शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

यावल तालुक्यात ७० वर्षांनंतर प्रथमच दुष्काळी स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 16:56 IST

अत्यल्प पाऊस झाल्याने यावल तालुक्यात ७० वर्षांनंतर प्रथमच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा गॅझेटीअरच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देतालुक्यात या वर्षी सरासरीच्या निम्मे पाऊस झाल्याने शेतकºयांच्या हातून खरीप हंगाम पूर्णपणे गेला आहे.१९५२-५३ मध्येही भयावह दुष्काळ होता.

डी.बी.पाटीलयावल, जि.जळगाव : अत्यल्प पाऊस झाल्याने यावल तालुक्यात ७० वर्षांनंतर प्रथमच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा गॅझेटीअरच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.तालुक्यात या वर्षी सरासरीच्या निम्मे पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम पूर्णपणे गेला आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या अत्यल्प पावसाने या वर्षी तालुक्यातील भू-गर्भातील जलपातळी ५.७१ मीटरने खालावली असल्याने पाण्याअभावी रब्बीचा हंगामही घेता येणार नसल्याने तालुकावासी चिंताग्रस्त आहेत. जळगाव जिल्ह्याच्या नकाशावर यावल तालुका सुजलाम-सुफलाम महणूनच प्रचलित असताना गेल्या अनेक वर्षात प्रथमच तालुका दुष्काळ म्हणून जाहीर झाल्याने तालुकावासीयांमध्ये पाणीटंचाईबाबात भीती व्यक्त होत आहे. यापूर्वी कधी दुष्काळ पडला नव्हता, अशी चर्चा असली तरी इतिहासात तालुक्यात अनेक वेळा दुष्काळाशी सामना करावा लागल्याचा इतिहास आहे.तालुक्याची पावसाची सरासरी ७०० मिलीमीटर आहे. या वर्षी पावसाळयात तालुक्यात जूनमध्ये ९ , जुलै १४, आॅगस्टमध्ये ९, तर सप्टेंबरमध्ये १ असे केवळ ३३ दिवस पावसाचे राहिले. या दिवसात झालेल्या पावसाची ३९५ मिलीमीटर नोंद घेण्यात आली आहे. हा सरासरीच्या ५६.६७ टक्के पाऊस आहे. सध्याच्या पिढीने एवढा अल्प पाउस प्रथमच अनुभवलेला असला तरी इतिहासात यापेक्षाही कमी झालेल्या पावसाची नोंद आढळते. यातूनच दुष्काळाची भयानकता खान्देशवासीयांनी अनुभवलेली आहे.या वर्षी यावल तालुक्यातील आणेवारी महसूल विभागाने ४९ पैसे जाहीर केली असून, शासनाने गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ आणि सध्याची पिढी याचा प्रथमच सामना असल्याने तालुकावासी भयभीत झाले आहेत आणि कधी नव्हे गंभीर स्थितीस सामोरे जोव लागणार आहे. यामुळे याआधी या तालुक्यात कधी दुष्काळ जाहीर झाला होता का, असा प्रश्नही उपस्थित करीत आहेत.खान्देशवासीयांना या आधी अनेक वेळा दुष्काळाशी सामना करावा लागला असून, दुष्काळाचे भीषण चटके सहन केल्याचा इतिहास आहे. अर्थात त्याची कारणे वेगवेगळी आहेत. कधी अल्प पावसाने, कधी अती वृष्टीने तर तर कधी खान्देशातील इतिहासकालीन युद्ध परिस्थितीमुळे दुष्काळी स्थिीतीस सामोरे जावे लागले असल्याची जिल्हा गॅझेटीअरमध्ये दुष्काळांची भीषणता नोंदवली आहे. त्यातील भीषणता दर्शवणारी काही वर्षातील पुढीलप्रमाणे आहे.सन १९५२-५३ : या वर्षी जिल्ह्यात केवळ ३५५ मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या निम्मेच पाऊस झाल्याने जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, यावल, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव आणि रावेरसह अन्य तालुक्यात जून महिन्यातील अत्यल्प पावसावर केलेल्या पेरण्या उलटल्याने जुलैमध्ये पुनर्पेेरणी करावी लागली. मात्र आॅगस्ट आणि सप्टेबर महिना कोरडा गेल्याने खरिपाची पिके पूर्णपणे जळाली होती. या वर्षात जिल्ह्याची आणेवारी केवळ चार आणे होती. या दुष्काळी परिस्थितीचा फटका जिल्ह्यातील एक हजार १५६ गावांतील १३ लाख ३ हजार लोकसंख्येस बसला. आपद्ग्रस्ताचे दु:ख कमी करण्यासाठी शासनासह सेवाभावी संस्थांनी तातडीची उपाययोजना म्हणून मदत केंद्रे उघडली होती. त्यातून मजुरांना अन्नदान, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विशेष वैद्यकीय सेवा पुरवण्यात आल्या होत्या. जिल्हा दुष्काळ मदत समितीच्या वतीने २४ खाद्य केंद्रे, २० उपहारगृहे चालवली हाती. शासनाकडून या केंद्राना रास्त भावात धान्यपुरवठा करण्यात आला होता. अनेक तालुका मदत समित्यासह जिल्हा मदत समित्यांनी एक लाख १५ हजार ५०० रुपयांचा निधाी गोळा केला होता. मुंबई दुष्काळ सहाय्य समितीनेही एक लाख ३० हजार रुपयांची मदत केली होती. जनावरांच्या चाºयासाठी ६,०७०,. २९ हेक्टर क्षेत्राचे २८ शासकीय कुप चराईसाठी खुले करण्यात आले होते. सातपुडा पर्वतालगत १८ हजार क्षमतेची पाच पशुशिबिरे उघडण्यात आली होती. जिल्हा दुष्काळ निवारण समितीनेही तीन हजार गुरांना आश्रय दिला हेता. याशिवाय मजुरांना शासनाने रोजगार उपलब्ध करून देवून २८ लाख १७ हजार ६३० रुपयाचे जमीन महसूल आणि २५ लाख ५५ हजार २८२ रुपयांचे तगाई वसुलीचे निलंबन केले होते. सध्या शासनाकडून तगाई वसुली केली जात नाही. यासह इतिहासात १९४७ मध्ये गारपिटीने, १८९९ व १९१९ मध्ये अल्प पावसामुळे तर सतराव्या आणि अठराव्या शतकात शिंदे, होळकर, पेंढारी, मराठे सरदार व पेशवाई काळात युद्धजन्य स्थिती व सैन्याच्या धुमाकूळाने अनेकवेळा पिकांचे नासधूस होऊन झालेल्या नुकसानामुळे दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाल्याचे जिल्हा गॅझेटीअरमध्ये नोंद आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल