शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत, शिक्षण हे वाघिणीचे दूध...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 15:20 IST

येत्या शुक्रवारी, ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. या अनुषंगाने भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख व चळवळीचे अभ्यासक प्रा.डॉ.के.के. अहिरे यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत बाबासाहेबांच्या शिक्षणविषयक विचारांचा घेतलेला आढावा.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे़ जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही़’ ‘शिक्षण ही पवित्र संस्था आहे़ शाळेत मने पवित्र होतात़ शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र, ते राष्ट्रीयतेचे, मानवतेचे नी अज्ञानमय दूर करण्याचे उदात्त कार्य आहे़ शिक्षणाविषयी, शिक्षणाची महती, थोरवी आणि शिक्षणात किती ताकद असते’, हे शिक्षणाविषयीचे डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गौरवाद्गारावरून कळून येते़ डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यात जेवढेही कार्यकर्तृत्व केले ते शिक्षणाच्या अधिष्ठानावरच.डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक व महाविद्यालयीन, विद्यापीठ स्तरावरील शिक्षणाचा लेखाजोखा घेताना आपले शिक्षणाविषयीचे विचार सामाजिक, सांस्कृतिकतेच्या अधिष्ठानावर सविस्तर मांडलेले आहेत़प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या संदर्भात म्हणतात, ‘६ ते १४ वर्षांच्या मुलांना शाळेत शिकविण्याची सक्ती केली पाहिजे़ प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे़ शिक्षण सर्व जनसामान्यांना मिळावे, यासाठी डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांनी शासन दरबारी व लोकमंचावर आपले विचार व्यक्त केले़ सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज स्थापन करून डॉ़आंबेडकर उच्च शिक्षणाविषयी विचार व्यक्त करताना म्हणतात, ‘उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयांची गरज आहे़ उच्च शिक्षित पदवीधर देशाचे भवितव्य घडवू शकतात़ त्यांच्यात शिस्त, चारित्र्य, देशपे्रम निर्माण करता येते़’‘व्यक्तीना जाणीव करून देते ते शिक्षण’ अशी समर्पक शिक्षणाची व्याख्या करताना बाबासाहेब म्हणतात, ‘व्यक्तीला अन्यायाविरुद्ध उठाव करण्याचे सामर्थ्य आणि जाणीव केवळ शिक्षणामुळेच होऊ शकते़ स्वत:च्या उद्धार करावयाचा असेल तर शिक्षण घेणे गरजेचे आहे़’  डॉ़आंबेडकर यांनी शिक्षणाला दुधारी शस्त्राची उपमा दिली आहे़ ते म्हणतात, ‘शिक्षण-विद्या ज्याच्याजवळ आहे तो शीलवान असेल तर तो इतरांचे संरक्षण करू शकेल अन्यथा तो दुसऱ्याचा घात करेल़ शिक्षण व्यक्तीला आत्मस्वातंत्र्यासाठी वापरता येईल़ विषमता नष्ट करण्यासाठी, संघर्षासाठी, समतेसाठी, शिस्त व विकासासाठी, चारित्र्य संवर्धनासाठी, मूल्याधिष्ठित, समाज परिवर्तनासाठी, स्त्रियांच्या उद्धारासाठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता असते़ बाबासाहेब म्हणतात, शिक्षण हे नव मानवतावादाचा संस्कार करणारे असावे़ स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मोद्धार हे परिणामकारक शिक्षणाचे ध्येय असावे़ शिक्षण हाच राष्ट्रीय उन्नतीचा मूलमंत्र आहे़ क्रांती आणि परिवर्तन शिक्षणाशिवाय होऊच शकत नाही़ शिक्षण हे सामाजिक क्रांतीच प्रभावी साधन आहे़ म्हणून प्रत्येकाने शिक्षण घ्यायला हवे, असा डॉ़आंबेडकरांचा आग्रह होता़ डॉ़आंबेडकरांच्या शिक्षणविषयक विचारांचा निकष आजच्या शिक्षण पद्धतीला लावला तर पदरात निराशाच पडेल़ बाबासाहेब शिक्षणाच्या व्यापारीकरणाच्या विरोधात होते़ त्यांनी त्याविषयी तत्कालीन सरकारवर टीका करताना म्हटले होते, ‘आपण कला महाविद्यालयावर जेवढा खर्च करतो त्यापैकी जवळपास ३६ टक्के खर्च विद्यार्थी शुल्कातून करतो. माध्यमिक शाळांवर जेवढा खर्च होतो, त्यापैकी जवळपास, ३१ टक्के खर्च विद्यार्थी शुल्कातून होतो़ प्राथमिक शाळांवर जेवढा खर्च होतो त्यापैकी २६ टक्के खर्च विद्यार्थी शुल्कातून होतो़ यावरून डॉ़ आंबेडकरांना स्पष्ट करायचे होते की, शिक्षण घेणे हा विद्यार्थ्यांचा हक्क असून विद्यार्थ्यांना एवढे शुल्क आकारणे म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण होय़

- प्रा.डॉ.के.के. अहिरे

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ