शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भावंडांच्या बुडून मृत्यूने सारेच हळहळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST

पहूर, ता. जामनेर / चाळीसगाव : तलावात बुडून चुलत बहीणभावाचा आणि वाघळी ता. चाळीसगाव येथे सख्ख्या भावांचा पोहत असताना ...

पहूर, ता. जामनेर / चाळीसगाव : तलावात बुडून चुलत बहीणभावाचा आणि वाघळी ता. चाळीसगाव येथे सख्ख्या भावांचा पोहत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही घटना रविवारी घडल्या. भावंडांच्या या अचानक जाण्याने परिसर जणू हळहळला.

पहूर, ता. जामनेर : तलावाजवळ खेळत असताना पाण्यात बुडून चुलत बहीण-भावंडाचा करुण अंत झाला. ही घटना जांभूळ, ता. जामनेर शिवारात रविवारी (दि. १९) दुपारी १.३० वाजता घडली. मानवी नितीन जोशी (७) व रुद्र गोरख जोशी (५) आशी मृत बहीण-भावंडांची नावे आहेत. रुद्र हा एकुलता मुलगा होता. जांभूळ शिवारातील शेतात गोरख जोशी यांचा परिवार राहतो. सकाळी ते व त्यांच्या पत्नी बाहेरगावी गेले होते. गोरख जोशी यांचे भाऊ जांभूळ गावात राहतात. पण मुले खेळण्यासाठी गोरख यांच्याकडे शेतात जातात. रविवारी खेळता खेळता ही मुले पाण्याकडे गेली आणि पाण्यात बुडाली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने आरडाओरड झाली.

घटनास्थळी नामदेव जाधव, युवराज शेळके, गणेश पांढरे, अजय जोशी व अनिल पवार यांनी तात्काळ चिमुकल्यांना बाहेर काढले व पहूर ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी सूर्यवंशी व प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोदचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीसपाटील सुनील शेवाळे यांनी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, गोपाळ माळी, भरत लिंगायत यांनी धाव घेऊन पाहणी केली. शोकाकुल वातावरणात जांभूळ येथे चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मानवी ही इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

सख्ख्या भावांचा मृत्यू

चाळीसगाव : तितूर नदीत पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना वाघळी गावालगतच्या केटी वेअर बंधाऱ्याजवळ अनंत चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी घटना घडली. साहिल शहा शरीफ शहा फकीर ( १४) आणि आयन शहा शरीफ शहा फकीर (१०) अशी या भावांची नावे आहेत. तितूर नदीत पोहण्यासाठी गेले होते. परंतु नंतर ते परत आलेच नाही. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शासकीय दवाखान्यात शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी १२ वाजता दोघांचा दफनविधी करण्यात आला. दरम्यान, याकामी सरपंच द्वारकाबाई धनगर, उपसरपंच नीलेश गंगेले, पोलीसपाटील गायत्री बरहाटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मदत केली. विशेषतः गावातील तरुणांनी रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात त्या दोघांचा शोधकार्य सुरू ठेवले होते. दोघांच्या पश्चात आई, वडील, दोन बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची असून, मुलांचे वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात.