शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

चाळीसगाव परिसरात ‘कोरडा चारा’ कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 20:16 IST

यंदा पर्जन्यमानाने सरासरी न गाठल्याने डिसेंबरपासूनच जलसंकट गडद झाले असून, सद्य:स्थितीत जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने कोरड्या (शाळू व ज्वारी) चाऱ्याचे भाव चांगलेच कडाडले आहे.

ठळक मुद्देअत्यल्प पर्जन्यमानामुळे बिकट परिस्थितीदुष्काळाचा वणवा पेटल्याने चारा-पाण्याची मोठी टंचाईचाळीसगाव परिसरात जनावरांची संख्या मोठीपशुपालकांची चाऱ्यासाठी परजिल्ह्यात भटकंतीहिरवा चारा करावा लागतो अ‍ॅडव्हान्स बुकींगचारा छावण्या सुरू करण्याची मागणी, पशुपालक व शेतकरी हतबल

चाळीसगाव, जि.जळगाव : यंदा पर्जन्यमानाने सरासरी न गाठल्याने डिसेंबरपासूनच जलसंकट गडद झाले असून, सद्य:स्थितीत जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने कोरड्या (शाळू व ज्वारी) चाऱ्याचे भाव चांगलेच कडाडले आहे. थेट अक्कलकुवा, नंदुरबार परिसरातून चारा येथे येत असून, दोन हजार ८०० रुपये शेकडा अशी उसळी त्याने घेतली आहे. पुढील महिन्यात हे भाव तीन हजाराच्या पुढे जातील, असे विक्रेत्यांनी सांगितले.चाळीसगाव परिसरात दूध-दुभत्याचा व्यवसाय मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक घरटी जनावरे दावणीला बांधलेली असतात. शेतीला जोडधंदा म्हणूनही शेतकरी पशुपालन करतात. त्यामुळे जनावरांची संख्याही मोठी आहे. यंदा मात्र चारा आणि पाणी समस्येने पशुपालकांना मेटाकुटीला आणले आहे. चाºयाच्या शोधात शेतकऱ्यांना परजिल्ह्यात भटकंती करावी लागत आहे. दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे.यावर्षी पावसाळ्यात आभाळमाया फारशी बरसली नाही. पावसाच्या हजेरीपेक्षा गैरहजेरीच अधिक होती. परतीच्या पावसानेही निराशा केल्याने रब्बी हंगामात शेतकºयांच्या झोळीत फारशे काही पडले नाही. पाण्याचे दुर्भिक्ष्य गहिरे झाल्याने चाºयाचीदेखील मोठी टंचाई निर्माण झाली आहे.तालुक्यात पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. चारा आणि पाण्याच्या समस्येचा दुधाच्या उत्पन्नावरही परिणाम होत असल्याची कैफियत पशुपालक मांडतात. सद्य:स्थितीत ग्रामीण भागात बहुतांशी विहिरी आटल्या आहेत. जनावरांना काय खाऊ घालायचे, असा प्रश्न पशुपालकांना भेडसावत आहे. हिरवा चाºयाची तर अ‍ॅडव्हान्स बुकींग करावी लागत आहे.कोरड्या चाºयाची मागणी वाढलीचारा उपलब्ध नाही. त्यातच हिरवा चारा अल्प असल्याने कोरड्या (शाळू व ज्वारी) चाºयाची मागणी वाढली आहे. पशुपालक थेट परजिल्ह्यात चारा घेण्यासाठी जात आहे. शहरात हिरापूर रोड परिसरात अक्कलकुवा, नंदुरबार भागातून कोरडा चारा विक्रीसाठी आणला जात असून, त्याचे भाव यंदा वधारले आहे. २८०० रुपये प्रतिशेकडा अशा चढ्या दराने कोरडा चारा विक्री होत असून, पुढील महिन्यात हे भाव तीन हजाराहून अधिक असणार आहेत.शासनाने पशुपालक व जनावरे पाळणाºया शेतकºयांचा अंत पाहू नये. तालुक्यात भीषण दुष्काळाचे सावट आहे. तत्काळ जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात. पशुपालकांना चारा उपलब्ध करुन द्यावा. ग्रामीण भागात पाणीबाणी आहे. दावणीला बांधलेल्या जित्राबाला काय खाऊ घालायचे? या प्रश्नाने पशुपालक खचले आहेत.- भूषण काशिनाथ पाटीलसदस्य, जि.प. व जिल्हा नियोजन मंडळ 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईChalisgaonचाळीसगाव