शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

भावंडांच्या बुडून मृत्यूने सारेच हळहळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST

पहूर, ता. जामनेर / चाळीसगाव : तलावात बुडून चुलत बहीणभावाचा आणि वाघळी ता. चाळीसगाव येथे सख्ख्या भावांचा पोहत असताना ...

पहूर, ता. जामनेर / चाळीसगाव : तलावात बुडून चुलत बहीणभावाचा आणि वाघळी ता. चाळीसगाव येथे सख्ख्या भावांचा पोहत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही घटना रविवारी घडल्या. भावंडांच्या या अचानक जाण्याने परिसर जणू हळहळला.

पहूर, ता. जामनेर : तलावाजवळ खेळत असताना पाण्यात बुडून चुलत बहीण-भावंडाचा करुण अंत झाला. ही घटना जांभूळ, ता. जामनेर शिवारात रविवारी (दि. १९) दुपारी १.३० वाजता घडली. मानवी नितीन जोशी (७) व रुद्र गोरख जोशी (५) आशी मृत बहीण-भावंडांची नावे आहेत. रुद्र हा एकुलता मुलगा होता. जांभूळ शिवारातील शेतात गोरख जोशी यांचा परिवार राहतो. सकाळी ते व त्यांच्या पत्नी बाहेरगावी गेले होते. गोरख जोशी यांचे भाऊ जांभूळ गावात राहतात. पण मुले खेळण्यासाठी गोरख यांच्याकडे शेतात जातात. रविवारी खेळता खेळता ही मुले पाण्याकडे गेली आणि पाण्यात बुडाली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने आरडाओरड झाली.

घटनास्थळी नामदेव जाधव, युवराज शेळके, गणेश पांढरे, अजय जोशी व अनिल पवार यांनी तात्काळ चिमुकल्यांना बाहेर काढले व पहूर ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी सूर्यवंशी व प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोदचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीसपाटील सुनील शेवाळे यांनी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, गोपाळ माळी, भरत लिंगायत यांनी धाव घेऊन पाहणी केली. शोकाकुल वातावरणात जांभूळ येथे चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मानवी ही इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

सख्ख्या भावांचा मृत्यू

चाळीसगाव : तितूर नदीत पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना वाघळी गावालगतच्या केटी वेअर बंधाऱ्याजवळ अनंत चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी घटना घडली. साहिल शहा शरीफ शहा फकीर ( १४) आणि आयन शहा शरीफ शहा फकीर (१०) अशी या भावांची नावे आहेत. तितूर नदीत पोहण्यासाठी गेले होते. परंतु नंतर ते परत आलेच नाही. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शासकीय दवाखान्यात शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी १२ वाजता दोघांचा दफनविधी करण्यात आला. दरम्यान, याकामी सरपंच द्वारकाबाई धनगर, उपसरपंच नीलेश गंगेले, पोलीसपाटील गायत्री बरहाटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मदत केली. विशेषतः गावातील तरुणांनी रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात त्या दोघांचा शोधकार्य सुरू ठेवले होते. दोघांच्या पश्चात आई, वडील, दोन बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची असून, मुलांचे वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात.