ गाई आहेत. ज्या भाकड आहेत, मात्र तरीही त्यांची सेवा या भगिनी मनापासून करत आहेत. श्वान आणि गाई त्यांचे संगोपनासाठी पैसे नसतात. त्यामुळे त्यांना शासनाने अनुदान द्यावे, तसेच प्राण्यांच्या संगोपनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध कारून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ती पूर्ण व्हावी, अशी भाटे भगिनींची मागणी आहे. या मोकाट श्वानांची सेवा करता यावी म्हनून या भाटे भगिनीं अतिशय साधं जीवन जगतात व पैसे वाचवून श्वान, मांजर, आणि गाईची सेवा करतात.श्वानांची काळजी घ्याविदेशी जातीच्या श्वानांमुळे गावठी श्वानांवर अन्याय होतो. विदेशी श्वान पाळण्यापेक्षा प्रत्येकाने गावठी श्वान पाळावी, म्हणजे त्यांना आधार मिळेल व पोट भर जेवणदेखील मिळेल. शिवाय नगर परिषदने श्वानांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच नागरिकांदेखील घराच्या बाहेर पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन भाटे भगिनींनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव