शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

कोरड्या हवामानाचा परिणाम, पुढील दोन आठवडे उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 12:02 IST

केळीला पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता

जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली होती. मात्र, आता उत्तर महाराष्टÑ व विदर्भावर तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा पुढे सरकल्यामुळे उत्तर-पश्चिमेकडून येणारे उष्ण वारे सक्रीय झाले आहेत. पुढील आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात तापमान वाढायला सुरुवात झाल्यानंतर एप्रिल महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात पारा ४१ अंशापेक्षा जास्त राहिला. त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.ढगाळ वातावरणाने दिलासामात्र १४ ते १७ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे तीन दिवस ढगाळ वातावरण होते. यामुळे तापमानात ६ ते ७ अंशाची घट होवून ४३ अंशावर गेलेला पारा ३६ अंशावर आला होता. त्यामुळे काही दिवस का असेना नागरिकांना प्रचंड उष्णतेपासून दिलासा मिळाला होता. मात्र, आता जिल्ह्यात सर्वत्र कोरडे हवामान पहायला मिळत असून, वातावरणातील आर्द्रता देखील कमी झाली असल्याने तापमानात वाढ होणार आहे.दरम्यान, रविवार २१ रोजी जळगावचे तपामान ४० अंश सेल्सीअस इतके नोंदविले गेले. यात आणखी वाढ होणार आहे.उष्ण लाटेचे कारणमध्य महाराष्टÑ ते विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाची ट्रफ रेषा तयार झाली होती. त्यातच पश्चिम भागाकडून येणारे उष्ण वारे व बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे गारपीट देखील गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झाली. मात्र, आता हवेचा कमी दाबाची रेषा कर्नाटक व तेलंगणाकडे सरकली आहे.त्यातच उष्ण वारे पुन्हा सक्रीय झाल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. कोरड्या हवामानासह जोरदार वारे वाहत असल्याने तापमानात ३ ते ४ अंशाची वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. २४ एप्रिल ते ५ मे दरम्यान उष्ण लाटेचे प्रमाण सर्वाधिक राहण्याची शक्यता असून, पारा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.केळीला फटका... गेल्या आठवड्यात झालेल्या गारपीट व वादळामुळे केळीचे प्रचंड नुकसान झाले होते. आता उष्ण लाटेमुळे केळीच्या मृगबागांना फटका बसण्याची शक्यता आहे. अति उष्णतेमुळे केळीची वाढ खुंटण्याची भिती शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. तसेच वादळी वाºयामुळे नुकसान झालेल्या चोपडा आणि जळगाव तालुक्यातील कठोरा, सावखेडा, किनोद भागातील केळीचे अद्यापही पंचनामे न झाल्यामुळे या भागातील शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव