शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

कोरड्या हवामानाचा परिणाम, पुढील दोन आठवडे उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 12:02 IST

केळीला पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता

जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली होती. मात्र, आता उत्तर महाराष्टÑ व विदर्भावर तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा पुढे सरकल्यामुळे उत्तर-पश्चिमेकडून येणारे उष्ण वारे सक्रीय झाले आहेत. पुढील आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात तापमान वाढायला सुरुवात झाल्यानंतर एप्रिल महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात पारा ४१ अंशापेक्षा जास्त राहिला. त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.ढगाळ वातावरणाने दिलासामात्र १४ ते १७ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे तीन दिवस ढगाळ वातावरण होते. यामुळे तापमानात ६ ते ७ अंशाची घट होवून ४३ अंशावर गेलेला पारा ३६ अंशावर आला होता. त्यामुळे काही दिवस का असेना नागरिकांना प्रचंड उष्णतेपासून दिलासा मिळाला होता. मात्र, आता जिल्ह्यात सर्वत्र कोरडे हवामान पहायला मिळत असून, वातावरणातील आर्द्रता देखील कमी झाली असल्याने तापमानात वाढ होणार आहे.दरम्यान, रविवार २१ रोजी जळगावचे तपामान ४० अंश सेल्सीअस इतके नोंदविले गेले. यात आणखी वाढ होणार आहे.उष्ण लाटेचे कारणमध्य महाराष्टÑ ते विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाची ट्रफ रेषा तयार झाली होती. त्यातच पश्चिम भागाकडून येणारे उष्ण वारे व बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे गारपीट देखील गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झाली. मात्र, आता हवेचा कमी दाबाची रेषा कर्नाटक व तेलंगणाकडे सरकली आहे.त्यातच उष्ण वारे पुन्हा सक्रीय झाल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. कोरड्या हवामानासह जोरदार वारे वाहत असल्याने तापमानात ३ ते ४ अंशाची वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. २४ एप्रिल ते ५ मे दरम्यान उष्ण लाटेचे प्रमाण सर्वाधिक राहण्याची शक्यता असून, पारा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.केळीला फटका... गेल्या आठवड्यात झालेल्या गारपीट व वादळामुळे केळीचे प्रचंड नुकसान झाले होते. आता उष्ण लाटेमुळे केळीच्या मृगबागांना फटका बसण्याची शक्यता आहे. अति उष्णतेमुळे केळीची वाढ खुंटण्याची भिती शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. तसेच वादळी वाºयामुळे नुकसान झालेल्या चोपडा आणि जळगाव तालुक्यातील कठोरा, सावखेडा, किनोद भागातील केळीचे अद्यापही पंचनामे न झाल्यामुळे या भागातील शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव