शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जळगाव जिल्ह्यात बुडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:17 IST

भुसावळ : जिल्ह्यात शुक्रवारी चार जणांचा बुडून मृत्यू झाला. यात भुसावळातील दोन जणांचा समावेश आहे. मजुराचा ...

भुसावळ : जिल्ह्यात शुक्रवारी चार जणांचा बुडून मृत्यू झाला. यात भुसावळातील दोन जणांचा समावेश आहे. मजुराचा खदानीत तर युवकाचा तापी पात्रात बुडून मृत्यू झाला.

अजय राजू वानखेडे (१९, रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) व अब्दुल शहा इब्राहिम शाह (३५, रा. दीनदयाळ नगर भुसावळ) असे या बुडून मरण पावलेल्यांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता व दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

अजय वानखेडे हा मित्र मोहित वसंत धुंडले याच्या आजीचा अंत्यविधी आटोपून तापी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीजवळील छोट्या पुलावर गेला होता. त्याच वेळेस पाय घसरून तो तापी नदीत बुडाला. संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मांडवे दिगर गावाजवळ खदानीत हातपाय धूत असताना तोल गेल्याने अब्दुल शहा इब्राहिम शाह याचा दुपारी बुडून मृत्यू झाला. सोबत असलेल्या मजुरांनी त्यास तत्काळ पाण्यात काढून वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

वाघडू ता. चाळीसगाव : जामठी ता. चाळीसगाव शिवारातील विहिरीत पडून शांताराम बापू मदने (७२) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

कन्हेरे येथे महिलेचा मृत्यू

अमळनेर तालुक्यातील कन्हेरे येथील एका विवाहितेचा नदीत पाय घसरून डोक्याला खडक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना २४ रोजी सकाळी पावणेबारा वाजता घडली. ललिताबाई अरुण पाटील असे या महिलेचे नाव आहे. ती बोरी नदीतून जात असताना फापोरे वॉटर सप्लाय विहिरीजवळ तिचा पाय घसरला आणि तिच्या डोक्याला दगड लागून तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या पश्चात पती आहेत.