शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

भावंडांच्या बुडून मृत्यूने सारेच हळहळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST

पहूर, ता. जामनेर / चाळीसगाव : तलावात बुडून चुलत बहीणभावाचा आणि वाघळी ता. चाळीसगाव येथे सख्ख्या भावांचा पोहत असताना ...

पहूर, ता. जामनेर / चाळीसगाव : तलावात बुडून चुलत बहीणभावाचा आणि वाघळी ता. चाळीसगाव येथे सख्ख्या भावांचा पोहत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही घटना रविवारी घडल्या. भावंडांच्या या अचानक जाण्याने परिसर जणू हळहळला.

पहूर, ता. जामनेर : तलावाजवळ खेळत असताना पाण्यात बुडून चुलत बहीण-भावंडाचा करुण अंत झाला. ही घटना जांभूळ, ता. जामनेर शिवारात रविवारी (दि. १९) दुपारी १.३० वाजता घडली. मानवी नितीन जोशी (७) व रुद्र गोरख जोशी (५) आशी मृत बहीण-भावंडांची नावे आहेत. रुद्र हा एकुलता मुलगा होता. जांभूळ शिवारातील शेतात गोरख जोशी यांचा परिवार राहतो. सकाळी ते व त्यांच्या पत्नी बाहेरगावी गेले होते. गोरख जोशी यांचे भाऊ जांभूळ गावात राहतात. पण मुले खेळण्यासाठी गोरख यांच्याकडे शेतात जातात. रविवारी खेळता खेळता ही मुले पाण्याकडे गेली आणि पाण्यात बुडाली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने आरडाओरड झाली.

घटनास्थळी नामदेव जाधव, युवराज शेळके, गणेश पांढरे, अजय जोशी व अनिल पवार यांनी तात्काळ चिमुकल्यांना बाहेर काढले व पहूर ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी सूर्यवंशी व प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोदचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीसपाटील सुनील शेवाळे यांनी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, गोपाळ माळी, भरत लिंगायत यांनी धाव घेऊन पाहणी केली. शोकाकुल वातावरणात जांभूळ येथे चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मानवी ही इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

सख्ख्या भावांचा मृत्यू

चाळीसगाव : तितूर नदीत पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना वाघळी गावालगतच्या केटी वेअर बंधाऱ्याजवळ अनंत चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी घटना घडली. साहिल शहा शरीफ शहा फकीर ( १४) आणि आयन शहा शरीफ शहा फकीर (१०) अशी या भावांची नावे आहेत. तितूर नदीत पोहण्यासाठी गेले होते. परंतु नंतर ते परत आलेच नाही. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शासकीय दवाखान्यात शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी १२ वाजता दोघांचा दफनविधी करण्यात आला. दरम्यान, याकामी सरपंच द्वारकाबाई धनगर, उपसरपंच नीलेश गंगेले, पोलीसपाटील गायत्री बरहाटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मदत केली. विशेषतः गावातील तरुणांनी रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात त्या दोघांचा शोधकार्य सुरू ठेवले होते. दोघांच्या पश्चात आई, वडील, दोन बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची असून, मुलांचे वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात.