शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चांगल्या हंगामाचे स्वप्न ‘अवकाळी’ने भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:59 IST

ज्यांच्याकडे पाणी आहे ते रब्बीतून काही घेऊ शकतील. मात्र कोरडवाहू जमीन असलेल्यांनी काय करावे. खरिपातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षाचा खर्च भागवावा लागतो. यंदा तर शेतात कर्ज काढून लावलेलेदेखील निघणार नाही.

ठळक मुद्देटाकळी बुद्रूकचे शेतकरी कृष्णा दुसाने यांची व्यथाकुणाचे का होईना सरकार येवो व शेतकºयांना मदत मिळो दु:ख काही पाठ सोडायला तयार नाहीयंदाच्या हंगामातून पक्के घर बांधण्याचा होता मानस

मोहन सारस्वतजामनेर, जि.जळगाव : ज्यांच्याकडे पाणी आहे ते रब्बीतून काही घेऊ शकतील. मात्र कोरडवाहू जमीन असलेल्यांनी काय करावे. खरिपातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षाचा खर्च भागवावा लागतो. यंदा तर शेतात कर्ज काढून लावलेलेदेखील निघणार नाही. चांगला हंगाम येईल या भरवशावर यंदा घराची दुरुस्ती करण्याचा विचार होता. निसर्गाला तेही पाहवले नाही. टाकळी बुद्रूक, ता.जामनेर येथील कृष्णा सुरेश दुसाने यांची ही आपबिती.निसर्गाच्या लहरीपणाने यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे केवळ नुकसानच झाले नाही तर त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. कृष्णा हे आई शशिकला व पत्नी सोबत वडिलोपार्जित शेती करतात. सात एकरपैकी पाच एकरात कापूस व दोन एकरात ज्वारीची लागवड केली. दीड हजारात ज्वारीचे तर आठ हजारात कापसाचे बियाणे खरेदी केले. लागवडीपूर्वी गावातीलच वि.का. संस्थेकडून ४५ हजारांचे व स्थानिक बचत गटाकडून ४० हजार कर्ज घेतले. बचत गट दोन टक्के व्याज दराने कर्ज देत असल्याने ते परवडते. यामुळे सावकाराकडे जावे लागत नाही, असे कृष्णा सांगतात.गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ काही पिच्छा सोडत नव्हता. यंदा मात्र सुरुवातीपासूनच पावसाने मेहरबानी कायम ठेवल्याने हंगाम चांगला येईल, असे वाटत होते. दिवाळीपूर्वी आलेल्या अवकाळी पावसाने कहरच केला. तोंडाशी आलेला घास हिरावला. १८ ते २० पोते ज्वारी येईल. २५ ते ३० क्विंटल कापूस येईल, अशी अपेक्षा होती. मात्र देवाजीच्या मनात काही वेगळेच होते. ज्वारी तर पूर्णच खराब झाली. चारा म्हणून ढोरंसुद्धा खाणार नाही, अशी परिस्थिती आहे. ८० हजार खर्च झाले. हाती काय येईल ते सांगता येत नाही.ज्वारी हातची गेली. कापूस किती येईल असे विचारता. ते म्हणाले, सात-आठ क्विंटल निघेल असे वाटते. मात्र तीन हजारापेक्षा जास्त कुणी भाव देईल असे वाटत नाही. घेतलेले कर्ज कसे फेडायचे याची चिंता आहे. रब्बी पेरणीबाबत ते म्हणाले, कोरडवाहू असल्याने शक्य नाही. मग आता पुढे काय? असा प्रश्न करताच ते म्हणतात, मजुरी करून दिवस काढावे लागतील. गेल्या वर्षी पाच एकरात २० क्विंटल कापूस व दोन एकरात १८ पोते ज्वारी निघाली होती.पीक विमा नाही, शासनानेच मदत द्यावीकृष्णा दुसाने यांनी पीक विमा काढला नाही. शासनाकडून पंचनामा झाला. आता त्यांनीच काही तरी नुकसान भरपाई द्यावी. राज्यात सरकारच नाही. कुणाचे का होईना सरकार येवो व शेतकºयांना मदत मिळो, असे ते म्हणाले.कृष्णा यांचे वडील नाही. आईने घर व शेत सांभाळून दोघं भावना मोठे केले. दुर्दैवाने लहान भाऊ सुनील याचा गेल्या वर्षी अपघातात मृत्यू झाला. त्याचा मोठा आधार होता. गेल्या वर्षी तो गेला. यंदा देवाने असे मारले. दु:ख काही पाठ सोडायला तयार नाही. असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.मातीच्या भिंतीवर पत्रे असून यंदाच्या हंगामातून पक्के घर बांधण्याचा त्यांचा मानस होता.

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर