शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

चांगल्या हंगामाचे स्वप्न ‘अवकाळी’ने भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:59 IST

ज्यांच्याकडे पाणी आहे ते रब्बीतून काही घेऊ शकतील. मात्र कोरडवाहू जमीन असलेल्यांनी काय करावे. खरिपातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षाचा खर्च भागवावा लागतो. यंदा तर शेतात कर्ज काढून लावलेलेदेखील निघणार नाही.

ठळक मुद्देटाकळी बुद्रूकचे शेतकरी कृष्णा दुसाने यांची व्यथाकुणाचे का होईना सरकार येवो व शेतकºयांना मदत मिळो दु:ख काही पाठ सोडायला तयार नाहीयंदाच्या हंगामातून पक्के घर बांधण्याचा होता मानस

मोहन सारस्वतजामनेर, जि.जळगाव : ज्यांच्याकडे पाणी आहे ते रब्बीतून काही घेऊ शकतील. मात्र कोरडवाहू जमीन असलेल्यांनी काय करावे. खरिपातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षाचा खर्च भागवावा लागतो. यंदा तर शेतात कर्ज काढून लावलेलेदेखील निघणार नाही. चांगला हंगाम येईल या भरवशावर यंदा घराची दुरुस्ती करण्याचा विचार होता. निसर्गाला तेही पाहवले नाही. टाकळी बुद्रूक, ता.जामनेर येथील कृष्णा सुरेश दुसाने यांची ही आपबिती.निसर्गाच्या लहरीपणाने यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे केवळ नुकसानच झाले नाही तर त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. कृष्णा हे आई शशिकला व पत्नी सोबत वडिलोपार्जित शेती करतात. सात एकरपैकी पाच एकरात कापूस व दोन एकरात ज्वारीची लागवड केली. दीड हजारात ज्वारीचे तर आठ हजारात कापसाचे बियाणे खरेदी केले. लागवडीपूर्वी गावातीलच वि.का. संस्थेकडून ४५ हजारांचे व स्थानिक बचत गटाकडून ४० हजार कर्ज घेतले. बचत गट दोन टक्के व्याज दराने कर्ज देत असल्याने ते परवडते. यामुळे सावकाराकडे जावे लागत नाही, असे कृष्णा सांगतात.गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ काही पिच्छा सोडत नव्हता. यंदा मात्र सुरुवातीपासूनच पावसाने मेहरबानी कायम ठेवल्याने हंगाम चांगला येईल, असे वाटत होते. दिवाळीपूर्वी आलेल्या अवकाळी पावसाने कहरच केला. तोंडाशी आलेला घास हिरावला. १८ ते २० पोते ज्वारी येईल. २५ ते ३० क्विंटल कापूस येईल, अशी अपेक्षा होती. मात्र देवाजीच्या मनात काही वेगळेच होते. ज्वारी तर पूर्णच खराब झाली. चारा म्हणून ढोरंसुद्धा खाणार नाही, अशी परिस्थिती आहे. ८० हजार खर्च झाले. हाती काय येईल ते सांगता येत नाही.ज्वारी हातची गेली. कापूस किती येईल असे विचारता. ते म्हणाले, सात-आठ क्विंटल निघेल असे वाटते. मात्र तीन हजारापेक्षा जास्त कुणी भाव देईल असे वाटत नाही. घेतलेले कर्ज कसे फेडायचे याची चिंता आहे. रब्बी पेरणीबाबत ते म्हणाले, कोरडवाहू असल्याने शक्य नाही. मग आता पुढे काय? असा प्रश्न करताच ते म्हणतात, मजुरी करून दिवस काढावे लागतील. गेल्या वर्षी पाच एकरात २० क्विंटल कापूस व दोन एकरात १८ पोते ज्वारी निघाली होती.पीक विमा नाही, शासनानेच मदत द्यावीकृष्णा दुसाने यांनी पीक विमा काढला नाही. शासनाकडून पंचनामा झाला. आता त्यांनीच काही तरी नुकसान भरपाई द्यावी. राज्यात सरकारच नाही. कुणाचे का होईना सरकार येवो व शेतकºयांना मदत मिळो, असे ते म्हणाले.कृष्णा यांचे वडील नाही. आईने घर व शेत सांभाळून दोघं भावना मोठे केले. दुर्दैवाने लहान भाऊ सुनील याचा गेल्या वर्षी अपघातात मृत्यू झाला. त्याचा मोठा आधार होता. गेल्या वर्षी तो गेला. यंदा देवाने असे मारले. दु:ख काही पाठ सोडायला तयार नाही. असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.मातीच्या भिंतीवर पत्रे असून यंदाच्या हंगामातून पक्के घर बांधण्याचा त्यांचा मानस होता.

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर